शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

२७५ गावांना शांतता पुरस्काराची प्रतीक्षा

By admin | Updated: January 9, 2017 00:41 IST

राज्य शासनाच्या निर्देशानुसार गावोगावात तंटामुक्त समित्या कार्यरत आहेत.

तंटामुक्त गाव अभियान : राज्य शासनाने दखल घेण्याची मागणीचंद्रपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार गावोगावात तंटामुक्त समित्या कार्यरत आहेत. ज्या समित्यांकडून चांगले कार्य झाले अशा, समित्यांना शासनाकडून शांतता पुरस्कार देऊन गौरव केला जातो. शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील साडेपाचशेंवर गावांना मागील नऊ वर्षात शांतता पुरस्कार प्राप्त झाला. मात्र यापैकी अद्यापही अडीचशेहून अधिक गावे शांतता पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहेत.दहा वर्षापूर्वी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान शासनाने सुरू केले. या अभियानाच्या माध्यमातून गावातील तंटे गावात मिटू लागले. गावांना प्रोत्साहन मिळावे, गावांनी या मोहिमेत मोठ्या संख्येत सहभागी व्हावे म्हणून गावांना पुरस्कार देण्याचीही तरतूद शासनाने अभियानात केली. पुरस्कारासाठी गावात स्थापन तंटामुक्त समितीने केलेल्या वर्षभरातील कामगिरीचे मुल्यमापन करून गुणदान केले जाते. यासाठी तालुकाबाह्य आणि जिल्हाबाह्य समितीद्वारे गावांचे मूल्यमापन केले जाते. मूल्य मापनासाठी २०० गुणांचे निकष ठेवण्यात आले. यात तंटे निवारण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी ८०, दाखल तंटे मिटविणे यासाठी १०० तर नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे यासाठी २० गुण ठेवण्यात आले आहे. तंटामुक्त गाव जाहीर होण्यासाठी अनुक्रमे ५६, ७०, १४ गुण मिळणे आवश्यक आहे. मूल्यमापनात किमान गुणांची बेरीज १४० येत असेल तर गाव तंटामुक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात येते. तंटामुक्त जाहीर गावांना त्यांच्या लोकसंख्येवर आधारित पुरस्कार दिला जातो. तर १९० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना पुरस्काराशिवाय मिळालेल्या रकमेच्या २५ टक्के रक्कम अधिक दिली जाते. २००७ पासून जिल्ह्यातील ५७५ गावांना तंटामुक्त शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला असून उर्वरित गावे प्रतीक्षेत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)१२ पोलीस ठाणे तंटामुक्त घोषिततंटामुक्त अभियानाच्या मागील दहा वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील १२ पोलीस ठाणे संपूर्ण तंटामुक्त घोषित करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस विभागाचे सहा उपविभाग आहेत. या उपविभागाअंतर्गत ३२ पोलीस ठाणे येतात. चंद्रपूर उपविभागातील चंद्रपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत सात गावांचा समावेश असून ही सातही गावे तंटामुक्त झाली आहेत. उपविभाग मूलअंतर्गत पोंभूर्णा पोलीस ठाण्यात २० गावांचा समावेश असून ही संपूर्ण गावे तंटामुक्त घोषित झाली आहेत. उमरी पोलीस ठाणे हद्दीतील चारही गावे तंटामुक्त जाहीर करण्यात आली आहेत. राजुरा पोलीस ठाणे हद्दीतील तब्बल ४३ गावांना शांतता पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासोबत राजुरा उपविभागातील गोंडपिपरी, धाबा, लाठी, कोठारी, विरूर, गडचांदूर उपविभागातील गडचांदूर, पाटण, पिट्टीगुडा, भारी, टेकामांडवा आदी पोलीस ठाणे संपूर्ण तंटामुक्त घोषित करण्यात आली आहेत.