शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

तीन वर्षांत ५१ कोटींची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:33 IST

१ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. आता या दारूबंदीला तीन वर्षे लोटली. मात्र अनेक गावातील अवैध दारूविक्रीच्या कारवायांवरून जिल्ह्यात खरोखरच दारूबंदी आहे का, प्रश्न आपुसकच विचारला जाते. दारूबंदीच्या तीन वर्षात सहा लाख ६२ हजार ७२९ लिटर देशी-विदेशी आणि गावठी दारू पोलिसांनी जप्त केली.

ठळक मुद्दे१२१ कोटींचा मुद्देमाल : २५ हजार १५७ आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. आता या दारूबंदीला तीन वर्षे लोटली. मात्र अनेक गावातील अवैध दारूविक्रीच्या कारवायांवरून जिल्ह्यात खरोखरच दारूबंदी आहे का, प्रश्न आपुसकच विचारला जाते. दारूबंदीच्या तीन वर्षात सहा लाख ६२ हजार ७२९ लिटर देशी-विदेशी आणि गावठी दारू पोलिसांनी जप्त केली. या दारूची किमंत ५१ कोटी ८२ लाख २७ हजार ८७६ एवढी आहे. दारू, वाहने आणि इतर साहित्य मिळून तीन वर्षात पोलिसांनी १२१ कोटी १७ लाख ८३ हजार ९६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात अनेकांना अटक झाली असली तरू खून, मारहाण, दंगा, चोरी अशा गुन्हेगारीत कमालीची घट झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराज राजपुत यांनी पत्रकार परिषदेत दिली.१ एप्रिल २०१५ रोजी जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१७ या पहिल्या दोन वर्षात दारूसाठा जप्तीचे प्रमाण कमी होते. पहिल्या वर्षी एक लाख ५० हजार ९४५ लिटर तर दुसऱ्या वर्षी एक लाख ८३ हजार ४६६ लिटर दारू जप्त करण्यात आली होती. तिसºया वर्षी तीन लाख २८ हजार ३१८ लिटर दारू पोलिसांनी जप्त केली. या तीन वर्षात २२ हजार ३३६ प्रकरणात २५ हजार १३५ आरोपींना पोलिसांनी अटक केली. तीन हजार ६२३ दुचाकी व १ हजार १५७ चारचाकी वाहने जप्त केली. नऊ कोटी १२ लाख १४ हजार ८९ रुपयाचे इतर साहित्यही जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.पोलिसांकडून दारूविक्रेत्यांवर कारवाई होत असली जिल्ह्यात दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पोलीस आणि दारू विक्रेत्यांचे आर्थिक संबंध सुद्धा या काळात उघड झाले. तर काही दिवसांपुर्वीच पोलिसांच्या गाडीचा चंद्रपुरात दारू आणण्यासाठी उपयोग करण्यात आला होता, हे सुद्धा उघड झाले. दारूविक्रेत्यांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनाही जिल्ह्यात घडल्या. दरम्यान मद्याला पर्याय म्हणून अमली पदार्थ सुद्धा चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात सेवन केले जात आहे. गांजा, चरस आणि गर्दच्या विळख्यात विद्यार्थी सापडले आहेत.अमली पदार्थाचा वापरदारूबंदीनंतर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री वाढली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे अनेकदा समोर आले आहे. मागील ३२ महिन्यात तब्बल ३१३ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. १८ प्रकरणात २८ आरोपींना अटक करण्यात आली. ब्राऊन शुगरसारखे अंमली पदार्थसुद्धा चंद्रपूर शहरात पोलिसांनी पकडले असून आतापर्यंत ८८ मिलीग्रॅम गर्द जप्त केले. गुंगीचे औषध असलेली डोडा भुकटीसुद्धा पोलिसांनी पकडली.वहानगावने उडविली होती प्रशासनाची झोपअवैध दारूविक्रीला कंटाळून चिमूर तालुक्यातील वहानगाव वासीयांनी आम्हाला दारूविक्रीची परवनागी द्यावी, अन्यथा ग्रामपंचायतमध्ये खुलेआम दारूविक्री करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामसभा घेवून ग्रामपंचायतीने दारूविक्रीचे खुलेआम दुकान लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. उपसरपंच प्रशांत कोल्हे याला हद्दपार करण्यात आले. तेव्हा प्रशासनाविरूद्ध गावकरी उभे ठाकले होते.