शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

५९० वेळा एसटीने अर्ध्या रस्त्यात सोडली साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 05:00 IST

चंद्रपूर विभागांतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा आणि चिमूर येथे आगार आहे. यासाठी विभागांमध्ये २२५ बसेस आहे. सध्या दररोज १४०५ फेऱ्या केल्या जात असून ८० हजार कि.मी. प्रवास केला जात आहे. चंद्रपूर विभागांतर्गत असलेल्या बसेस दुर्गम तसेच लांब पल्ल्याचा प्रवास करीत आहेत. मात्र, मागील वर्षी एप्रिल २०१९ ते मार्च २०२० मध्ये विविध मार्गांवर तब्बल ५३६  बसेस तांत्रिक कारणासाठी बंद पडल्या. यामध्ये पंक्चर होणे, ब्रेक फेल, सुट्या भागाचे नुकसान यासह अन्य बिघाड झाले आहेत.

ठळक मुद्देदोन वर्षांतील स्थिती : आर्थिक डोलारा सांभाळताना कसरत

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‌प्र‌वाशांच्या सेवेसाठी असे बीद्र असलेल्या एसटीला आजही सामान्य नागरिकांची पसंती आहे. मात्र, अनेकवेळा तांत्रिक बिघाड, पंक्चर यासारख्या समस्या उद्भवत असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील दोन वर्षांत चंद्रपूर विभागाअंतर्गत तब्बल ५९० वेळा एसटी रस्त्यात बंद पडली असून प्र‌वाशांना मनस्ताप सहन करावा लागला.खासगी बसेसच्या स्पर्धेमध्ये सुरक्षित प्रवासासाठी आजही मोठ्या प्रमाणात एसटीला प्रवाशांची पसंती आहे. त्यामुळे अडचणीच्या काळातही चंद्रपूर विभागाने बऱ्यापैकी उत्पन्न मिळवून महामंडळाने आपला डोलारा सांभाळला आहे.चंद्रपूर विभागांतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा आणि चिमूर येथे आगार आहे. यासाठी विभागांमध्ये २२५ बसेस आहे. सध्या दररोज १४०५ फेऱ्या केल्या जात असून ८० हजार कि.मी. प्रवास केला जात आहे. चंद्रपूर विभागांतर्गत असलेल्या बसेस दुर्गम तसेच लांब पल्ल्याचा प्रवास करीत आहेत. मात्र, मागील वर्षी एप्रिल २०१९ ते मार्च २०२० मध्ये विविध मार्गांवर तब्बल ५३६  बसेस तांत्रिक कारणासाठी बंद पडल्या. यामध्ये पंक्चर होणे, ब्रेक फेल, सुट्या भागाचे नुकसान यासह अन्य बिघाड झाले आहेत. तर एप्रिल २०२० ते जानेवारी २० पर्यंत ५४ बसेस मार्गामध्ये बंद पडल्या. मागील तसेच यावर्षीचे एसटी बंद पडल्याने प्रमाण जास्त वाटत असले तरी प्रवासाच्या तुलनेत तसेच इतर विभागाच्या मानाने चंद्रपूर भागातील एसटी बंद पडण्याचा प्रमाण कमी असल्याचे चंद्रपूर विभागाचे म्हणणे आहे.सध्या स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी महामंडळाने विविध उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये नवीने बस खरेदी तसेच शिवशाहीसारख्या बसेस स्पर्धेत उतरविल्या आहेत. एवढेच नाहीतर कोरोनाकाळात संकटाच्या वेळी प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याचे कामही एसटीने केले आहे. मात्र दुरुस्तीवर होणारा खर्च एसटीला महागात पडत आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर महामंडळात १५ आधिकाऱ्यांसह १५६० कर्मचारी विविध विभागात  कार्यरत असून महामंडळाच्या उत्पन्नात वाढ कऱ्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.

दहा वर्षांवरील २३ बसेसचंद्रपूर विभागाअंतर्गत २२५ बसेस आहेत. नियमानुसार १० ते १२ वर्षांपर्यंत बस प्रवाशांसाठी चालविली जाते. त्यानंतर मालवाहतूक तसेच स्कॅपमध्ये बस काढली जाते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटीकडून विशेष काळजी घेतली जाते. नियमित स्वच्छता तसेच मेन्टेनन्ससुद्धा वेळावेळी केल्या जात असून दक्षता घेतली जात असल्याची माहिती आगारातील सुत्रांकडून मिळाली                     आहे. 

एसटी मेंटेनन्सवर लाखोंचा खर्चचंद्रपूर विभागात असलेल्या एसटीच्या मेन्टनन्सवर वर्षाकाठी लाखो रुपये खर्च केला जात आहे. यामध्ये बसेस दुरुस्ती, देखभालीवर हा खर्च होताे. हा खर्च विभागीय कार्यालयाकडून होतो. यासाठी अधिकाऱ्यांची विशेष परवानगी घ्यावी लागते. चेचिस आणि इंजीनवर हा खर्च अधिक होताे. 

सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी महामंडळ तत्पर आहे. काहीवेळा प्रवासादरम्यान बस बंद पडली तरीही प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी  दुसऱी बस उपलब्ध करून देत सुविधा पुरविल्या जाते.- आर. एन. पाटील,  विभागीय नियंत्रक, चंद्रपूर 

टॅग्स :state transportएसटी