शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

२ हजार ४९८ शाळांना शासन आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST

साईनाथ कुचनकार चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षी शाळा सुरू झाल्या नाही. त्यातच यावर्षीही संकट आल्यामुळे अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत ...

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षी शाळा सुरू झाल्या नाही. त्यातच यावर्षीही संकट आल्यामुळे अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शासन निर्णय झाला नाही. असे असले तरी जिल्ह्यात २ हजार ४९८ शाळा विद्यादानासाठी सज्ज झाल्या असून, आता केवळ शासन आदेशाची प्रतीक्षा आहे.

दरवर्षी २७ जूनला शाळेचा पहिला ठाेका वाजतो. यावर्षी २७ ला रविवार असल्यामुळे २८ जूनपासून विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होणार आहे. कोरोना संकटामुळे मागील वर्षभर प्राथमिक शाळा सुरू झाल्या नाही. २७ जानेवारीपासून पाचवीपासून वर्ग भरले; मात्र तेही काही दिवसांत बंद करावे लागले. त्यामुळे पहिल्यांदाच परीक्षा न देताच सर्व विद्यार्थी वर्गोन्नत झाले. दरम्यान, नव्या शैक्षणिक सत्रातही कोरोनाचे संकट असल्यामुळे अद्यापतरी विद्यार्थी उपस्थिती संदर्भात शासन स्तरावर निर्णय झाला नाही. मात्र, वेळेवर घाई नको म्हणून जिल्ह्यातील शासकीय, तसेच खासगी शाळा व्यवस्थापनांनी शाळांची स्वच्छता करीत शाळांना सज्ज केले आहे.

बाॅक्स एकूण शाळा -२४९८

एकूण शिक्षक -१४००५

जिल्हा परिषद शाळा १५५७ शिक्षक-५४८५

महानगरपालिका- ५९ शिक्षक-१४०

समाजकल्याण विभाग ५६ शिक्षक-२९०

आदिवासी विभाग-६० शिक्षक-४८४

खासगी अनुदानित ३७५ शिक्षक-४४७४

खासगी विनाअनुदानित ३९१-३१३२

बाॅक्स

तालुकानिहाय शाळा

चंद्रपूर -३२०

भद्रावती-१८१

वरोरा-२३०

बल्लारपूर ११०

राजुरा २०३

गोंडपिपरी ११९

कोरपना १८२

मूल १२९

सिंदेवाही १३०

नागभीड १५३

ब्रह्मपुरी १६१

चिमूर-२२३

सावली १२१

पोंभूर्णा ७६

जिवती १६०

बाॅक्स

इंग्रजी शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरू

कोरोना संकटामुळे शाळा सुरू झाल्या नसल्या तरी काही काॅन्व्हेेंटने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. मागील वर्षाप्रमाणेच विद्यार्थ्यांना टाईमटेबल ठरवून या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी करून घेतली जात आहे.

बाॅक्स

ग्रामीण भागात ऑनलाईनला विरोध

२८ पासून विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होणार आहे. दरम्यान, ऑनलाईन अभ्यासक्रमावरच भर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील पालक यासाठी तयार नसून आता कोरोना संकट काही प्रमाणात कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच बोलावून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मागणीही केली जात आहे.

कोट -

२८ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. मात्र, विद्यार्थी उपस्थितीबाबत अद्याप शासनाने निर्णय घेतला नाही. सध्या कोरोना संकट कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल. जर विद्यार्थी उपस्थितीबाबत निर्णय न झाल्यास किमान स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांना पुरवून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी करता येईल.

-जे. डी. पोटे

शिक्षण समिती सदस्य, चंद्रपूर

--