शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील २१ हजार शेतकरी झिजविताहेत तहसील कार्यालयाचे उंबरठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 15:40 IST

धानपिकाला टाळून मोठ्या उमेदीने पहिल्यांदाच कापूस लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांना यंदा बोंडअळीने दगा दिला. त्यामुळे हजारो शेतकरी दररोज तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवित असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देबोंडअळी पॅकेज फसवेदोन महिन्यानंतरही तरतूद नाही

राजेश मडावीचंद्रपूर : धानपिकाला टाळून मोठ्या उमेदीने पहिल्यांदाच कापूस लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांना यंदा बोंडअळीने दगा दिला. लागवडीचा खर्चही न निघाल्याने कर्जाचा भरणा कसा करायचा, या प्रश्नाने डोळ्याला डोळा लागत नाही. तर दुसरीकडे राज्य सरकारने बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२ डिसेंबर २०१७ ला मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र, दोन महिन्यानंतरही सरकारने आर्थिक तरतूद केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी दररोज तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवित असल्याचे चित्र दिसून येत आहे.धान आणि अन्य पारंपरिक पिके टाळून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी यंदा पहिल्यांदाच कापूस लागवडीचे धाडस दाखविले. बँकांकडून पिककर्जासाठी मदत झाली नाही. मात्र, दरवर्षी होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाला पहिली पसंती दिली. पावसाचा बेरभवसा आणि मजुरांची टंचाई आदी समस्यांवर मात केल्याने समाधानकारक पीक हातात येईल, असे वाटत असतानाच बोंडअळीने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर बोळा फि रवला. परिणामी, आर्थिक नुकसानीत पुन्हा भरच पडली. दरम्यान, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधासभेत २२ डिसेंबर २०१७ ला बोंड अळीग्रस्त शेतकºयांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर केले. मात्र, सरकारने अद्याप आर्थिक तरतुदीच केली नाही. गाव, तालुका ते जिल्हास्तरावरील विविध समित्यांचे अहवाल विभागीय आयुक्तांकडे डिसेंबर महिन्यातच सादर करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील २१ हजार ४३९ बोंड अळीग्रस्त आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले आहेत. हे शेतकरी दर आठवड्याला तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवून पॅकेजची विचारणा करीत आहेत. परंतु, सरकारकडून निधी न आल्याने आम्ही काय करायचे, अशी उत्तरे देवून संबंधित अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे.असे आहे पॅकेज ?कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार ८०० देऊ, अशी घोषणा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत केली. राष्ट्रीय आपत्ती निधीतून ६ हजार ८०० रुपये, पीक विमा कंपन्यांकडून ८ हजार आणि भरपाईपोटी १६ हजार रुपये, असे या मदत निधीचे स्वरूप आहे. बोंडअळीने नुकसान झालेल्यांमध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या जिल्ह्यांमध्ये सुमारे ३ लाख शेतकऱ्यांच्या पिकांना बोंड अळीचा फटका बसला.

टॅग्स :Farmerशेतकरी