शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

इरई धरणात ३० टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:52 IST

यंदाचा पावसाळा जिल्ह्याला चांगल्याच वाकुल्या देऊन गेला. सरासरीच्या ५० टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जलसाठ्या पाणी साठू शकले नाही.

ठळक मुद्देमनपाने गंभीर व्हावे : चंद्रपूरकरांवर पाणी टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदाचा पावसाळा जिल्ह्याला चांगल्याच वाकुल्या देऊन गेला. सरासरीच्या ५० टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जलसाठ्या पाणी साठू शकले नाही. चंद्रपूरकरांना पाणी पुरवठा करणाºया इरई धरणात आता नोव्हेंबर महिन्यातच केवळ ३०.४४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच चंद्रपूरकरांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.चंद्रपूरकरांची तहान भागविण्यासाठी दररोज ४० दशलक्ष मीटर पाण्याची गरज आहे. चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेली पाईप लाईन ६० वर्ष जुनी असून खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन केव्हाच कालबाह्य झाल्याचे महापालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. असे असताना त्याच पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाईप लाईन लिकेज होऊन सद्यस्थितीत अतिशय अनमोल असलेल्या पाण्याचा अपव्यय होत आहे.मागील वर्षीच शेतकºयांच्या हातचे असले नसले अस्मानी संकटाने हिरावून घेतल्याने यावेळी वरूणराजा वक्रदृष्टी पाडणार नाही, अशी अपेक्षा शेतकºयांची होती. या आशेवरच शेतकºयांनी यंदा मशागतपूर्व शेतीची कामे केली. हवामान खात्यानेही यंदा चांगला पाऊस बरसेल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र हा अंदाज वरूणराजाने फोल ठरविला. ज्यावेळी पावसाची गरज होती, त्यावेळीही पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकºयांना दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली. मध्यंतरीच्या काळात बºयापैकी पाऊस पडला. मात्र तेवढ्या पावसाने जलसाठ्यात मुबलक पाणी साठू शकले नाही. त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. अगदी परतीचा पाऊसही समाधानकारक पडला नाही. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हवा त्यावेळी पाऊस न पडल्याने पिकांवर रोगराईचे आक्रमण झाले. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाºया महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणात २०३.८२५ मीटर पाणी आहे. म्हणजेच केवळ ३०.४४ टक्के पाणी आहे. दर तीन-चार दिवसात ०.२५ मीटरने धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. हिवाळ्यातील नोव्हेंबर महिन्यातच धरणाची अशी भयावह स्थिती आहे. विशेष म्हणजे, याच धरणातून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रही पाणी घेते. त्यामुळे धरणातील पाणी आणखी किती दिवस चंद्रपूर शहर व वीज केंद्राची गरज भागवू शकेल, याचा कुणालाही अंदाज येईल. हिवाळ्यात चंद्रपूरकरांना कसेबसे पाणी मिळू शकेल. मात्र उन्हाळ्याच्या प्रारंभीच यंदा चंद्रपूरकरांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.इतर धरणेही चिंताजनकचयंदा अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. नोव्हेंबर महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला आहे. जिल्ह्यातील ११ धरणापैकी अनेक धरणात ५० टक्क्याहून कमी जलसाठा शिल्लक आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासन याबाबत गंभीर असल्याचे दिसून येत नाही. त्यांचा अद्याप पाणी टंचाई आराखडा तयार झालेला नाही.