शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

१७४२ विद्यार्थ्यांचा प्रवेश अडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:01 IST

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. चंद्रपूरसह राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १९ दिवसात पुढच्या वर्षासाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती.

ठळक मुद्देआरटीई अंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश : १५ एप्रिलनंतरच होणार पडताळणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेवरही परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्राुदर्भाव रोखण्यासाठी देशभरात १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आरटीईची सोडतीमध्ये निवडलेल्या १७४२ विद्यार्थ्यांचा प्रवेश अडला आहे. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया आणि पडताळणी या संदर्भातील निर्णय हा १५ एप्रिलनंतरच घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. चंद्रपूरसह राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १९ दिवसात पुढच्या वर्षासाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. यात चंद्रपूर जिल्ह्यातील १८०७ जागांसाठी चार हजार ४१४ अर्ज आले आहेत. त्या मोफत प्रवेशाची सोडत आॅनलाईन पध्दतीने १७ मार्च रोजी करण्यात आली. यात १७४२ जणांचा प्रवेश निश्चीत करण्यासाठी त्यांना ३१ मार्च ही मुदत देण्यात आली होती. परंतु कोरोनामुळे १५ एप्रिल नंतरच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचे व्हेरीफिकेशन होणार आहे.नामांकित शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची लॉटरी आॅनलाईन पध्दतीने काढण्यात आली. ज्या पाल्यांचे नंबर लागले त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर मॅसेज गेलेत. सोबत प्रतीक्षा यादी देखील दिली आहे. पालकांना प्रवेशांसाठी ३१ मार्च ही अंतिम यादी देण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सदर प्रकीया बंद असल्याने जिल्ह्यातील सुमारे एक हजार ७४२ विद्यार्थ्यांच्या प्रवेश रखडला आहे.कागदपत्रांचे व्हेरीफिकेशन रखडलेज्यांची लॉटरीमधून निवड झाली आहे. त्यांनी संबधीत शाळेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी लगेच करायची असते. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने आरटीईच्या कागदपत्रांची पडताळणी ३१ मार्चनंतर होईल अशा सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाचे देशात कहर माजविल्यामुळे १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतरच ही शाळा प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा