शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

इरई धरणात ३० टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:52 IST

यंदाचा पावसाळा जिल्ह्याला चांगल्याच वाकुल्या देऊन गेला. सरासरीच्या ५० टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जलसाठ्या पाणी साठू शकले नाही.

ठळक मुद्देमनपाने गंभीर व्हावे : चंद्रपूरकरांवर पाणी टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदाचा पावसाळा जिल्ह्याला चांगल्याच वाकुल्या देऊन गेला. सरासरीच्या ५० टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जलसाठ्या पाणी साठू शकले नाही. चंद्रपूरकरांना पाणी पुरवठा करणाºया इरई धरणात आता नोव्हेंबर महिन्यातच केवळ ३०.४४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच चंद्रपूरकरांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.चंद्रपूरकरांची तहान भागविण्यासाठी दररोज ४० दशलक्ष मीटर पाण्याची गरज आहे. चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेली पाईप लाईन ६० वर्ष जुनी असून खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन केव्हाच कालबाह्य झाल्याचे महापालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. असे असताना त्याच पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाईप लाईन लिकेज होऊन सद्यस्थितीत अतिशय अनमोल असलेल्या पाण्याचा अपव्यय होत आहे.मागील वर्षीच शेतकºयांच्या हातचे असले नसले अस्मानी संकटाने हिरावून घेतल्याने यावेळी वरूणराजा वक्रदृष्टी पाडणार नाही, अशी अपेक्षा शेतकºयांची होती. या आशेवरच शेतकºयांनी यंदा मशागतपूर्व शेतीची कामे केली. हवामान खात्यानेही यंदा चांगला पाऊस बरसेल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र हा अंदाज वरूणराजाने फोल ठरविला. ज्यावेळी पावसाची गरज होती, त्यावेळीही पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकºयांना दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली. मध्यंतरीच्या काळात बºयापैकी पाऊस पडला. मात्र तेवढ्या पावसाने जलसाठ्यात मुबलक पाणी साठू शकले नाही. त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. अगदी परतीचा पाऊसही समाधानकारक पडला नाही. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हवा त्यावेळी पाऊस न पडल्याने पिकांवर रोगराईचे आक्रमण झाले. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाºया महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणात २०३.८२५ मीटर पाणी आहे. म्हणजेच केवळ ३०.४४ टक्के पाणी आहे. दर तीन-चार दिवसात ०.२५ मीटरने धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. हिवाळ्यातील नोव्हेंबर महिन्यातच धरणाची अशी भयावह स्थिती आहे. विशेष म्हणजे, याच धरणातून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रही पाणी घेते. त्यामुळे धरणातील पाणी आणखी किती दिवस चंद्रपूर शहर व वीज केंद्राची गरज भागवू शकेल, याचा कुणालाही अंदाज येईल. हिवाळ्यात चंद्रपूरकरांना कसेबसे पाणी मिळू शकेल. मात्र उन्हाळ्याच्या प्रारंभीच यंदा चंद्रपूरकरांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.इतर धरणेही चिंताजनकचयंदा अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. नोव्हेंबर महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला आहे. जिल्ह्यातील ११ धरणापैकी अनेक धरणात ५० टक्क्याहून कमी जलसाठा शिल्लक आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासन याबाबत गंभीर असल्याचे दिसून येत नाही. त्यांचा अद्याप पाणी टंचाई आराखडा तयार झालेला नाही.