शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

20 कर्मचारी अन्‌ 15 ट्रॅप कॅमेऱ्यांचा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 05:00 IST

बुधवारी वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या व्यक्तीचे नाव सुरेश पुंडलिक गुरूनुले रा. गिरगाव (५०) असे असून मंगळवारच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव विक्राबाई पांडुरंग खोब्रागडे (६४) असे आहे. वाघाकडून मानवावावर झालेल्या या हल्ल्याच्या दोन्ही घटना लागोपाठ आणि पाच ते सहा किमी परिसरातच घडल्याने परिसरातील गावांमधील नागरिक चांगलेच दहशतीत आले आहेत.

ठळक मुद्देलागोपाठ वाघाच्या हल्ल्याने वनविभाग सतर्क : नागरिकांमध्ये दहशत, त्वरित बंदोबस्ताची मागणी

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : मंगळवार आणि बुधवारी धामणगाव चक आणि गिरगाव येथे घडलेल्या वाघाच्या घटनांनी परिसर चांगलाच दहशतीत आला आहे. वन विभागही चांगलाच सतर्क झाला असून या दोन्ही घटनास्थळांच्या परिसरात गस्तीसाठी २० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एवढेच नाही तर वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी १५ कॅमेरे लावण्यात आहेत.  बुधवारी वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या व्यक्तीचे नाव सुरेश पुंडलिक गुरूनुले रा. गिरगाव (५०) असे असून मंगळवारच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव विक्राबाई पांडुरंग खोब्रागडे (६४) असे आहे. वाघाकडून मानवावावर झालेल्या या हल्ल्याच्या दोन्ही घटना लागोपाठ आणि पाच ते सहा किमी परिसरातच घडल्याने परिसरातील गावांमधील नागरिक चांगलेच दहशतीत आले आहेत.ज्या परिसरात या घटना घडल्या तो परिसर जंगलव्याप्त आहे. या परिसरातील गावांची म्हणा किंवा नागरिकांची उपजीविकेची काही साधने जंगलावरच अवलंबून आहेत. रोज सकाळी उठल्याबरोबर या गावांचा जंगलाशीच संबंध येतो. सध्या तर मोहफुलाचा मोसम आहे. काही दिवसांनी तेंदूपत्ता संकलन सुरू होईल. गिरगाव हे तर जिल्ह्यातील केरसुणी निर्मितीचे मोठे केंद्र आहे. या गावातील अनेक कुटुंब वर्षातील सहा महिने याच कामात व्यस्त असतात. या व अन्य विविध कामांसाठी या जंगलव्याप्त गावातील नागरिकांना जंगलात जावेच लागते. नव्हे जंगलात जाणे हा त्यांचा क्रम आहे. विक्राबाई खोब्रागडे असो, नाही तर सुरेश गुरूनुले याच कामासाठी जंगलात गेले होते; पण वाघाने डाव साधला आणि एका महिलेस ठार केले तर दुसऱ्या एका व्यक्तीस गंभीर जखमी केले.

गावकऱ्यांचा जंगलाशी संबंधवाघाने हल्ला केला म्हणून नागरिकांचे जंगलाशी असलेले संबंध संपणार नाहीत. जंगलव्याप्त गावातील नागरिक आणि जंगलजन्य उपज हे अविभाज्य समीकरण आहे. पूर्ण नाही पण या गावांची निम्मी अर्थव्यवस्था याच समीकरणांवर अवलंबून आहे. म्हणूनच या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या त्या वाघाचा बंदोबस्त करा,  अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागही सतर्क झाला आहे. धामणगाव चक आणि गिरगाव जंगल परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या या वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी २० वन कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. तसेच १५ कॅमेरे लावण्यात आले आहेत.

पिंजरा नाहीवाघाच्या हालचाली टिपण्यासाठी फौजफाटा लावण्यात आला असला तरी या हल्लेखोर वाघास पकडण्यासाठी एकही पिंजरा लावण्यात आला नाही. या वाघाला आता मानवी रक्ताची चटक लागली असून त्याच्याकडून आणखी असे हल्ले होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे टाळण्यासाठी या वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. ‘तो’ एकच वाघ? गिरगाव आणि धामणगाव चक या दोन घटनास्थळातील अंतर चार ते पाच किमीचे असून हल्लेखोर वाघ एकच असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग