शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

राजुरा तालुक्यात २०९ जागांसाठी ४६१ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: July 31, 2015 01:25 IST

राजुरा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीतील ८४ वॉर्डातील २०९ जागेसाठी निवडणूक घोषित करण्यात आली.

राजुरा : राजुरा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीतील ८४ वॉर्डातील २०९ जागेसाठी निवडणूक घोषित करण्यात आली. त्यातील २६ जागेवर २६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. उर्वरित १८४ जागांसाठी ४३५ उमेदवार रिंगणात आहे. उमेदवारांनी गावातील वातावरण गरम केले आहे. प्रत्येक उमेदवार घरोघरी जाऊन निवडून देण्याचे साकडे घालत आहे. ग्रामपंचायतमधील प्रत्येक वार्डात बहुरंगी लढत होणार आहे.तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीमध्ये येत्या ४ आॅगस्टला निवडणूक होणार आहे. यात सर्वात मोठी चुनाळा ग्रामपंचायत असून त्यात पाच प्रभागातून १३ उमेदवार निवडून द्यावयाचे आहे. तसेच गोवरी ग्रामपंचायतीमधील चार प्रभागातून ११ उमेदवार, चंदनवाह, चिंचोली (बु.) बामनवाडा, विहीरगाव, कढोली (बु.) येथील तीन प्रभागातून प्रत्येकी ९ उमेदवार तथा उर्वरीत वरोडा, पवनी, मुठरा, पंचाळा, सातरी, चार्ली, कळमना, खामोना, कोहपरा, चनाखा, पेल्लोरा, मूर्ती, धानोरा, नलफडी, सुमठाणा, सिंधी, कोलगाव, मारडा, चिंचोली (खु.) कविठपेठ येथील तीन प्रभागातून प्रत्येकी सात उमेदवार निवडून द्यावयाचे आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, संघटना व शिवसेना यांनी उमेदवार उभे करुन निवडणूक अटीतटीची केली आहे. चुनाळा ग्रामपंचायतीमध्ये १३ उमेदवार निवडून द्यावयाचे असून यात काँग्रेस, राकाँ व भाजपा यात अटीतटीची लढत होणार आहे. हे गाव माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे जन्मगाव आहे. यापूर्वी येथे काँग्रेस पक्षाचे सरपंच होते. त्यामुळे काँग्रेस, राकाँ व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष देवून निवडणूकीत वातावरण गरम केले आहे. तीच स्थिती गोवरी येथे असून तेथे राकाँ व शिवसेना युती असून त्याची लढत काँग्रेस व भाजपा उमेदवारात होणार आहे. तसेच उर्वरीत ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक स्तरावर व गाव पातळीवर आपसी समजोता विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. समजोता न झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे करुन अटीतटीची लढत कायम केली आहे.भाजपाचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, काँग्रेस माजी आमदार सुभाष धोटे, शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, राकाँचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी गावोगावी जाऊन मतदाराची भेट घेऊन उमेदवारांना निवडून देण्याची मागणी करीत आहे. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा सक्रिय झाले असून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. या निवडणुकीत लोकसभा व विधानसभा निवडणुकीची हवा कायम राहिली तर ठिक अन्यथा चित्र पालटू शकते. (शहर प्रतिनिधी)