शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषित पाण्यामुळे चंद्रपुरातील २० टक्के पाणीपुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 15:09 IST

सीटीपीएसचे दूषित पाणी इरईत : दाताळा परिसरातील शुद्धीकरण प्लँट बंद

चंद्रपूर : औष्णिक केंद्राचे दूषित पाणी इरईत शिरल्याने मनपा प्रशासनाने चंद्रपुरातील २० टक्के पाणीपुरवठा बुधवारपासून दि. ९ बंद केला. दाताळा परिसरातील जलशुद्धीकरण प्लँट सध्या काही दिवसांपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरवठा खंडित झाल्याने शहरातील दाट लोकसंख्या असलेल्या सहा वॉर्डांमधील नागरिकांना पाणी मिळण्याचा मार्ग बंद झाला.

चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. हे धरण चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचे आहे. या केंद्राचे रसायनयुक्त पाणी रानवेडली नाल्याला सोडण्यात आल्याची तक्रारी सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी केली. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित क्षेत्राची पाहणी केली. मनपा प्रशासनानेही दाताळ्याचा जलशुद्धीकरण केंद्र बंद केला. त्यामुळे चंद्रपुरातील काही भागांतील पाणीपुरवठा बंद केला आहे. परिणामी, संबंधित परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्यास अडचणी आल्या आहेत. नागरिक आपल्या जवळच्या परिसरातील नळांमधून पाणी भरण्यासाठी गर्दी केल्याचे गुरुवारी दिसून आले.

पाणीपुरवठा खंडित झालेला परिसर

दादमहल वॉर्ड, हनुमान खिडकी रोड, कोहिनूर ग्राउंड परिसर, जटपुरा वॉर्ड, नगिनाबाग, चोरखिडकी परिसरातील पाणीपुरवठा काही दिवसांसाठी खंडित करण्यात आला आहे.

पीसीबीने घेतले पाण्याचे नमुने

इरईत सोडल्या जाणाऱ्या प्रदूषित पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने संकलित केले. हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच प्रदूषित पाण्यातील घटकांसंदर्भात माहिती मिळू शकेल, अशी माहिती सूत्राने दिली.

दाताळा परिसरातील ट्रीटमेंट प्लँट सध्या बंद करण्यात आला. त्यामुळे काही वॉर्डांतील पाणीपुरवठा बंद करावा लागला. मात्र, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यादृष्टीने टँकरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित परिसराचा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- विपीन पालिवाल, आयुक्त मनपा, चंद्रपूर

टॅग्स :Waterपाणीchandrapur-acचंद्रपूर