शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बल्लारपूर स्थानकावर २४७ मुले व १९५ मुलींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 15:56 IST

Chandrapur : आरपीएफची 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' मोहिम

मंगल जीवनेलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : भारतीय रेल्वेतील रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) मागील सात वर्षांत 'नन्हे फरिश्ते' या ऑपरेशनचे नेतृत्व करून ८४ हजार ११९ मुलांची सुटका केली. यामध्ये बल्लारशाह रेल्वे स्थानकावर २४७ मुले व १९५ मुलींची सुटका करण्यात आली. जिल्हा बालकल्याण समितीला सुपूर्द करून समितीने त्या मुलांना पालकांच्या स्वाधीन केले आहे.

रेल्वे जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ ते मे २०२४ या सात वर्षांच्या काळात भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये पीडित मुलांना वाचवण्यासाठी 'नन्हे फरिश्ते' नावाचे मिशन सुरू आहे. यादरम्यान चुकीने रेल्वे गाडीत बसून आलेल्या मुला-मुलींची माहिती रेल्वे सुरक्षा दलास मिळताच ते तत्परतेने चाइल्ड लाइनच्या मदतीने बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात येते. १३५ च्या वर रेल्वे स्थानकावर चाइल्ड लाइन हेल्प डेस्क उपलब्ध आहेत.

अशी आहे आकडेवारी

  • २०१८ मध्ये 'ऑपरेशन नन्हें फरिश्ते'ची सुरुवात झाली. त्यावर्षी आरपीएफने एकूण १७ हजार ११२ मुला-मुलींची सुटका केली. २०१९ या वर्षात एकूण १५ हजार ९३२ मुला-मुलींची सुटका करण्यात आली. यात १२ हजार ७०८ पळून गेलेली, १ हजार ४५४ बेपत्ता, एक हजार ३६ विभक्त, ३५० निराधार, ५६ अपहरण, १२३ मतिमंद व १७१ बेघर बालके होती.
  • कोविड महामारीत (२०२०) सामान्य जीवन विस्कळीत झाले होते. त्याचा कामकाजावर लक्षणीय परिणाम झाला. या आव्हानांना न जुमानता आरपीएफने पाच हजार ११ मुलांची सुटका केली.
  • २०२१ या वर्षात ९६०१ पळून गेलेली मुले, ९६१ बेपत्ता, ६४८ विभक्त, ३७० निराधार, ७८ अपहरण, ८२ मानसिकदृष्ट्या अपंग, रस्त्यांवरील १२३ मुले होती. तर २०२२ मध्ये १७ हजार ७५६ व २०२३ मध्ये आठ हजार ९१६ मुले पळून गेली, ९८६ बेपत्ता, १० हजार ५५ विभक्त, २३६ निराधार, १५६ अपहरण, ११२ मानसिक अपंग, रस्त्यांवरील २३७ मुले होती.
  • २०२४ च्या पहिल्या पाच महिन्यांत आर- पीएफने चार हजार ६०७ मुलांची सुटका केली आहे. ज्यामध्ये तीन हजार ४३० पळून गेलेल्या मुलांची सुटका करण्यात आली आहे.

'ऑपरेशन नन्हें फरिश्ते' या ऑपरेशन तर्फे सात वर्षात ८४ हजार ११९ मुलांची सुटका केली आहे. कारवाईत आरपीएफ यासह चाइल्ड लाइन हेल्प डेस्कचे सुध्दा सहकार्य लाभत असते.- सुनील पाठक, आरपीएफ कार्यालय निरीक्षक, बल्लारशाह 

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करीchandrapur-acचंद्रपूर