शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जिल्हा कारागृहातील ४४५ कैद्यांना दहा महिन्यांपासून नातेवाइकांची भेटगाठच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST

परिमल डोहणे चंद्रपूर : कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. त्यामुळे सर्वच बंद पडले. याचा फटका बंदीवानांना मोठ्या ...

परिमल डोहणे

चंद्रपूर : कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. त्यामुळे सर्वच बंद पडले. याचा फटका बंदीवानांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. बंदीवानांच्या भेटीगाटीवर न्यायालयाने निर्बंध लादल्याने मागील दहा महिन्यांपासून बंदीवानांना आपल्या कुटुंबीयांची भेटगाठच घेता आली नाही.

देशात कोरोना विषाणूचा पसार होताच सुमारे दोन महिने ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात २ मे रोजी पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर शहरात हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली. जिल्हा कारागृहातील १७० बंदीवान, २१ अधिकारी व कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे कारागृहातच कोविड रुग्णांची स्थापना करण्यात आली. त्यामुळे बंदिवानांच्या नातेवाइकांची भेटीगाठी बंद होत्या. यावेळी आप्तेष्ट व कुटुंबीयांशी वार्तालाप करण्यासाठी मोबाइल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नातेवाइकांच्या भेटीगाठीवरच निर्बंध लादले. त्यामुळे मागील दहा महिन्यांपासून जिल्हा कारागृहात चंद्रपूर व गडचिरोली दोन्ही जिल्ह्यांतील ४२९ पुरुष व १६ महिला बंदिवानाना आपल्या आप्तेष्टांशी भेटगाठ घेतली नाही. केवळ भ्रमणध्वनीद्वारेच वार्तालाप करून आपली खुशहाली कळवावी लागत आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. बंद असलेल्या सर्व शाळा-महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र बंदिवानांच्या भेटीवरील बंदी उठवण्याबाबत अद्याप कसलेच पाऊल उचलले नाही. परिणामी सर्व बंदीवान आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आतुर झाले आहेत.

बॉक्स

व्हिडिओ कॉलिंगद्वारे साधतात नातलगांशी संवाद

बंदीवानानी अर्जामध्ये आपल्या कुटुंबीयांचे नंबर लिहून द्यावे लागते. त्याची शहानिशा झाल्यानंतर बंदीवानांच्या मागणीनुसार व्हिडीओ किंवा ॲाडिओ कॉलिंगद्वारे संपर्क करून दिला जातो. न्यायाधीन बंदिवानांना आठवड्यातून एकदा, तर शिक्षाधीन बंदीवानांना पंधरवड्यातून एकदा कॉलिंगद्वारे बोलण्याची व्यवस्था करून दिली आहे. परंतु, भेटीगाठीवर निर्बंध लादण्यात आले आहे.

बॉक्स

कारागृह प्रशासनाकडून मायेची ऊब

कोरोनामुळे नातेवाइकांच्या भेटीगाठी बंद आहेत. त्यातच चंद्रपुरात कडाक्याची थंडी पडत आहे. परंतु, अनेक बंदिवानांकडे स्वेटर, मफलर किंवा बंदीवानांकडे थंडीपासून बचावाचे साहित्य नाही. त्यामुळे कारागृह प्रशासनाने बंदिवान व कैद्यांना मायेची ऊब दाखवत थंडीपासून बचावाकरिता ब्लँकेट, चादरची व्यवस्था केली आहे.