शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या 370 ऑनलाईन तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ७६, २९८ कर्जदार व बिगर कर्जदार २० हजार ७२३ शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. यासाठी शेतक-यांनी ७ कोटी २९ लाख,  केंद्र सरकार व राज्य सरकारकडून प्रत्येकी  १३ कोटी, ९७ लाखांचे अनुदान असे एकूण ३५ कोटी २३ लाखांचा विमा हप्ता मंजूर झाला. पीक विम्यामुळे  ६९ हजार २३३. ९८ हेक्टर शेती विमा संरक्षित झाली. स्थानिक नैसगीर्क आपत्ती व काढणी पश्चात पिकांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देप्रधानमंत्री पीक विमा योजना : ६९,२३३ हेक्टर क्षेत्र बाधित

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामात जिल्ह्यातील ९७ हजार २१ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत विमा काढला. विमा हप्त्याची रक्कम २९४ कोटी एवढी आहे. हंगातील प्रतिकूल स्थितीमुळे विमाधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ३७० शेतकऱ्यांनी ७२ तासात विमा कपंनीकडे ऑनलाईन तक्रारी केल्या. प्रशासनाकडून जलदगतीने पाठपुरावा झाला. मात्र, भरपाई अद्याप मिळाली नाही.  जिल्ह्यात ७६, २९८ कर्जदार व बिगर कर्जदार २० हजार ७२३ शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. यासाठी शेतक-यांनी ७ कोटी २९ लाख,  केंद्र सरकार व राज्य सरकारकडून प्रत्येकी  १३ कोटी, ९७ लाखांचे अनुदान असे एकूण ३५ कोटी २३ लाखांचा विमा हप्ता मंजूर झाला. पीक विम्यामुळे  ६९ हजार २३३. ९८ हेक्टर शेती विमा संरक्षित झाली. स्थानिक नैसगीर्क आपत्ती व काढणी पश्चात पिकांचे नुकसान झाले.  ३७० शेतक-यांनी ७२ तासात ऑनलाईन तयारी केल्या.  जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने लगेच पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे सवेक्षणाचे काम पूर्ण झाले. परंतु विमा कंपन्यांकडून मदत मिळाली नाही.

तक्रारदार सर्वच शेतकऱ्यांचे पंचनामेप्रधानमंत्री पीक विमा काढणा-या शेतक-यांनी ऑनलाईन तक्रारी केल्यानंतर कृषी व महसूल विभागाने तातडीने दखल घेतली. पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला. नैसगीर्क आपत्ती २६४, प्रतिकूल हंगाम ९ हजार ५८५ व पीक काढणी पश्चात नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळाल्याने खरीप हंगामात दिलासा मिळाला आहे.

९,५८५ शेतकऱ्यांना भरपाईयंदाच्या खरीप हंगामात स्थानिक नैसगीर्क आपत्तीमुळे ब्रह्मपुरी तालुक्यात मोठे नुकसान झाले. वैनगंगा नदीला पूर आल्याने शेती उद्धवस्त झाली. प्रशासनाकडे लगेच कार्यवाही केली. त्यामुळे ९ हजार ५८५ शेतक-यांना भरपाई मिळाली. हंगामातील प्रतिकूलता व काढणी पश्चात नुकसानीचीही भरपाई लवकरच मिळणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा काढणाºया सर्व शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली. संपर्क साधणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य माहिती दिली जात आहे. सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले. शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार आहे.- डॉ. उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा