शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
4
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
5
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
6
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
7
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
8
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
9
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
10
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
11
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
12
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
13
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
14
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
15
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
16
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
17
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
18
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
19
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
20
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती

२५ शेतकऱ्यांनी फुलवली जवसाची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 05:00 IST

१५ ते २० वर्षांपूर्वी रब्बी हंगामात जवस लागवड हमखास केली जायची. उत्तम आरोग्यासाठी जवस तेलाचा वापर दररोजच्या आहारात केला जात होता. सांधेदुखी, पाठदुखीचा त्रास कमी करण्यास मदत होत होती. परंतु कालांतराने सोयाबीन व पाम तेलाचा वापर वाढल्यामुळे जवसाचे क्षेत्र कमी होत गेले. सद्यस्थितीत जवसाचे बियाणे उपलब्ध होत नसल्याने लोकांचा कल नगदी पिकाकडे वळला आहे.

प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तालुक्यातील मंडल कृषी अधिकारी, शेगांव (बु.) आत्मा प्रकल्प, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पारंपरिक पीक पद्धतीअंतर्गत शेगाव मंडलातील सोनेगाव व पिंपळगाव येथे जवस पीक प्रात्यक्षिक राबविण्यात आले. त्यानुसार गावातील २५ शेतकऱ्यांनी सेंद्रिय व जैविक पध्दतीने मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधित वाण एलएसएल - ९३ची प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर पेरणी केली आहे.भारतात अन्नधान्य भरपूर असले तरी गळीत धान्य मोठया प्रमाणात आयात करावे लागते. त्यामुळे गळीत धान्याचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने मंडल कृषी अधिकारी, शेगांव बु. अंतर्गत मागील चार वर्षात भुईमूग, मोहरी, तीळ, जवस या पिकाचे विविध प्रयोग राबवून गळीत धान्य क्षेत्र वाढ करण्याचे कार्य अविरत सुरू आहे.सेंद्रिय शेतीमध्ये सदैव कार्यरत असलेले पिंपळगाव येथील शेतकरी  नत्थू गारघाटे यांनी सांगितले की, पांढरी फुले असलेली व भरपूर फुटवे असलेल्या या जवस वाणांचे उत्पादन निश्चितच पाच ते सहा क्विंटल प्रतिएकरी येणार आहे.या गावाचे शेतकरी  अशोक भिमटे, संदीप भोगेकर, वंदना गारघाटे, मुरलीधर भोंगळे, सोनेगाव येथील प्रगतशील शेतकरी जयंत बुराण, राहुल खिरटकर, देविदास लिल्हारे, कवडू ठाकरे, वसंता बुराण आदी शेतकऱ्यांनी यावर्षीच्या लागवडीमधून उत्पादित होणाऱ्या जवसापासून गटाच्या माध्यमातून लाकडी तेलघाण्याच्या साहाय्याने तेल काढून विक्री करण्याचा मानस बोलून दाखविला. तसेच शिल्लक साठा बियाणे म्हणून पुढील हंगामात इतर शेतकऱ्यांना पुरवठा करणार आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बरहाटे व प्रकल्प उपसंचालक (आत्मा)  रवींद्र मनोहरे  यांच्या मार्गदर्शनात मंडल कृषी अधिकारी विजय काळे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल घागी यांच्या नियोजनातून  वरोरा तालुक्यात जवस लागवड क्षेत्र वाढत आहे. शेगाव बु. मंडलातील कृषी सहाय्यक  पवन मडावी, लता दुर्गे, माधुरी राजूरकर, पवन मत्ते, पामलवाड, डोळस आदी गळीत धान्य क्षेत्र वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत.

जवस तेलाचे अनेक फायदे१५ ते २० वर्षांपूर्वी रब्बी हंगामात जवस लागवड हमखास केली जायची. उत्तम आरोग्यासाठी जवस तेलाचा वापर दररोजच्या आहारात केला जात होता. सांधेदुखी, पाठदुखीचा त्रास कमी करण्यास मदत होत होती. परंतु कालांतराने सोयाबीन व पाम तेलाचा वापर वाढल्यामुळे जवसाचे क्षेत्र कमी होत गेले. सद्यस्थितीत जवसाचे बियाणे उपलब्ध होत नसल्याने लोकांचा कल नगदी पिकाकडे वळला आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी