शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील २१ हजार शेतकरी झिजविताहेत तहसील कार्यालयाचे उंबरठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 15:40 IST

धानपिकाला टाळून मोठ्या उमेदीने पहिल्यांदाच कापूस लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांना यंदा बोंडअळीने दगा दिला. त्यामुळे हजारो शेतकरी दररोज तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवित असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देबोंडअळी पॅकेज फसवेदोन महिन्यानंतरही तरतूद नाही

राजेश मडावीचंद्रपूर : धानपिकाला टाळून मोठ्या उमेदीने पहिल्यांदाच कापूस लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांना यंदा बोंडअळीने दगा दिला. लागवडीचा खर्चही न निघाल्याने कर्जाचा भरणा कसा करायचा, या प्रश्नाने डोळ्याला डोळा लागत नाही. तर दुसरीकडे राज्य सरकारने बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२ डिसेंबर २०१७ ला मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र, दोन महिन्यानंतरही सरकारने आर्थिक तरतूद केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी दररोज तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवित असल्याचे चित्र दिसून येत आहे.धान आणि अन्य पारंपरिक पिके टाळून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी यंदा पहिल्यांदाच कापूस लागवडीचे धाडस दाखविले. बँकांकडून पिककर्जासाठी मदत झाली नाही. मात्र, दरवर्षी होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाला पहिली पसंती दिली. पावसाचा बेरभवसा आणि मजुरांची टंचाई आदी समस्यांवर मात केल्याने समाधानकारक पीक हातात येईल, असे वाटत असतानाच बोंडअळीने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर बोळा फि रवला. परिणामी, आर्थिक नुकसानीत पुन्हा भरच पडली. दरम्यान, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधासभेत २२ डिसेंबर २०१७ ला बोंड अळीग्रस्त शेतकºयांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर केले. मात्र, सरकारने अद्याप आर्थिक तरतुदीच केली नाही. गाव, तालुका ते जिल्हास्तरावरील विविध समित्यांचे अहवाल विभागीय आयुक्तांकडे डिसेंबर महिन्यातच सादर करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील २१ हजार ४३९ बोंड अळीग्रस्त आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले आहेत. हे शेतकरी दर आठवड्याला तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवून पॅकेजची विचारणा करीत आहेत. परंतु, सरकारकडून निधी न आल्याने आम्ही काय करायचे, अशी उत्तरे देवून संबंधित अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे.असे आहे पॅकेज ?कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार ८०० देऊ, अशी घोषणा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत केली. राष्ट्रीय आपत्ती निधीतून ६ हजार ८०० रुपये, पीक विमा कंपन्यांकडून ८ हजार आणि भरपाईपोटी १६ हजार रुपये, असे या मदत निधीचे स्वरूप आहे. बोंडअळीने नुकसान झालेल्यांमध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या जिल्ह्यांमध्ये सुमारे ३ लाख शेतकऱ्यांच्या पिकांना बोंड अळीचा फटका बसला.

टॅग्स :Farmerशेतकरी