शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

20 कर्मचारी अन्‌ 15 ट्रॅप कॅमेऱ्यांचा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 05:00 IST

बुधवारी वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या व्यक्तीचे नाव सुरेश पुंडलिक गुरूनुले रा. गिरगाव (५०) असे असून मंगळवारच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव विक्राबाई पांडुरंग खोब्रागडे (६४) असे आहे. वाघाकडून मानवावावर झालेल्या या हल्ल्याच्या दोन्ही घटना लागोपाठ आणि पाच ते सहा किमी परिसरातच घडल्याने परिसरातील गावांमधील नागरिक चांगलेच दहशतीत आले आहेत.

ठळक मुद्देलागोपाठ वाघाच्या हल्ल्याने वनविभाग सतर्क : नागरिकांमध्ये दहशत, त्वरित बंदोबस्ताची मागणी

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : मंगळवार आणि बुधवारी धामणगाव चक आणि गिरगाव येथे घडलेल्या वाघाच्या घटनांनी परिसर चांगलाच दहशतीत आला आहे. वन विभागही चांगलाच सतर्क झाला असून या दोन्ही घटनास्थळांच्या परिसरात गस्तीसाठी २० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एवढेच नाही तर वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी १५ कॅमेरे लावण्यात आहेत.  बुधवारी वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या व्यक्तीचे नाव सुरेश पुंडलिक गुरूनुले रा. गिरगाव (५०) असे असून मंगळवारच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव विक्राबाई पांडुरंग खोब्रागडे (६४) असे आहे. वाघाकडून मानवावावर झालेल्या या हल्ल्याच्या दोन्ही घटना लागोपाठ आणि पाच ते सहा किमी परिसरातच घडल्याने परिसरातील गावांमधील नागरिक चांगलेच दहशतीत आले आहेत.ज्या परिसरात या घटना घडल्या तो परिसर जंगलव्याप्त आहे. या परिसरातील गावांची म्हणा किंवा नागरिकांची उपजीविकेची काही साधने जंगलावरच अवलंबून आहेत. रोज सकाळी उठल्याबरोबर या गावांचा जंगलाशीच संबंध येतो. सध्या तर मोहफुलाचा मोसम आहे. काही दिवसांनी तेंदूपत्ता संकलन सुरू होईल. गिरगाव हे तर जिल्ह्यातील केरसुणी निर्मितीचे मोठे केंद्र आहे. या गावातील अनेक कुटुंब वर्षातील सहा महिने याच कामात व्यस्त असतात. या व अन्य विविध कामांसाठी या जंगलव्याप्त गावातील नागरिकांना जंगलात जावेच लागते. नव्हे जंगलात जाणे हा त्यांचा क्रम आहे. विक्राबाई खोब्रागडे असो, नाही तर सुरेश गुरूनुले याच कामासाठी जंगलात गेले होते; पण वाघाने डाव साधला आणि एका महिलेस ठार केले तर दुसऱ्या एका व्यक्तीस गंभीर जखमी केले.

गावकऱ्यांचा जंगलाशी संबंधवाघाने हल्ला केला म्हणून नागरिकांचे जंगलाशी असलेले संबंध संपणार नाहीत. जंगलव्याप्त गावातील नागरिक आणि जंगलजन्य उपज हे अविभाज्य समीकरण आहे. पूर्ण नाही पण या गावांची निम्मी अर्थव्यवस्था याच समीकरणांवर अवलंबून आहे. म्हणूनच या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या त्या वाघाचा बंदोबस्त करा,  अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागही सतर्क झाला आहे. धामणगाव चक आणि गिरगाव जंगल परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या या वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी २० वन कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. तसेच १५ कॅमेरे लावण्यात आले आहेत.

पिंजरा नाहीवाघाच्या हालचाली टिपण्यासाठी फौजफाटा लावण्यात आला असला तरी या हल्लेखोर वाघास पकडण्यासाठी एकही पिंजरा लावण्यात आला नाही. या वाघाला आता मानवी रक्ताची चटक लागली असून त्याच्याकडून आणखी असे हल्ले होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे टाळण्यासाठी या वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. ‘तो’ एकच वाघ? गिरगाव आणि धामणगाव चक या दोन घटनास्थळातील अंतर चार ते पाच किमीचे असून हल्लेखोर वाघ एकच असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग