शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

इरई धरणात ३० टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:52 IST

यंदाचा पावसाळा जिल्ह्याला चांगल्याच वाकुल्या देऊन गेला. सरासरीच्या ५० टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जलसाठ्या पाणी साठू शकले नाही.

ठळक मुद्देमनपाने गंभीर व्हावे : चंद्रपूरकरांवर पाणी टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदाचा पावसाळा जिल्ह्याला चांगल्याच वाकुल्या देऊन गेला. सरासरीच्या ५० टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जलसाठ्या पाणी साठू शकले नाही. चंद्रपूरकरांना पाणी पुरवठा करणाºया इरई धरणात आता नोव्हेंबर महिन्यातच केवळ ३०.४४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच चंद्रपूरकरांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.चंद्रपूरकरांची तहान भागविण्यासाठी दररोज ४० दशलक्ष मीटर पाण्याची गरज आहे. चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेली पाईप लाईन ६० वर्ष जुनी असून खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन केव्हाच कालबाह्य झाल्याचे महापालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. असे असताना त्याच पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाईप लाईन लिकेज होऊन सद्यस्थितीत अतिशय अनमोल असलेल्या पाण्याचा अपव्यय होत आहे.मागील वर्षीच शेतकºयांच्या हातचे असले नसले अस्मानी संकटाने हिरावून घेतल्याने यावेळी वरूणराजा वक्रदृष्टी पाडणार नाही, अशी अपेक्षा शेतकºयांची होती. या आशेवरच शेतकºयांनी यंदा मशागतपूर्व शेतीची कामे केली. हवामान खात्यानेही यंदा चांगला पाऊस बरसेल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र हा अंदाज वरूणराजाने फोल ठरविला. ज्यावेळी पावसाची गरज होती, त्यावेळीही पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकºयांना दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली. मध्यंतरीच्या काळात बºयापैकी पाऊस पडला. मात्र तेवढ्या पावसाने जलसाठ्यात मुबलक पाणी साठू शकले नाही. त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. अगदी परतीचा पाऊसही समाधानकारक पडला नाही. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हवा त्यावेळी पाऊस न पडल्याने पिकांवर रोगराईचे आक्रमण झाले. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाºया महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणात २०३.८२५ मीटर पाणी आहे. म्हणजेच केवळ ३०.४४ टक्के पाणी आहे. दर तीन-चार दिवसात ०.२५ मीटरने धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. हिवाळ्यातील नोव्हेंबर महिन्यातच धरणाची अशी भयावह स्थिती आहे. विशेष म्हणजे, याच धरणातून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रही पाणी घेते. त्यामुळे धरणातील पाणी आणखी किती दिवस चंद्रपूर शहर व वीज केंद्राची गरज भागवू शकेल, याचा कुणालाही अंदाज येईल. हिवाळ्यात चंद्रपूरकरांना कसेबसे पाणी मिळू शकेल. मात्र उन्हाळ्याच्या प्रारंभीच यंदा चंद्रपूरकरांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.इतर धरणेही चिंताजनकचयंदा अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. नोव्हेंबर महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला आहे. जिल्ह्यातील ११ धरणापैकी अनेक धरणात ५० टक्क्याहून कमी जलसाठा शिल्लक आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासन याबाबत गंभीर असल्याचे दिसून येत नाही. त्यांचा अद्याप पाणी टंचाई आराखडा तयार झालेला नाही.