शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

महामार्गावर विनाहेल्मेट फिरणाऱ्या 193 जणांना चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 05:00 IST

सन २०२० मध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत एकूण ५०८ अपघात झाले आहेत. यामध्ये १९३ गंभीर अपघात झाले आहेत. यामध्ये २१४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ६० टक्के मृत्यूचे प्रमाण दुचाकीने तर १४ टक्के मृत्यूचे प्रमाण चारचाकी वाहनाचे आहे. विशेष म्हणेज मृत्यू पडलेल्या दुचाकी स्वारांपैकी कुणीही हेल्मेट परिधान करून नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता नव्या वर्षापासून दुचाकीस्वारांना हेल्मेट व चारचाकी वाहन चालकांना सीटबेल्ट सक्तीचा निर्णय पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देदोन दिवसांत ९६ हजार ५०० रुपयांचा दंड : हेल्मेट सक्तीची अमंलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यात महामार्गावर नव्या वर्षांपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पोलिसांनी महामार्गावर नाकाबंदी करून दोन दिवसात १९३ जणांवर कारवाई केली. कारवाईत ९६ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. यावेळी वाहनचालकांचे समुपदेशनही करण्यात आले. सन २०२० मध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत एकूण ५०८ अपघात झाले आहेत. यामध्ये १९३ गंभीर अपघात झाले आहेत. यामध्ये २१४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ६० टक्के मृत्यूचे प्रमाण दुचाकीने तर १४ टक्के मृत्यूचे प्रमाण चारचाकी वाहनाचे आहे. विशेष म्हणेज मृत्यू पडलेल्या दुचाकी स्वारांपैकी कुणीही हेल्मेट परिधान करून नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता नव्या वर्षापासून दुचाकीस्वारांना हेल्मेट व चारचाकी वाहन चालकांना सीटबेल्ट सक्तीचा निर्णय पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घेतला आहे. १ जानेवारीला महामार्गावर विना हेल्मेट फिरणाऱ्या ६९ जणांवर तर २ जानेवारी रोजी १२३ जणांवर कारवाई करून प्रत्येकी ५०० रुपयाचा दंड आकारण्यात आला.

मोटार वाहन कायद्यान्वये ३०६ कारवाईनववर्षाचे स्वागत शांततेत पार पडावे, यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती तसेच शहरात गस्त सुरू होती. जिल्ह्यातील पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या रात्री १८ मद्यपी व ३९ दारू विक्रेत्यांविरोधात तर ३०६ जणांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली.

हेल्मेटचा वापर कराविनाहेल्मेट प्रवास करणे धोकादायक होत आहे. विनाहेल्मेट अपघात झाल्यास धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुचाकीचालकांनी हेल्मेट घालून तर चारचाकीस्वारांनी सीट बेल्टचा वापर करावा, तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक निरीक्षक हृदयनारायण यादव यांनी केले आहे.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस