शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

६११ शाळांना ‘अ’ दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:28 AM

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शाळासिद्धी उपक्रम सुरु केला.

ठळक मुद्देशाळासिद्धी उपक्रम : ५० शाळांचा उपक्रमात सहभागच नाही

परिमल डोहणे ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शाळासिद्धी उपक्रम सुरु केला. या उपक्रमानुसार शाळा प्रशासनाने केलेल्या स्वयंमुल्याकनानुसार जिल्ह्यातील ६११ शाळांना ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे. तर एक हजार ७८३ शाळांना ‘ब’ श्रेणी व ९५ शाळांना ‘क’ श्रेणीचा दर्जा मिळाला आहे. मात्र ५० शाळांनी उदासीनता दाखवत या उपक्रमात सहभागच घेतला नाही.संपूर्ण शाळांना दर्जानुसार श्रेणी देण्यासाठी केंद्रस्तरावरुन शाळासिद्धी प्रणाली तयार करण्यात आली होती. शाळांमधील पायाभूत सुविधा व गुणवत्तेच्या निकषांच्या आधारावर शाळांना श्रेणी देण्यात येते. त्यासाठी ४६ मानके व सात क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार पहिल्यांदा मुख्यमध्यापकांना स्वत: शाळेचे मुल्यमापन करायचे होते. यामध्ये जिल्ह्यातील २ हजार ५३९ शाळांपैकी २ हजार ४२२ शाळेने शाळासिद्धी उपक्रमातंर्गत मुल्यमापन केले होते. त्यापैकी सहभागी झालेल्या शाळांपैकी ६७ शाळांनी पोर्टलवर अर्धवट माहिती भरली. तर ५० शाळांनी अर्जच सादर केले नाही.शाळासिद्धी उपक्रमातंर्गत स्वयंमूल्यमापनात शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची पटसंख्या, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शिक्षकांची कामगिरी या आधारावर शाळेने स्वयंमुल्यमापण केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील ६११ शाळांना ‘अ’ श्रेणीचा दर्जा, तर १ हजार ७८३ शाळांना ब श्रेणी, ९५ शाळांना क श्रेणीचा दर्जा मिळाला आहे. मात्र या उपक्रमात ५० शाळांनी सहभागच घेतला नाही.अजूनही बाह्यमुल्यमापन नाहीमुख्यध्यापकांच्या माध्यमातून शाळेचे स्वयंमूल्यमापन केल्यानंतर आलेल्या गुणांनुसार श्रेणी देण्यात आली. त्यानंतर शाळेचे बाह्यमुल्यमापन करण्यात येणार होते. मात्र अद्यापही कोणत्याही शाळेचे बाह्यमुल्यमापन करण्यात आले नाही. त्यामुळे स्वत: शाळेने मुल्यमापन करुन दिलेली श्रेणी योग्य आहे की नाही, याबाबत संभ्रम दिसून येत आहे.मुल्यमापनासाठी डाएटने केले प्रयत्नशाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा सातत्यपूर्ण शैक्षणिक संस्था (डाएट) तर्फे विशेष प्रयत्न करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यानंतर केंद्रस्तरावरील सर्व शिक्षकांच्या १२५ केंद्रावर विशेष कार्यशाळा घेण्यात आल्या. यात एक हजार ९६८ शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ८४८ मुख्याध्यापकांनी तर ५ हजार ९९९ शिक्षकांनी सहभाग घेतला होता.शाळासिद्धी उपक्रमातंर्गत वर्षभरापूर्वी शाळांना टूल देण्यात आले होते. त्यानुसार शिक्षकांनी आपल्या श्रेणीत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच डीआयसीपीडीच्या माध्यमातूनही प्रयत्न करण्यात येत आहेत.- धनंजय चापलेप्राचार्य, डाएट कॉलेज, चंद्रपूर.