शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

२ हजार ४९८ शाळांना शासन आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST

साईनाथ कुचनकार चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षी शाळा सुरू झाल्या नाही. त्यातच यावर्षीही संकट आल्यामुळे अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत ...

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षी शाळा सुरू झाल्या नाही. त्यातच यावर्षीही संकट आल्यामुळे अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शासन निर्णय झाला नाही. असे असले तरी जिल्ह्यात २ हजार ४९८ शाळा विद्यादानासाठी सज्ज झाल्या असून, आता केवळ शासन आदेशाची प्रतीक्षा आहे.

दरवर्षी २७ जूनला शाळेचा पहिला ठाेका वाजतो. यावर्षी २७ ला रविवार असल्यामुळे २८ जूनपासून विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होणार आहे. कोरोना संकटामुळे मागील वर्षभर प्राथमिक शाळा सुरू झाल्या नाही. २७ जानेवारीपासून पाचवीपासून वर्ग भरले; मात्र तेही काही दिवसांत बंद करावे लागले. त्यामुळे पहिल्यांदाच परीक्षा न देताच सर्व विद्यार्थी वर्गोन्नत झाले. दरम्यान, नव्या शैक्षणिक सत्रातही कोरोनाचे संकट असल्यामुळे अद्यापतरी विद्यार्थी उपस्थिती संदर्भात शासन स्तरावर निर्णय झाला नाही. मात्र, वेळेवर घाई नको म्हणून जिल्ह्यातील शासकीय, तसेच खासगी शाळा व्यवस्थापनांनी शाळांची स्वच्छता करीत शाळांना सज्ज केले आहे.

बाॅक्स एकूण शाळा -२४९८

एकूण शिक्षक -१४००५

जिल्हा परिषद शाळा १५५७ शिक्षक-५४८५

महानगरपालिका- ५९ शिक्षक-१४०

समाजकल्याण विभाग ५६ शिक्षक-२९०

आदिवासी विभाग-६० शिक्षक-४८४

खासगी अनुदानित ३७५ शिक्षक-४४७४

खासगी विनाअनुदानित ३९१-३१३२

बाॅक्स

तालुकानिहाय शाळा

चंद्रपूर -३२०

भद्रावती-१८१

वरोरा-२३०

बल्लारपूर ११०

राजुरा २०३

गोंडपिपरी ११९

कोरपना १८२

मूल १२९

सिंदेवाही १३०

नागभीड १५३

ब्रह्मपुरी १६१

चिमूर-२२३

सावली १२१

पोंभूर्णा ७६

जिवती १६०

बाॅक्स

इंग्रजी शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरू

कोरोना संकटामुळे शाळा सुरू झाल्या नसल्या तरी काही काॅन्व्हेेंटने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. मागील वर्षाप्रमाणेच विद्यार्थ्यांना टाईमटेबल ठरवून या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी करून घेतली जात आहे.

बाॅक्स

ग्रामीण भागात ऑनलाईनला विरोध

२८ पासून विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होणार आहे. दरम्यान, ऑनलाईन अभ्यासक्रमावरच भर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील पालक यासाठी तयार नसून आता कोरोना संकट काही प्रमाणात कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच बोलावून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मागणीही केली जात आहे.

कोट -

२८ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. मात्र, विद्यार्थी उपस्थितीबाबत अद्याप शासनाने निर्णय घेतला नाही. सध्या कोरोना संकट कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल. जर विद्यार्थी उपस्थितीबाबत निर्णय न झाल्यास किमान स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांना पुरवून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी करता येईल.

-जे. डी. पोटे

शिक्षण समिती सदस्य, चंद्रपूर

--