शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

मनपा निवडणुकीसाठी ३६७ मतदान केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 00:43 IST

१९ एप्रिलला होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

भरारी पथके ठेवणार लक्ष : ३,०२०५७ मतदार बजावणार मतदानाचा हक्कचंद्रपूर : १९ एप्रिलला होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने सर्व व्यवस्था केली असून राज्याचे प्रधान सचिव यांनी या निवडणूक प्रक्रियेचा आढावाही घेतला आहे. मतदान प्रक्रियेसाठी शहरात ३६७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात तब्बल २६ केंद्र संवेदनशिल असून पाच भरारी पथक सातत्याने या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे.ए. साहरिया यांनी आज रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.चंद्रपूर शहरात सध्या मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. १९ एप्रिलला या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर २१ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी आज मनपाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर शहराची लोकसंख्या तीन लाख २० हजार ३७९ आहे. यातील मतदारांची संख्या तीन लाख २ हजार ५७ असून यात एक लाख ५४ हजार ७४७ पुरुष तर एक लाख ४७ हजार ३०१ महिला मतदार आहेत. १४१ इमारतींमध्ये या मतदार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मतदारांसाठी सर्व सोईसुविधा असणार आहे. याशिवाय दिव्यांगाकरिता रॅम्पची विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३६७ केंद्रांसाठी ४४० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय पाच भरारी पथके, १२ चेक पोस्ट असणार आहेत. भरारी पथके सातत्याने पूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतील. १२ ठिकाणी नाकाबंदी करून २४ तास वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.निवडणुकीदरम्यान गैर प्रकाराचा अवलंब होणार नाही. तसेच कुठेही गोंधळ व संशयाची स्थिती निर्माण होणार नाही, यासाठी भरारी पथकासह पोलीस विभाग दक्ष राहणार आहे. भरारी पथके व्यवस्थितपणे काम करताहेत किंवा नाही याची वारंवार पाहणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी वनविभाग व आपातकालीन विभागाचीही मदत घेतली जाणार आहे. जिल्हयाच्या चहुबाजूस वनक्षेत्र आहे. या वनांचा आधार घेत निवडणुकीत गैरप्रकार होऊ नये यासाठी वनविभाग आपले स्वतंत्र तपासणी नाके लावून तपासणी करणार आहेत, अशी माहितीही सहारिया यांनी यावेळी दिली.पत्रकार परिषदेला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, मनपा आयुक्त संजय काकडे, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अप्पर पोलीस अधिक्षक हेमराज राजपूत आदी उपस्थित होते.आयुक्तांनी घेतल्या तीन बैठकाराज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आज रविवारी निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेताना लागोपाठ तीन बैठका घेतल्या. पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय व मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सहारिया यांनी सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान स्लिपचे १०० टक्के वाटप करण्याची सूचनाही त्यांनी केली. त्यानंतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी पक्षाच्या वतीने दक्षता घेणे आवश्यक असलेल्या बाबी आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. निवडणूक प्रक्रिया अधिक चांगल्या पध्दतीने पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले. त्यानंतर तिसरी बैठक प्रसारमाध्यमांसोबत आयोजित करण्यात आली.व्हीव्हीपॅटची व्यवस्था नाहीइव्हीएम मशीनबाबत मागील काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र या मशीनमध्ये घोळ होणे शक्य नसल्याचे राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी स्पष्ट केले. काही जणांनी इव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅटची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र एकाच मशीनमध्ये चार जणांना मतदान करायचे असल्याने व्हीव्हीपॅटची व्यवस्था यावेळी शक्य नसल्याचेही सहारिया यांनी सांगितले. ही व्यवस्था २०१९ पर्यंत अमलात येण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.