शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

४९९८ हेक्टर वनभूमीवर उभे आहेत प्रकल्प

By admin | Updated: June 5, 2015 01:08 IST

जिल्ह्यात मानव आणि वन्यजीवांच्या संघर्ष उडाला की चर्चा केवळ मानव-वन्य जीव संघर्षाचीच होते.

वन्यजीव घुसताहेत गावात : १२ वर्षात १३५ माणसांचे बळीपर्यावरण दिन विशेषगोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूरजिल्ह्यात मानव आणि वन्यजीवांच्या संघर्ष उडाला की चर्चा केवळ मानव-वन्य जीव संघर्षाचीच होते. मात्र वन्यजीवांच्या अधिवासात माणसांनी प्रकल्पाच्या नावाखाली थाटलेला व्यवसाय कुणाच्या नजरेच्या टप्प्यातही येत नाही. असाच काहीसा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात सुरु आहे. जिल्ह्यातील ३ हजार ९९८ वनजमीन प्रकल्पांच्या घशात गेली असल्याने या वनभूमीवरचे हजारो वन्यजीव विस्थापित झाले आहेत. हे लक्षात घेता, पर्यावरण बिघडल्याच्या नावाने कंठशोष करणाऱ्यांनी त्या विस्थापित वन्यजीवांच्या पुनर्वसनासाठी काय केले, याचा शोध घेण्याची गरज यंदाच्या पर्यावरण दिानच्या निमीत्ताने निर्माण झाली आहे.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण ४६ प्रकल्प वनजमीनीवर उभे आहेत. त्यापैकी कोळसा आणि अन्य खाणीमध्ये ३ हजार ७०२.३८२४ हेक्टर वनजमीन गेली आहे. या खाणी जिल्ह्यातील जंगलाच्या छातीवर पार रोऊन उभ्या झाल्या आहेत.जिल्ह्यातील १८ सिंचन प्रकल्प हरितक्रांतीचा आव आणत असले तरी, त्यात १ हजार ११०.२९७५ हेक्टर वनजमीन बुडाली आहे. मात्र सिंचनाचा लाभ किती क्षेत्रावर होत आहे, हा विषय अध्ययनासाठी महत्वाचा ठरावा असा आहे.विजेच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्हा देशात चमकत आहे. वीज उत्पादानाच्या नावाखाली नेतेमंडळी, प्रशासन आणि उद्योजक स्वत:ची पाठ थोपटून घेत असले तरी, या प्रकल्पांची वीज वाहून नेणाऱ्या वाहिण्यांसाठीही १८५.६४२१ हेक्टर वनजमीनीची आहुती द्यावी लागली आहे. अशी एकूण ३ हजार ९९८ हेक्टर वनजमीन वाहिण्यांच्या उभारणीसाठी कामी आली आहे. मात्र यामुळे जिल्ह्यात पर्यावरणाचा झालेला ऱ्हास आणि वन्यजीवांची होरपळ अद्यापही कुणी गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. चंद्रपूर हा व्याघ्रजिल्हा म्हणून ओळखला जातो. देशभरात असलेल्या ४५ व्याघ्रप्रकल्पांपैकी चंद्रपुरात सर्वाधिक वाघ आहेत. जिल्ह्यातील जंगलात १ हजार ७४५ गावे वसलेली त्यातील ८३५ गावे तर अगदी घनदाट जंगलालगत आहेत. या सर्व गावांमध्ये ६९ हजार ८२६ कुटूंंब राहतात. या सर्वांना वन्यजीवांच्या दहशतीमध्ये वावरावे लागत आहे. जंगलालगतच शेती असल्याने घराबाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नाही. परिणामत: केव्हा वन्यजीवांचा हल्ला होईल याचा नेम राहिलेला नाही.जंगलात वाढलेले पर्यटन, पर्यटकांचा धुडगुस, जंगलातील कोळसा खाणी, अतिक्रमणे यामुळे ही स्थिती उद्भवली हे मान्य करावेच लागेल. जनजागृती वाढविणे जरजेचे आहे. जंगलव्याप्त गावांभोवती सोलर कुंपण करायला हवे. गावाबाहेर शौचास जाणे टाळून शौचालयाचा वापर नागरिकांनी करायला हवा. -प्रा. योगेश दुधपचारेग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर.१२ वर्षात १३५ माणसांचा बळी मागील २००२ ते २०१४ या १२ वर्षांच्या काळात विविध घटनांमध्ये १३५ जणांना प्राण गमवावा लागला आहे. अधिकृत नोंदीनुसार वाघाच्या हल्ल्यात ६३ ठार झाले. बिबटाच्या हल्ल्यात २१ ठार झालेत. सर्वाधिक मृत्यू वाघ-बिबटांमुळे घडले आहेत. रानडुकराच्या हल्ल्यतही १७ जण दगावल्याची नोंद आहे. वन्यजीव संघर्षाच्या तीन हजारांवर घटना गेल्या चार वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता वन्यजीव संघर्षाच्या १५ हजार ३२१ घटना घडल्याचे दिसते. केवळ चार वर्षात एवढ्या घटना असतील तर, मागचा भूतकाळ कसा रक्तरंजीत असेल याचा विचारच न केलेला बरा ! या चार वर्षात ४७३ व्यक्ती घायाळ झाले, ४ हजार ३०२ गुरांचा बळी गेला. संघर्ष नवा नाही मानव वन्यजीव संघर्ष नवा नाही. अनादी काळापासून तो चालत आला आहे. जंगलाला माणसानी देव मानले. वृक्षांची पूजा केली. संस्कृतीने प्राण्यांनाही पुजले. तरही हा संघर्ष थांबलेला नाही; थांबणारही नाही. त्याचे दोषारोपण कुणाच्या माथ्यावर थोपविण्यापेक्षा शासनाने जनजागृजी वाढविणे गरजेचे आहे. वन्यजीवांनी कुठं जायचं ?वन्यजीव गावाकडे येतात हे खरे असले तरी त्यांनी जायचे कुठे, या प्रश्नाची उत्तर सध्यातरी कुणाकडेच नाही. प्रकल्प आणि विकासाच्या नावाखाली माणसांनी जंगल तोडले. वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला. कॅरिडोर वाढला. या कॅरिडोरमध्ये येणारी गावे आता त्यांचे लक्ष्य ठरत आहे. वनजमीन प्रकल्पांच्या उभारणीसाठी उपयोगात आणताना तेवढे जंगल मात्र उभे झाले नाही. जंगलातील जनावरे गावात शिरायला लागली. पीकांची नासाडी, माणसांवर हल्ले हे प्रकार नित्याचे झाले. त्यातून कधी माणसांवर हल्ले तर कधी वन्यजीवांची हत्या असे सत्र सुरू झाले. या १२ वर्षांच्या काळात १३५ लोकांना आपला जीव गमवावा लागला. जीवाचे मोल भरून निघणारे नसल्याने या जखमा आप्तेष्टांच्या मनात अजुनही ओल्याच आहेत.