शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

७६४ पैकी २३३ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 22:15 IST

शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत असताना २००३ पासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची दुर्दैवी मालिका सुरूच असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालातून पुढे आले आहे. या अहवालानुसार २००१ ते २०१८ पर्यंत ७६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

ठळक मुद्दे१७ वर्षांतील स्थिती : कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत असताना २००३ पासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची दुर्दैवी मालिका सुरूच असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालातून पुढे आले आहे. या अहवालानुसार २००१ ते २०१८ पर्यंत ७६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ५१७ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पाच कोटी १७ लाखांची मदत देण्यात आली. ११ प्रकरणे फेर चौकशीसाठी प्रलंबित आहेत. मात्र, तब्बल २३३ प्रकरणे फेटाळल्याने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा अपेक्षाभंग झाला आहे.शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी सत्ताधाºयासंह सर्वच राजकीय पक्षांनी अनेक घोषणा केल्या. सत्ता मिळाल्यानंतर काही योजनांची अंमलबजावणीही झाली. परंतु शेतकºयांच्या आत्महत्या थांबल्या नाही. सारेच नेते सभा-भाषणांमधून जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी हिताचा वरपांगी कैवार घेतात. पण, योजनांची अंमलबजावणी करताना निराशा हाती येते, असा आरोप शेतकरी करतात. जिल्ह्यामध्ये सिंचनाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना शेतकरी आत्महत्यांची संख्याही दरवर्षी वाढताना दिसते. जिल्ह्यात २००३ रोजी पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती. दरम्यान, ही आत्महत्या प्रशासनाने अपात्र ठरविली. २००४ रोजी जिल्ह्यात ११ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. यामुळे प्रश्न पहिल्यांदाच ऐरणीवर आला. पण, यातील पाच प्रकरणे अपात्र ठरवून केवळ एकाच कुटुंबाला आर्थिक देण्यात आली. २००५ रोजी ही संख्या ११ वरून १७ पर्यंत पोहोचली. २००६ रोजी तर तब्बल ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. केवळ २४ कुटुंबांना सरकारने मदत दिली. २०१४ पासून २०१८ पर्यंत शेतकरी आत्महत्यांच्या वेग वर्षागणिक वाढत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालातून स्पष्ट होते.२०१६ रोजी सर्वाधिक ८४ शेतकरी आत्महत्याजिल्ह्यात २०१६ रोजी सर्वाधिक ८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ५२ पात्र तर २५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. पात्र ठरलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत मिळाली नाही.फेटाळण्याचे कारण काय?शेतकरी आत्महत्यांची ७६४ पैकी २३० प्रकरणे जिल्हा समितीने अपात्र ठरविली. या आत्महत्या ‘शेतकरी आत्महत्या’ म्हणून सिद्ध होण्यासाठी आपाद्ग्रस्त कुटुंंबीय पुरावे सादर करू शकले नाही, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला. शेतकºयांवर बँकांचे कर्ज नसणे, शेतकरी असल्याचा पुरावा न देणे, वैद्यकीय अहवालातून आत्महत्या केल्याचे सिद्ध न होणे, आदी पुराव्यांअभावी शेतकरी आत्महत्या प्रकरणे फेटाळण्यात आल्या आहेत.