शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

४९९८ हेक्टर वनभूमीवर उभे आहेत प्रकल्प

By admin | Updated: June 5, 2015 01:08 IST

जिल्ह्यात मानव आणि वन्यजीवांच्या संघर्ष उडाला की चर्चा केवळ मानव-वन्य जीव संघर्षाचीच होते.

वन्यजीव घुसताहेत गावात : १२ वर्षात १३५ माणसांचे बळीपर्यावरण दिन विशेषगोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूरजिल्ह्यात मानव आणि वन्यजीवांच्या संघर्ष उडाला की चर्चा केवळ मानव-वन्य जीव संघर्षाचीच होते. मात्र वन्यजीवांच्या अधिवासात माणसांनी प्रकल्पाच्या नावाखाली थाटलेला व्यवसाय कुणाच्या नजरेच्या टप्प्यातही येत नाही. असाच काहीसा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात सुरु आहे. जिल्ह्यातील ३ हजार ९९८ वनजमीन प्रकल्पांच्या घशात गेली असल्याने या वनभूमीवरचे हजारो वन्यजीव विस्थापित झाले आहेत. हे लक्षात घेता, पर्यावरण बिघडल्याच्या नावाने कंठशोष करणाऱ्यांनी त्या विस्थापित वन्यजीवांच्या पुनर्वसनासाठी काय केले, याचा शोध घेण्याची गरज यंदाच्या पर्यावरण दिानच्या निमीत्ताने निर्माण झाली आहे.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण ४६ प्रकल्प वनजमीनीवर उभे आहेत. त्यापैकी कोळसा आणि अन्य खाणीमध्ये ३ हजार ७०२.३८२४ हेक्टर वनजमीन गेली आहे. या खाणी जिल्ह्यातील जंगलाच्या छातीवर पार रोऊन उभ्या झाल्या आहेत.जिल्ह्यातील १८ सिंचन प्रकल्प हरितक्रांतीचा आव आणत असले तरी, त्यात १ हजार ११०.२९७५ हेक्टर वनजमीन बुडाली आहे. मात्र सिंचनाचा लाभ किती क्षेत्रावर होत आहे, हा विषय अध्ययनासाठी महत्वाचा ठरावा असा आहे.विजेच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्हा देशात चमकत आहे. वीज उत्पादानाच्या नावाखाली नेतेमंडळी, प्रशासन आणि उद्योजक स्वत:ची पाठ थोपटून घेत असले तरी, या प्रकल्पांची वीज वाहून नेणाऱ्या वाहिण्यांसाठीही १८५.६४२१ हेक्टर वनजमीनीची आहुती द्यावी लागली आहे. अशी एकूण ३ हजार ९९८ हेक्टर वनजमीन वाहिण्यांच्या उभारणीसाठी कामी आली आहे. मात्र यामुळे जिल्ह्यात पर्यावरणाचा झालेला ऱ्हास आणि वन्यजीवांची होरपळ अद्यापही कुणी गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. चंद्रपूर हा व्याघ्रजिल्हा म्हणून ओळखला जातो. देशभरात असलेल्या ४५ व्याघ्रप्रकल्पांपैकी चंद्रपुरात सर्वाधिक वाघ आहेत. जिल्ह्यातील जंगलात १ हजार ७४५ गावे वसलेली त्यातील ८३५ गावे तर अगदी घनदाट जंगलालगत आहेत. या सर्व गावांमध्ये ६९ हजार ८२६ कुटूंंब राहतात. या सर्वांना वन्यजीवांच्या दहशतीमध्ये वावरावे लागत आहे. जंगलालगतच शेती असल्याने घराबाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नाही. परिणामत: केव्हा वन्यजीवांचा हल्ला होईल याचा नेम राहिलेला नाही.जंगलात वाढलेले पर्यटन, पर्यटकांचा धुडगुस, जंगलातील कोळसा खाणी, अतिक्रमणे यामुळे ही स्थिती उद्भवली हे मान्य करावेच लागेल. जनजागृती वाढविणे जरजेचे आहे. जंगलव्याप्त गावांभोवती सोलर कुंपण करायला हवे. गावाबाहेर शौचास जाणे टाळून शौचालयाचा वापर नागरिकांनी करायला हवा. -प्रा. योगेश दुधपचारेग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर.१२ वर्षात १३५ माणसांचा बळी मागील २००२ ते २०१४ या १२ वर्षांच्या काळात विविध घटनांमध्ये १३५ जणांना प्राण गमवावा लागला आहे. अधिकृत नोंदीनुसार वाघाच्या हल्ल्यात ६३ ठार झाले. बिबटाच्या हल्ल्यात २१ ठार झालेत. सर्वाधिक मृत्यू वाघ-बिबटांमुळे घडले आहेत. रानडुकराच्या हल्ल्यतही १७ जण दगावल्याची नोंद आहे. वन्यजीव संघर्षाच्या तीन हजारांवर घटना गेल्या चार वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता वन्यजीव संघर्षाच्या १५ हजार ३२१ घटना घडल्याचे दिसते. केवळ चार वर्षात एवढ्या घटना असतील तर, मागचा भूतकाळ कसा रक्तरंजीत असेल याचा विचारच न केलेला बरा ! या चार वर्षात ४७३ व्यक्ती घायाळ झाले, ४ हजार ३०२ गुरांचा बळी गेला. संघर्ष नवा नाही मानव वन्यजीव संघर्ष नवा नाही. अनादी काळापासून तो चालत आला आहे. जंगलाला माणसानी देव मानले. वृक्षांची पूजा केली. संस्कृतीने प्राण्यांनाही पुजले. तरही हा संघर्ष थांबलेला नाही; थांबणारही नाही. त्याचे दोषारोपण कुणाच्या माथ्यावर थोपविण्यापेक्षा शासनाने जनजागृजी वाढविणे गरजेचे आहे. वन्यजीवांनी कुठं जायचं ?वन्यजीव गावाकडे येतात हे खरे असले तरी त्यांनी जायचे कुठे, या प्रश्नाची उत्तर सध्यातरी कुणाकडेच नाही. प्रकल्प आणि विकासाच्या नावाखाली माणसांनी जंगल तोडले. वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला. कॅरिडोर वाढला. या कॅरिडोरमध्ये येणारी गावे आता त्यांचे लक्ष्य ठरत आहे. वनजमीन प्रकल्पांच्या उभारणीसाठी उपयोगात आणताना तेवढे जंगल मात्र उभे झाले नाही. जंगलातील जनावरे गावात शिरायला लागली. पीकांची नासाडी, माणसांवर हल्ले हे प्रकार नित्याचे झाले. त्यातून कधी माणसांवर हल्ले तर कधी वन्यजीवांची हत्या असे सत्र सुरू झाले. या १२ वर्षांच्या काळात १३५ लोकांना आपला जीव गमवावा लागला. जीवाचे मोल भरून निघणारे नसल्याने या जखमा आप्तेष्टांच्या मनात अजुनही ओल्याच आहेत.