शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

जिल्हा वार्षिक योजनेतील १६६ कोटींना कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

जिल्हा वार्षिक आराखडा आणि विशेष कृती आराखडा नियोजन दरवर्षी जिल्हा नियोजन विकास समितीकडून तयार केला जातो. या समितीकडून विकासाच्या विविध योजनांसाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद केली जाते. जिल्हा नियोजन समितीने २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी २४८ कोटींच्या आराखड्याला चार महिन्यांपूर्वीच मंजूर केला होता.

ठळक मुद्देजिल्हा वार्षिक आराखडा आणि विशेष कृती आराखडा नियोजन दरवर्षी जिल्हा नियोजन विकास समितीकडून तयार केला जातो. या समितीकडून विकासाच्या विविध योजनांसाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद केली जाते. जिल्हा नियोजन समितीने २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) सभेत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना आराखड्यानुसार २४८ कोटींना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या वित्त विभागाने तब्बल १६६ कोटींना कात्री लावून फक्त ८२ कोटींचा निधी मंजूर केला. नियोजन समितीच्या निधीतून ६७ टक्क्यांची कपात केल्याने जिल्ह्याच्या विकासावर मोठा अनिष्ट परिणाम होणार आहे.जिल्हा वार्षिक आराखडा आणि विशेष कृती आराखडा नियोजन दरवर्षी जिल्हा नियोजन विकास समितीकडून तयार केला जातो. या समितीकडून विकासाच्या विविध योजनांसाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद केली जाते. जिल्हा नियोजन समितीने २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी २४८ कोटींच्या आराखड्याला चार महिन्यांपूर्वीच मंजूर केला होता. त्यामध्ये कृषी संलग्न सेवा, ग्रामीण विकास, ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, सामान्य सेवा, सामान्य आर्थिक सेवा, नाविण्यपूर्ण योजनांचा समावेश होता. जिल्हा नियोजन समितीने राज्य शासनाकडे पाठविलेल्या आराखड्याला मंजुरीही मिळाली होती. दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने वित्त विभागाने ४ जून २०२० रोजी शासन निर्णय जारी करून ३३ टक्के निधीलाच मंजुरी देऊन ६७ टक्के निधीला कात्री लागली. त्यानुसार आता जिल्ह्याच्या विकासाकरिता जिल्हा नियोजन विकास समितीला सर्वसामान्य योजनेअंतर्गत केवळ ८२ कोटींचा निधी मिळणार आहे.विकासासाठी केवळ ८ टक्के निधीजिल्हा वार्षिक योजना आराखडा, समाजकल्याण व आदिवासी उपयोजनेसाठी केवळ ३३ टक्के निधी मंजूर करताना खर्चासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाने प्राधान्यक्रम ठरवून दिले आहेत. त्यानुसार प्राप्त होणाऱ्या एकून निधीच्या ३३ टक्के निधीतून २५ टक्के कोरोनाविरूद्ध प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी राखीव ठेवावा लागणार आहे. त्यामुळे मिळणाऱ्या केवळ ८ टक्के निधीतून जिल्ह्यातील विकासाची कामे कशी होणार, हा प्रश्नच आहे.आदिवासी विकास व समाज कल्याण निधीतही कपातसमाज कल्याण व आदिवासी उपयोजनेच्या निधीतही ६८ टक्के कपात करण्यात आली आहे. या दोन्ही विभागाकडून राज्य शासनाकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव सुमारे १०० कोटींचा होता. यंदा अत्यल्प निधी मिळाल्याने आर्थिकदृष्टी गरीबांसाठी सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना बंद राहणार आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषद