शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

जिल्ह्यातील ७१६ पाण्याचे स्त्रोत कोरडे

By admin | Updated: June 4, 2014 23:40 IST

उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांपैकी तब्बल ७१६ स्त्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिण्याच्या पाण्याची

साईनाथ कुचनकार - चंद्रपूरउन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांपैकी तब्बल ७१६ स्त्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिण्याच्या पाण्याची तेवढी टंचाई भासली नसली तरी ग्रामीण भागातील नागरिकांना मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सिंदेवाही तालुक्यात सर्वाधित पाण्याचे स्त्रोत आटले आहे.   दरवर्षी उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यात पाणी टंचाई असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने टंचाईवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरु केल्या आहे. तरीही काही गावात आजही पाणीटंचाई आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण स्त्रोतांमधून सातशेच्या वर स्त्रोत आटले आहे. विशेष म्हणजे, जंगलव्याप्त असलेल्या सिंदेवाही तालुत्यात सर्वात स्त्रोत कोरडे पडले आहे. त्यानंतर पोंभूर्णा, राजुरा, गोंडपिपरी तालुक्यांच्या समावेश आहे. जिल्ह्यात अनेक गावांत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. काही गावातील योजना सुरु आहे. तर वीज बिल न भरलेल्या तब्बल ५0 च्यावर योजना बंद आहे. या योजना सुरु करण्यासाठी वीज मंडळाने सवलतीची योजना सुरु  केली होती. तरीही ग्राम पंचायतीच्या उदासीन धोरणामुळे वीज बिल भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ५0 गावातील नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे  लागत आहे.जिल्ह्यात तलाव, विहिर, बोढींची संख्या मोठय़ा संख्येने आहे. मात्र  यातील गाळ नियमित काढण्यात येत नसल्याने अनेक पाण्याचे स्त्रोत कायमस्वरुपी बंद आहे.