शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
3
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
4
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
5
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
6
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
7
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
8
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
9
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
10
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
11
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
12
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
13
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
14
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
15
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
16
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
17
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
18
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

१७ हजार माती नमुने तपासणार

By admin | Updated: June 2, 2015 01:21 IST

कृषी व्यवस्थापनामध्ये जमीन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जमिनीचे आरोग्य भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर

मंगेश भांडेकर ल्ल चंद्रपूरकृषी व्यवस्थापनामध्ये जमीन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जमिनीचे आरोग्य भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर अवलंबून असते. त्यामुळे जमिनीची सुपिकता पातळी व सुपिकता निर्देशांक काढून त्यानुसार खतांची शिफारस शेकतऱ्यांना केली जाते. २०१५-१६ या वर्षांत जमिनीची सुपिकता पातळी व सुपिकता निर्देशांक काढण्यासाठी जिल्ह्यात तब्बल १७ हजार ७१० माती नमुने तपासणी करण्यात येणार आहेत.विविध प्रकारच्या खतांचा वापर करून पीक उत्पादन वाढीसोबतच जमिनीचे आरोग्य आणि सुपिकता टिकविणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने मृद आरोग्य पत्रिका अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षात १७ हजार ७१० माती नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील दरवर्षी २० टक्के गावे याप्रमाणे मृद नमुने तपासणी केली जाणार आहे. गावांची निवड करून त्यातील प्रत्येक गावांचे वाहितीखालील क्षेत्राच्या १० टक्के क्षेत्राचे मृद मालेनुसार प्रतिनिधिक नमुने गोळा करून त्याचे परीक्षण करणे, गावाची सुपिकता निर्देशांक व सुपिकता पातळी निश्चित करून पृथक्करणानुसार द्यायच्या खत मात्रांची शिफारस करण्यात येणार आहे.या योजनेंतर्गंत मृद नमुन्याचे विश्लेषण करून सामु, क्षारता सेंद्रीय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश तसेच सूक्ष्म मुलद्रव्ये (तांबे, लोह, मंगल, जस्त) या गुणधर्माची तपासणी करण्यात येणार आहे. नैसर्गिक साधन सामग्रीच्या व्यवस्थापनासाठी मृद परीक्षण व सर्वेक्षणाच्या आधारे खतांच्या संतुलित वापरासाठी राज्यात मृद आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत दर तीन वर्षांत एकदा शेकतऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे.जिल्ह्यात दोन माती तपासणी केंद्र असून एक शासकीय तर दुसरी पडोली येथील दिनी केमिकल प्रायव्हेट लिमिटेड लॅब आहे. या दोन्ही लॅब मधून सन २०१०-११ मध्ये ३२७ गावातील १० हजार ३२८ मृद नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तर सन २०१२-१३ मध्ये १२८ गावांतील ४ हजार ९९५, सन २०१३-१४ मध्ये २४७ गावांतील ८ हजार १४२ तर सन २१०४-१५ मध्ये १७६ गावांतील ५ हजार ३७२ मृद नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तर २०१५-१६ या वर्षांत १७ हजार ७१० नमुने तपासणीचे लक्ष आहे. गत पाच वर्षात मृद नमुने पृथक्करणाचे काम पूर्ण झाले असून जमीन आरोग्य पुस्तिका वितरित करण्यात आली आहे. का करावी मृद तपासणी?सध्या उन्हाचा हाहाकार उडाला आहे. लवकरच खरीपाचा हंगाम सुरु होईल. मान्सुनच्या आगमनापुर्वी बळीराजाची आपल्या शेतात लगबग सुरु आहे. पण या सगळ्याआधी मातीची तपासणी करणे गरजेचे आहे. आम्ही नेहमीच्या पद्धतीने ठरलेलेच पीक घेणार आहोत, मग आम्हाला मातीच परिक्षण करायची गरज काय, असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं गरजेचं आहे. आपण शेती करताना अनेक प्रकारच्या खतांचा वापर करतो. तसचं पिकांवर वेगवेगळ्या किटकनाशकांची फवारणी करतो. या सगळ्यांमुळे मातीची गुणवत्ता कमी होते, कस खालावतो. याचा परीणाम मातीच्या उत्पादन क्षमतेवर होत असतो. आपल्या शेतजमिनीतील मातीचं परिक्षण तपासणी करुन घेतल्यास आपल्याला मातीची गुणवत्ता कळू शकते.माती नमुना असा घ्यामातीची तपासणी करण्यासाठी आपल्या शेतात नागमोडी पद्धतीने खणुन घ्यावं. मध्यभागी साधारण चार ते सहा इंच खोल खड्डा खोदुन तेथील माती जमा करुन एका ताडपत्रीवर माती जमा करावी. जमा केलेली माती चांगली एकत्र करुन घ्यावी आणि चौकोनात पसरावी. या चौकोनातील मातीचे समसमान चार भाग करावेत. यातील दोन भाग निवडुन त्यातील माती एकत्र मिसळावी. उर्वरीत माती फेकुन द्यावी.