शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार ४९८ शाळांना शासन आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST

साईनाथ कुचनकार चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षी शाळा सुरू झाल्या नाही. त्यातच यावर्षीही संकट आल्यामुळे अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत ...

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षी शाळा सुरू झाल्या नाही. त्यातच यावर्षीही संकट आल्यामुळे अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शासन निर्णय झाला नाही. असे असले तरी जिल्ह्यात २ हजार ४९८ शाळा विद्यादानासाठी सज्ज झाल्या असून, आता केवळ शासन आदेशाची प्रतीक्षा आहे.

दरवर्षी २७ जूनला शाळेचा पहिला ठाेका वाजतो. यावर्षी २७ ला रविवार असल्यामुळे २८ जूनपासून विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होणार आहे. कोरोना संकटामुळे मागील वर्षभर प्राथमिक शाळा सुरू झाल्या नाही. २७ जानेवारीपासून पाचवीपासून वर्ग भरले; मात्र तेही काही दिवसांत बंद करावे लागले. त्यामुळे पहिल्यांदाच परीक्षा न देताच सर्व विद्यार्थी वर्गोन्नत झाले. दरम्यान, नव्या शैक्षणिक सत्रातही कोरोनाचे संकट असल्यामुळे अद्यापतरी विद्यार्थी उपस्थिती संदर्भात शासन स्तरावर निर्णय झाला नाही. मात्र, वेळेवर घाई नको म्हणून जिल्ह्यातील शासकीय, तसेच खासगी शाळा व्यवस्थापनांनी शाळांची स्वच्छता करीत शाळांना सज्ज केले आहे.

बाॅक्स एकूण शाळा -२४९८

एकूण शिक्षक -१४००५

जिल्हा परिषद शाळा १५५७ शिक्षक-५४८५

महानगरपालिका- ५९ शिक्षक-१४०

समाजकल्याण विभाग ५६ शिक्षक-२९०

आदिवासी विभाग-६० शिक्षक-४८४

खासगी अनुदानित ३७५ शिक्षक-४४७४

खासगी विनाअनुदानित ३९१-३१३२

बाॅक्स

तालुकानिहाय शाळा

चंद्रपूर -३२०

भद्रावती-१८१

वरोरा-२३०

बल्लारपूर ११०

राजुरा २०३

गोंडपिपरी ११९

कोरपना १८२

मूल १२९

सिंदेवाही १३०

नागभीड १५३

ब्रह्मपुरी १६१

चिमूर-२२३

सावली १२१

पोंभूर्णा ७६

जिवती १६०

बाॅक्स

इंग्रजी शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरू

कोरोना संकटामुळे शाळा सुरू झाल्या नसल्या तरी काही काॅन्व्हेेंटने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. मागील वर्षाप्रमाणेच विद्यार्थ्यांना टाईमटेबल ठरवून या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी करून घेतली जात आहे.

बाॅक्स

ग्रामीण भागात ऑनलाईनला विरोध

२८ पासून विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होणार आहे. दरम्यान, ऑनलाईन अभ्यासक्रमावरच भर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील पालक यासाठी तयार नसून आता कोरोना संकट काही प्रमाणात कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच बोलावून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मागणीही केली जात आहे.

कोट -

२८ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. मात्र, विद्यार्थी उपस्थितीबाबत अद्याप शासनाने निर्णय घेतला नाही. सध्या कोरोना संकट कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल. जर विद्यार्थी उपस्थितीबाबत निर्णय न झाल्यास किमान स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांना पुरवून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी करता येईल.

-जे. डी. पोटे

शिक्षण समिती सदस्य, चंद्रपूर

--