शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

वीज परिमंडळातील २ हजार ७५५ ग्राहक झाले वसुंधरा-पर्यावरण-स्नेही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:21 IST

दरवर्षी हजारो क्विंटल कागद येणकेणप्रकारेन छपाईसाठी सर्वत्र वापरला जातो. अशाप्रकारे छापील कागदाचा ऱ्हास होतो; पण महावितरणद्वारा ‘गो-ग्रीन’ ...

दरवर्षी हजारो क्विंटल कागद येणकेणप्रकारेन छपाईसाठी सर्वत्र वापरला जातो. अशाप्रकारे छापील कागदाचा ऱ्हास होतो; पण महावितरणद्वारा ‘गो-ग्रीन’ योजनेत छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’चा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे.

त्यामुळे प्रत्येक वीज ग्राहकांची वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय वीज बिल ई-मेल, तसेच एसएमएसद्वारे दरमहा मिळणार असल्याने ते लगेचच प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाइनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रॉम्ट पेमेंटसह वीज बिल भरल्यास प्रॉम्ट पेमेंटचीही सूट मिळणार आहे.

ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवण्याची सोय आहे. सोबतच महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर वीज बिल मूळ स्वरूपात उपलब्ध असून, ते डाऊनलोड किंवा प्रिंट करता येते. महावितरण चंद्रपूर परिमंडळातील २ हजार २६५ ग्राहकांनी वीज बिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्यावरणपूरक पर्याय निवडून पर्यावरणपूरक कामात योगदान दिले आहे.

हा पर्याय सर्वच ग्राहकांना उपलब्ध असून, गो ग्रीनच्या माध्यमातून प्रति वीज बिल १० रुपये वाचविण्यासोबतच कागदाचा वापर टाळून वसुंधरेच्या व पर्यावरणाच्या समृद्धीसाठी हातभार लावण्याचे महत्त्वाचे कार्य साधण्याची संधी आहे.

कोट

‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडण्यासाठी वीज ग्राहकांनी बिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या लिंकवर उपलब्ध आहे. ग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा लाभ घ्यावा व पर्यावरणपूरक योजनेमध्ये योगदान द्यावे.

-सुनील देशपांडे, मुख्य अभियंता महावितरण, चंद्रपूर परिमंडळ