शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

२५ शेतकऱ्यांनी फुलवली जवसाची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 05:00 IST

१५ ते २० वर्षांपूर्वी रब्बी हंगामात जवस लागवड हमखास केली जायची. उत्तम आरोग्यासाठी जवस तेलाचा वापर दररोजच्या आहारात केला जात होता. सांधेदुखी, पाठदुखीचा त्रास कमी करण्यास मदत होत होती. परंतु कालांतराने सोयाबीन व पाम तेलाचा वापर वाढल्यामुळे जवसाचे क्षेत्र कमी होत गेले. सद्यस्थितीत जवसाचे बियाणे उपलब्ध होत नसल्याने लोकांचा कल नगदी पिकाकडे वळला आहे.

प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तालुक्यातील मंडल कृषी अधिकारी, शेगांव (बु.) आत्मा प्रकल्प, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पारंपरिक पीक पद्धतीअंतर्गत शेगाव मंडलातील सोनेगाव व पिंपळगाव येथे जवस पीक प्रात्यक्षिक राबविण्यात आले. त्यानुसार गावातील २५ शेतकऱ्यांनी सेंद्रिय व जैविक पध्दतीने मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधित वाण एलएसएल - ९३ची प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर पेरणी केली आहे.भारतात अन्नधान्य भरपूर असले तरी गळीत धान्य मोठया प्रमाणात आयात करावे लागते. त्यामुळे गळीत धान्याचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने मंडल कृषी अधिकारी, शेगांव बु. अंतर्गत मागील चार वर्षात भुईमूग, मोहरी, तीळ, जवस या पिकाचे विविध प्रयोग राबवून गळीत धान्य क्षेत्र वाढ करण्याचे कार्य अविरत सुरू आहे.सेंद्रिय शेतीमध्ये सदैव कार्यरत असलेले पिंपळगाव येथील शेतकरी  नत्थू गारघाटे यांनी सांगितले की, पांढरी फुले असलेली व भरपूर फुटवे असलेल्या या जवस वाणांचे उत्पादन निश्चितच पाच ते सहा क्विंटल प्रतिएकरी येणार आहे.या गावाचे शेतकरी  अशोक भिमटे, संदीप भोगेकर, वंदना गारघाटे, मुरलीधर भोंगळे, सोनेगाव येथील प्रगतशील शेतकरी जयंत बुराण, राहुल खिरटकर, देविदास लिल्हारे, कवडू ठाकरे, वसंता बुराण आदी शेतकऱ्यांनी यावर्षीच्या लागवडीमधून उत्पादित होणाऱ्या जवसापासून गटाच्या माध्यमातून लाकडी तेलघाण्याच्या साहाय्याने तेल काढून विक्री करण्याचा मानस बोलून दाखविला. तसेच शिल्लक साठा बियाणे म्हणून पुढील हंगामात इतर शेतकऱ्यांना पुरवठा करणार आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बरहाटे व प्रकल्प उपसंचालक (आत्मा)  रवींद्र मनोहरे  यांच्या मार्गदर्शनात मंडल कृषी अधिकारी विजय काळे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल घागी यांच्या नियोजनातून  वरोरा तालुक्यात जवस लागवड क्षेत्र वाढत आहे. शेगाव बु. मंडलातील कृषी सहाय्यक  पवन मडावी, लता दुर्गे, माधुरी राजूरकर, पवन मत्ते, पामलवाड, डोळस आदी गळीत धान्य क्षेत्र वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत.

जवस तेलाचे अनेक फायदे१५ ते २० वर्षांपूर्वी रब्बी हंगामात जवस लागवड हमखास केली जायची. उत्तम आरोग्यासाठी जवस तेलाचा वापर दररोजच्या आहारात केला जात होता. सांधेदुखी, पाठदुखीचा त्रास कमी करण्यास मदत होत होती. परंतु कालांतराने सोयाबीन व पाम तेलाचा वापर वाढल्यामुळे जवसाचे क्षेत्र कमी होत गेले. सद्यस्थितीत जवसाचे बियाणे उपलब्ध होत नसल्याने लोकांचा कल नगदी पिकाकडे वळला आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी