शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

६०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत २,०९५ महिलांचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST

चंद्रपूर : महिलांना राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व करण्यासाठी ५० टक्के आरक्षणाची तरतूद झाली. या तरतुदीमुळे ग्रामपंचायतमधील राजकारणाचे पारंपरिक चित्र बदलले. ...

चंद्रपूर : महिलांना राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व करण्यासाठी ५० टक्के आरक्षणाची तरतूद झाली. या तरतुदीमुळे ग्रामपंचायतमधील राजकारणाचे पारंपरिक चित्र बदलले. जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत २,०९५ महिला विजयी झाल्या. यातील बहुतांश महिला सदस्यांनाच पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

महिलांमध्येही सार्वजनिक क्षेत्रात सहभागी होऊन नेतृत्व करण्याची क्षमता असते. कुटुंब व्यवस्थेतील अर्थकारण व सामाजिकीकरणाचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या महिलांचे ज्ञान, अनुभव गावाच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकतात. परंतु, संधी मिळत नसल्याने त्यांचा नाईलाज असतो. हाच उद्देश समोर ठेवून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्यात आले. २४ एप्रिल १९९३ पासून स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय लागू झाला. जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींमधील ४,१९१ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये ५० टक्के आरक्षण तरतुदीनुसार २,०९५ महिला विजयी झाल्या आहेत.

कुटुंबाचे पाठबळ असेल तर शक्य

महिलांनी थेट राजकारणात सहभाग घेतल्यास ग्रामीण भागातील पारंपरिक राजकीय नेत्यांकडून आडकाठी आणल्या जाते. नामांकन अर्ज दाखल करण्यापासूनच असे प्रकार घडतात. चिमूर, गोंडपिपरी, मूल, भद्रावती व राजुरा तालुक्यात अशा घटना घडल्या. मात्र, राजकारणात प्रथमच पाऊल टाकणाऱ्या महिलांना कुटुंबाकडून भक्कम पाठबळ मिळाले. त्यामुळे त्या निवडून येऊ शकल्या.