शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत ५१ कोटींची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:33 IST

१ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. आता या दारूबंदीला तीन वर्षे लोटली. मात्र अनेक गावातील अवैध दारूविक्रीच्या कारवायांवरून जिल्ह्यात खरोखरच दारूबंदी आहे का, प्रश्न आपुसकच विचारला जाते. दारूबंदीच्या तीन वर्षात सहा लाख ६२ हजार ७२९ लिटर देशी-विदेशी आणि गावठी दारू पोलिसांनी जप्त केली.

ठळक मुद्दे१२१ कोटींचा मुद्देमाल : २५ हजार १५७ आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. आता या दारूबंदीला तीन वर्षे लोटली. मात्र अनेक गावातील अवैध दारूविक्रीच्या कारवायांवरून जिल्ह्यात खरोखरच दारूबंदी आहे का, प्रश्न आपुसकच विचारला जाते. दारूबंदीच्या तीन वर्षात सहा लाख ६२ हजार ७२९ लिटर देशी-विदेशी आणि गावठी दारू पोलिसांनी जप्त केली. या दारूची किमंत ५१ कोटी ८२ लाख २७ हजार ८७६ एवढी आहे. दारू, वाहने आणि इतर साहित्य मिळून तीन वर्षात पोलिसांनी १२१ कोटी १७ लाख ८३ हजार ९६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात अनेकांना अटक झाली असली तरू खून, मारहाण, दंगा, चोरी अशा गुन्हेगारीत कमालीची घट झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराज राजपुत यांनी पत्रकार परिषदेत दिली.१ एप्रिल २०१५ रोजी जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१७ या पहिल्या दोन वर्षात दारूसाठा जप्तीचे प्रमाण कमी होते. पहिल्या वर्षी एक लाख ५० हजार ९४५ लिटर तर दुसऱ्या वर्षी एक लाख ८३ हजार ४६६ लिटर दारू जप्त करण्यात आली होती. तिसºया वर्षी तीन लाख २८ हजार ३१८ लिटर दारू पोलिसांनी जप्त केली. या तीन वर्षात २२ हजार ३३६ प्रकरणात २५ हजार १३५ आरोपींना पोलिसांनी अटक केली. तीन हजार ६२३ दुचाकी व १ हजार १५७ चारचाकी वाहने जप्त केली. नऊ कोटी १२ लाख १४ हजार ८९ रुपयाचे इतर साहित्यही जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.पोलिसांकडून दारूविक्रेत्यांवर कारवाई होत असली जिल्ह्यात दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पोलीस आणि दारू विक्रेत्यांचे आर्थिक संबंध सुद्धा या काळात उघड झाले. तर काही दिवसांपुर्वीच पोलिसांच्या गाडीचा चंद्रपुरात दारू आणण्यासाठी उपयोग करण्यात आला होता, हे सुद्धा उघड झाले. दारूविक्रेत्यांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनाही जिल्ह्यात घडल्या. दरम्यान मद्याला पर्याय म्हणून अमली पदार्थ सुद्धा चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात सेवन केले जात आहे. गांजा, चरस आणि गर्दच्या विळख्यात विद्यार्थी सापडले आहेत.अमली पदार्थाचा वापरदारूबंदीनंतर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री वाढली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे अनेकदा समोर आले आहे. मागील ३२ महिन्यात तब्बल ३१३ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. १८ प्रकरणात २८ आरोपींना अटक करण्यात आली. ब्राऊन शुगरसारखे अंमली पदार्थसुद्धा चंद्रपूर शहरात पोलिसांनी पकडले असून आतापर्यंत ८८ मिलीग्रॅम गर्द जप्त केले. गुंगीचे औषध असलेली डोडा भुकटीसुद्धा पोलिसांनी पकडली.वहानगावने उडविली होती प्रशासनाची झोपअवैध दारूविक्रीला कंटाळून चिमूर तालुक्यातील वहानगाव वासीयांनी आम्हाला दारूविक्रीची परवनागी द्यावी, अन्यथा ग्रामपंचायतमध्ये खुलेआम दारूविक्री करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामसभा घेवून ग्रामपंचायतीने दारूविक्रीचे खुलेआम दुकान लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. उपसरपंच प्रशांत कोल्हे याला हद्दपार करण्यात आले. तेव्हा प्रशासनाविरूद्ध गावकरी उभे ठाकले होते.