शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
2
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
3
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
4
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
5
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
6
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
7
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
8
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
9
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
10
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
11
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
12
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
13
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
14
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
16
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
17
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
18
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
19
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
20
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?

१७ हजार माती नमुने तपासणार

By admin | Updated: June 2, 2015 01:21 IST

कृषी व्यवस्थापनामध्ये जमीन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जमिनीचे आरोग्य भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर

मंगेश भांडेकर ल्ल चंद्रपूरकृषी व्यवस्थापनामध्ये जमीन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जमिनीचे आरोग्य भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर अवलंबून असते. त्यामुळे जमिनीची सुपिकता पातळी व सुपिकता निर्देशांक काढून त्यानुसार खतांची शिफारस शेकतऱ्यांना केली जाते. २०१५-१६ या वर्षांत जमिनीची सुपिकता पातळी व सुपिकता निर्देशांक काढण्यासाठी जिल्ह्यात तब्बल १७ हजार ७१० माती नमुने तपासणी करण्यात येणार आहेत.विविध प्रकारच्या खतांचा वापर करून पीक उत्पादन वाढीसोबतच जमिनीचे आरोग्य आणि सुपिकता टिकविणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने मृद आरोग्य पत्रिका अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षात १७ हजार ७१० माती नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील दरवर्षी २० टक्के गावे याप्रमाणे मृद नमुने तपासणी केली जाणार आहे. गावांची निवड करून त्यातील प्रत्येक गावांचे वाहितीखालील क्षेत्राच्या १० टक्के क्षेत्राचे मृद मालेनुसार प्रतिनिधिक नमुने गोळा करून त्याचे परीक्षण करणे, गावाची सुपिकता निर्देशांक व सुपिकता पातळी निश्चित करून पृथक्करणानुसार द्यायच्या खत मात्रांची शिफारस करण्यात येणार आहे.या योजनेंतर्गंत मृद नमुन्याचे विश्लेषण करून सामु, क्षारता सेंद्रीय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश तसेच सूक्ष्म मुलद्रव्ये (तांबे, लोह, मंगल, जस्त) या गुणधर्माची तपासणी करण्यात येणार आहे. नैसर्गिक साधन सामग्रीच्या व्यवस्थापनासाठी मृद परीक्षण व सर्वेक्षणाच्या आधारे खतांच्या संतुलित वापरासाठी राज्यात मृद आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत दर तीन वर्षांत एकदा शेकतऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे.जिल्ह्यात दोन माती तपासणी केंद्र असून एक शासकीय तर दुसरी पडोली येथील दिनी केमिकल प्रायव्हेट लिमिटेड लॅब आहे. या दोन्ही लॅब मधून सन २०१०-११ मध्ये ३२७ गावातील १० हजार ३२८ मृद नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तर सन २०१२-१३ मध्ये १२८ गावांतील ४ हजार ९९५, सन २०१३-१४ मध्ये २४७ गावांतील ८ हजार १४२ तर सन २१०४-१५ मध्ये १७६ गावांतील ५ हजार ३७२ मृद नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तर २०१५-१६ या वर्षांत १७ हजार ७१० नमुने तपासणीचे लक्ष आहे. गत पाच वर्षात मृद नमुने पृथक्करणाचे काम पूर्ण झाले असून जमीन आरोग्य पुस्तिका वितरित करण्यात आली आहे. का करावी मृद तपासणी?सध्या उन्हाचा हाहाकार उडाला आहे. लवकरच खरीपाचा हंगाम सुरु होईल. मान्सुनच्या आगमनापुर्वी बळीराजाची आपल्या शेतात लगबग सुरु आहे. पण या सगळ्याआधी मातीची तपासणी करणे गरजेचे आहे. आम्ही नेहमीच्या पद्धतीने ठरलेलेच पीक घेणार आहोत, मग आम्हाला मातीच परिक्षण करायची गरज काय, असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं गरजेचं आहे. आपण शेती करताना अनेक प्रकारच्या खतांचा वापर करतो. तसचं पिकांवर वेगवेगळ्या किटकनाशकांची फवारणी करतो. या सगळ्यांमुळे मातीची गुणवत्ता कमी होते, कस खालावतो. याचा परीणाम मातीच्या उत्पादन क्षमतेवर होत असतो. आपल्या शेतजमिनीतील मातीचं परिक्षण तपासणी करुन घेतल्यास आपल्याला मातीची गुणवत्ता कळू शकते.माती नमुना असा घ्यामातीची तपासणी करण्यासाठी आपल्या शेतात नागमोडी पद्धतीने खणुन घ्यावं. मध्यभागी साधारण चार ते सहा इंच खोल खड्डा खोदुन तेथील माती जमा करुन एका ताडपत्रीवर माती जमा करावी. जमा केलेली माती चांगली एकत्र करुन घ्यावी आणि चौकोनात पसरावी. या चौकोनातील मातीचे समसमान चार भाग करावेत. यातील दोन भाग निवडुन त्यातील माती एकत्र मिसळावी. उर्वरीत माती फेकुन द्यावी.