शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

एका महिन्यात २४ पशुधन वाघांचे भक्ष्य

By admin | Updated: October 14, 2016 01:27 IST

ब्रह्मपुरी विभागाअंतर्गत येत असलेल्या एफडीसीएमच्या पाथरी वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वनाचे क्षेत्र आहे.

एफडीसीएम पाथरी वनपरिक्षेत्रातील घटना : वाढीव नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत दिलीप फुलबांधे  गेवराब्रह्मपुरी विभागाअंतर्गत येत असलेल्या एफडीसीएमच्या पाथरी वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वनाचे क्षेत्र आहे. दिवसेंदिवस वाघाचे वास्तव्यही वाढत आहेत. मागील सप्टेंबर-२०१६ मध्ये या परिक्षेत्रातील जवळपासच्या गावातील शेतकऱ्यांचे २४ पशुधन वाघांनी फस्त केले आहे.उसणवार चक येथील काशिनाथ वाकडे यांचा बैल जगदीश वाकडे यांचा बैल, उसरपार तुकुम येथील नथ्थु घरत यांचा बैल, मनोहर वाकडे यांचा बैल, मोहन घोडमारे यांची म्हैस, सावंगी चक येथील तुकाराम मडावी यांचा बैल, विरखल येथील त्र्यंबक सदाशिव मेश्राम व देवाजी गंडाटे यांचा बैल, अंतरगाव येथील जगन उंदिरवाडे यांचा बैल, मेहा बुज. येथील विलास भरडकर यांचा बैल, लिलाबाई कोलते यांचा बैल, मांगली चक येथील तुकाराम मडावी यांचा बैल, पाथरी येथील तुळशीराम जाधव यांची बकरी, मारोती नेवारे यांचा बैल, राघोजी मेश्राम यांची गाय, नथ्थू घरत यांचा बैल, शरद सोनवाने यांचा बैल, रेवन सुरपाम यांचा बैल, संजय मडावी यांचा बैल, देवराव सोनकर यांचा बैल, बेलगाव येथील दिवाकर कांबळे यांचा बैल, नवेगाव तुकूम काशिनाथ शेंडे यांचा बैल असे एकूण २४ पशुधन वनपरिसरातील वाघांनी फस्त केल्याने जवळपास या शेतकऱ्यांचे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे. सध्या स्थितीत वाघाच्या हल्ल्यात मृत जनावरांना वन विभागाने केवळ १५ हजार रुपयापर्यंतची तरतूद केली आहे. परंतु शेतकऱ्यांना पशुधनाच्या किंमती त्याहीपेक्षा अधिक असल्याने अल्प मोबदल्यामुळे फार मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. पाथरी वनपरिक्षेत्रातील केवळ १० गावातील २४ पशुधन वाघाचे भक्ष्य झाले. परंतु वनविकास महामंडळाच्यापेक्षा जास्त वन पाथरी उपक्षेत्राचा येतो. त्यामधील आकडेवारी यापेक्षाही मोठी आहे. त्यामुळे तुटपुंज्या नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांची फार मोठे नुकसान होत असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. राज्याचे वनमंत्र्यांनी केलेली घोषणा मृत बैलास २५ हजार रुपये ही सरसकट मदत तात्काळ अध्यादेश काढुन या शेतकऱ्यांना नवीन दराप्रमाणे द्यावी, अशी मागणी होत आहे.आदेश पोहोचला नाहीवाघांच्या हल्ल्यातील मृत पशुधन मालकाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकसान भरपाई म्हणून २५ हजार रुपये घोषणा केली आहे. परंतु पाथरी वनपरिक्षेत्र व वनविभागातील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या पशुधनाचे आकडेवारी लक्षात घेता संबंधीत विभागाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळण्यासाठी माहिती घेतली असता मंत्र्यानी केवळ घोषणा केलेली आहे. मात्र तसा अध्यादेश अजूनपर्यंत वन विभाग किंवा वनविकास महामंडळाकडे पोहचला नसल्याची माहिती प्राप्त झाली.