शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

खरीप हंगामात वाटणार ६८८ लाखांचे पीक कर्ज

By admin | Updated: May 30, 2015 01:39 IST

खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून जिल्हा प्रशासनाने यावर्षी ६८८ लाख ८५ हजार रूपयाचे पीक कर्ज वाटपाचे नियोजन केले आहे.

मंगेश भांडेकर चंद्रपूरखरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून जिल्हा प्रशासनाने यावर्षी ६८८ लाख ८५ हजार रूपयाचे पीक कर्ज वाटपाचे नियोजन केले आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात कर्ज वाटपाचा श्रीगणेशा झाला नसल्याने शेतकऱ्यांना खरीप पीक पेरणीसाठी अडचणी येण्याची शक्यता बळावली आहे. २५ मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरूवात झाली असून ८ जूनला मृग नक्षत्र लागणार आहे. सर्वसाधारणपणे मृग नक्षत्रापासूनच पाऊस पडायला सुरूवात होत असते. त्यामुळे या नक्षत्रात पेरणीच्या कामांना वेग येते. आता शेतकरी मान्सूनपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असून पेरणीसाठी बी-बियाण्यांची जुळवाजुळव करीत आहेत. मात्र गेल्या दोन वर्षातील ओला व कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी आर्थिक तंगीत आहे. अशात त्यांना बी-बियाणे खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणी येत असून बँक, सावकार, नातेवाई यांच्याकडे कर्जासाठी धावपळ करीत असल्याचे चित्र आहे. बँकांकडून कर्ज वाटपाचा लवकर श्रीगणेशा होऊन शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळाल्यास बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी जास्त अडचणींचा सामना करावा लागणार नाही. मात्र बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांना नाममात्र कर्ज देऊन कर्ज वाटपाचा श्रीगणेशा केल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. प्रत्यक्षात मात्र स्थिती वेगळीच असून अनेकांनी कर्जासाठी अर्ज करूनही त्यांच्या प्रकरणांवर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे कर्ज मिळण्यास आणखी किती दिवसांचा कालावधी लागेल, याची चौकशी शेतकरी करीत आहेत. कृषी विभागाने खरीप पीक पेरणी अहवाल तयार करून विविध बँकामार्फत कर्ज वाटपाचे उद्दीष्ठ निश्चीत केले असले तरी अनेक शेतकऱ्यांना कर्जासाठी हेलपाट्या मारावे लागत असल्याची स्थिती आहे. सातबारावरील हिस्सेदारांची सहमती, यापूर्वीच्या कर्जाचा बोजा, कर्ज नसल्याचा दाखला अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर येत आहेत. त्यामुळे काही शेतकरी बँकेच्या कर्जापेक्षा नातेवाईक किंवा सावकार यांच्याकडून मिळणारे कर्ज लवकर मिळत असल्याने त्यांच्याकडे वळले असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. नियोजनापेक्षा अधिक कर्ज वाटप जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी कर्ज वाटपाचे नियोजन केले जाते. मात्र दरवर्षीच नियोजनापेक्षा अधिक कर्जाचे वाटप झाले आहे. २०१२-१३ मध्ये ३८० लाख ८८ हजार रूपयाचे कर्ज वाटपाचे नियोजन होते. यात ४०८ लाख ३४ हजार रूपयाचे कर्ज वाटप झाले. २०१३-१४ मध्ये ४६८ लाख ३२ हजार रूपयाचे कर्ज वाटप नियोजन होते. यात ५५९ लाख ८८ हजार रूपयांचे कर्ज वाटप झाले. तर सन २०१४-१५ मध्ये ५५९ लाख ८८ हजार रूपयांचे कर्ज वाटप नियोजन होते. यात ५९९ लाखांचे कर्ज वाटप झाले.जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडीदरवर्षी कर्ज वाटप प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडी राहिली आहे. २०१२-१३ या वर्षात जिल्हा मध्यवर्ती बँकेने २०६ लाख ५६ हजार रूपयाचे कर्ज वाटप केले. २०१३-१४ मध्ये २२६ लाख ७९ हजार तर २०१४-१५ मध्ये ३६१ लाख २१ हजार रूपयाचे कर्ज वाटप केले आहे. २०१५-१६ या वर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ३९३ लाखांचे कर्ज वाटपाचे नियोजन आहे.