शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

महामार्गावर विनाहेल्मेट फिरणाऱ्या १९३ जणांना चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:29 IST

सन २०२० मध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत एकूण ५०८ अपघात झाले आहेत. यामध्ये १९३ गंभीर अपघात झाले आहेत. यामध्ये २१४ नागरिकांचा ...

सन २०२० मध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत एकूण ५०८ अपघात झाले आहेत. यामध्ये १९३ गंभीर अपघात झाले आहेत. यामध्ये २१४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ६० टक्के मृत्यूचे प्रमाण दुचाकीने तर १४ टक्के मृत्यूचे प्रमाण चारचाकी वाहनाचे आहे. विशेष म्हणेज मृत्यू पडलेल्या दुचाकी स्वारांपैकी कुणीही हेल्मेट परिधान करून नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता नव्या वर्षापासून दुचाकीस्वारांना हेल्मेट व चारचाकी वाहन चालकांना सीटबेल्ट सक्तीचा निर्णय पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घेतला आहे. १ जानेवारीला महामार्गावर विना हेल्मेट फिरणाऱ्या ६९ जणांवर तर २ जानेवारी रोजी १२३ जणांवर कारवाई करून प्रत्येकी ५०० रुपयाचा दंड आकारण्यात आला.

मोटार वाहन कायद्यान्वये ३०६ कारवाई

नववर्षाचे स्वागत शांततेत पार पडावे, यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती तसेच शहरात गस्त सुरू होती. जिल्ह्यातील पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या रात्री १८ मद्यपी व ३९ दारू विक्रेत्यांविरोधात तर ३०६ जणांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली.

बॉक्स

हेल्मेटचा वापर करा

विनाहेल्मेट प्रवास करणे धोकादायक होत आहे. विनाहेल्मेट अपघात झाल्यास धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुचाकीचालकांनी हेल्मेट घालून तर चारचाकीस्वारांनी सीट बेल्टचा वापर करावा, तसेच वाहतूक नियमांचे पालन करीत वाहन चालवावे, असे आवाहन वाहतूक निरीक्षक हृदयनारायण यादव यांनी केले आहे.