शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
3
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
4
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
5
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
6
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
7
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
8
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
9
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
10
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
11
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
12
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
13
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
14
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
15
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
17
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
18
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
19
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
20
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

१७ हजार माती नमुने तपासणार

By admin | Updated: June 2, 2015 01:21 IST

कृषी व्यवस्थापनामध्ये जमीन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जमिनीचे आरोग्य भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर

मंगेश भांडेकर ल्ल चंद्रपूरकृषी व्यवस्थापनामध्ये जमीन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जमिनीचे आरोग्य भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर अवलंबून असते. त्यामुळे जमिनीची सुपिकता पातळी व सुपिकता निर्देशांक काढून त्यानुसार खतांची शिफारस शेकतऱ्यांना केली जाते. २०१५-१६ या वर्षांत जमिनीची सुपिकता पातळी व सुपिकता निर्देशांक काढण्यासाठी जिल्ह्यात तब्बल १७ हजार ७१० माती नमुने तपासणी करण्यात येणार आहेत.विविध प्रकारच्या खतांचा वापर करून पीक उत्पादन वाढीसोबतच जमिनीचे आरोग्य आणि सुपिकता टिकविणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने मृद आरोग्य पत्रिका अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षात १७ हजार ७१० माती नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील दरवर्षी २० टक्के गावे याप्रमाणे मृद नमुने तपासणी केली जाणार आहे. गावांची निवड करून त्यातील प्रत्येक गावांचे वाहितीखालील क्षेत्राच्या १० टक्के क्षेत्राचे मृद मालेनुसार प्रतिनिधिक नमुने गोळा करून त्याचे परीक्षण करणे, गावाची सुपिकता निर्देशांक व सुपिकता पातळी निश्चित करून पृथक्करणानुसार द्यायच्या खत मात्रांची शिफारस करण्यात येणार आहे.या योजनेंतर्गंत मृद नमुन्याचे विश्लेषण करून सामु, क्षारता सेंद्रीय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश तसेच सूक्ष्म मुलद्रव्ये (तांबे, लोह, मंगल, जस्त) या गुणधर्माची तपासणी करण्यात येणार आहे. नैसर्गिक साधन सामग्रीच्या व्यवस्थापनासाठी मृद परीक्षण व सर्वेक्षणाच्या आधारे खतांच्या संतुलित वापरासाठी राज्यात मृद आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत दर तीन वर्षांत एकदा शेकतऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे.जिल्ह्यात दोन माती तपासणी केंद्र असून एक शासकीय तर दुसरी पडोली येथील दिनी केमिकल प्रायव्हेट लिमिटेड लॅब आहे. या दोन्ही लॅब मधून सन २०१०-११ मध्ये ३२७ गावातील १० हजार ३२८ मृद नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तर सन २०१२-१३ मध्ये १२८ गावांतील ४ हजार ९९५, सन २०१३-१४ मध्ये २४७ गावांतील ८ हजार १४२ तर सन २१०४-१५ मध्ये १७६ गावांतील ५ हजार ३७२ मृद नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तर २०१५-१६ या वर्षांत १७ हजार ७१० नमुने तपासणीचे लक्ष आहे. गत पाच वर्षात मृद नमुने पृथक्करणाचे काम पूर्ण झाले असून जमीन आरोग्य पुस्तिका वितरित करण्यात आली आहे. का करावी मृद तपासणी?सध्या उन्हाचा हाहाकार उडाला आहे. लवकरच खरीपाचा हंगाम सुरु होईल. मान्सुनच्या आगमनापुर्वी बळीराजाची आपल्या शेतात लगबग सुरु आहे. पण या सगळ्याआधी मातीची तपासणी करणे गरजेचे आहे. आम्ही नेहमीच्या पद्धतीने ठरलेलेच पीक घेणार आहोत, मग आम्हाला मातीच परिक्षण करायची गरज काय, असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं गरजेचं आहे. आपण शेती करताना अनेक प्रकारच्या खतांचा वापर करतो. तसचं पिकांवर वेगवेगळ्या किटकनाशकांची फवारणी करतो. या सगळ्यांमुळे मातीची गुणवत्ता कमी होते, कस खालावतो. याचा परीणाम मातीच्या उत्पादन क्षमतेवर होत असतो. आपल्या शेतजमिनीतील मातीचं परिक्षण तपासणी करुन घेतल्यास आपल्याला मातीची गुणवत्ता कळू शकते.माती नमुना असा घ्यामातीची तपासणी करण्यासाठी आपल्या शेतात नागमोडी पद्धतीने खणुन घ्यावं. मध्यभागी साधारण चार ते सहा इंच खोल खड्डा खोदुन तेथील माती जमा करुन एका ताडपत्रीवर माती जमा करावी. जमा केलेली माती चांगली एकत्र करुन घ्यावी आणि चौकोनात पसरावी. या चौकोनातील मातीचे समसमान चार भाग करावेत. यातील दोन भाग निवडुन त्यातील माती एकत्र मिसळावी. उर्वरीत माती फेकुन द्यावी.