शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा वार्षिक योजनेतील १६६ कोटींना कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

जिल्हा वार्षिक आराखडा आणि विशेष कृती आराखडा नियोजन दरवर्षी जिल्हा नियोजन विकास समितीकडून तयार केला जातो. या समितीकडून विकासाच्या विविध योजनांसाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद केली जाते. जिल्हा नियोजन समितीने २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी २४८ कोटींच्या आराखड्याला चार महिन्यांपूर्वीच मंजूर केला होता.

ठळक मुद्देजिल्हा वार्षिक आराखडा आणि विशेष कृती आराखडा नियोजन दरवर्षी जिल्हा नियोजन विकास समितीकडून तयार केला जातो. या समितीकडून विकासाच्या विविध योजनांसाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद केली जाते. जिल्हा नियोजन समितीने २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) सभेत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना आराखड्यानुसार २४८ कोटींना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या वित्त विभागाने तब्बल १६६ कोटींना कात्री लावून फक्त ८२ कोटींचा निधी मंजूर केला. नियोजन समितीच्या निधीतून ६७ टक्क्यांची कपात केल्याने जिल्ह्याच्या विकासावर मोठा अनिष्ट परिणाम होणार आहे.जिल्हा वार्षिक आराखडा आणि विशेष कृती आराखडा नियोजन दरवर्षी जिल्हा नियोजन विकास समितीकडून तयार केला जातो. या समितीकडून विकासाच्या विविध योजनांसाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद केली जाते. जिल्हा नियोजन समितीने २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी २४८ कोटींच्या आराखड्याला चार महिन्यांपूर्वीच मंजूर केला होता. त्यामध्ये कृषी संलग्न सेवा, ग्रामीण विकास, ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, सामान्य सेवा, सामान्य आर्थिक सेवा, नाविण्यपूर्ण योजनांचा समावेश होता. जिल्हा नियोजन समितीने राज्य शासनाकडे पाठविलेल्या आराखड्याला मंजुरीही मिळाली होती. दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने वित्त विभागाने ४ जून २०२० रोजी शासन निर्णय जारी करून ३३ टक्के निधीलाच मंजुरी देऊन ६७ टक्के निधीला कात्री लागली. त्यानुसार आता जिल्ह्याच्या विकासाकरिता जिल्हा नियोजन विकास समितीला सर्वसामान्य योजनेअंतर्गत केवळ ८२ कोटींचा निधी मिळणार आहे.विकासासाठी केवळ ८ टक्के निधीजिल्हा वार्षिक योजना आराखडा, समाजकल्याण व आदिवासी उपयोजनेसाठी केवळ ३३ टक्के निधी मंजूर करताना खर्चासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाने प्राधान्यक्रम ठरवून दिले आहेत. त्यानुसार प्राप्त होणाऱ्या एकून निधीच्या ३३ टक्के निधीतून २५ टक्के कोरोनाविरूद्ध प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी राखीव ठेवावा लागणार आहे. त्यामुळे मिळणाऱ्या केवळ ८ टक्के निधीतून जिल्ह्यातील विकासाची कामे कशी होणार, हा प्रश्नच आहे.आदिवासी विकास व समाज कल्याण निधीतही कपातसमाज कल्याण व आदिवासी उपयोजनेच्या निधीतही ६८ टक्के कपात करण्यात आली आहे. या दोन्ही विभागाकडून राज्य शासनाकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव सुमारे १०० कोटींचा होता. यंदा अत्यल्प निधी मिळाल्याने आर्थिकदृष्टी गरीबांसाठी सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना बंद राहणार आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषद