शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

पगारातून १४०० कपात पीएफमध्ये सातशेचाच भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:40 IST

सावली : येथील नगरपंचायत अतंर्गत कंत्राटदारामार्फत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफसाठी १४०० रुपयांची कपात करण्यात येते. ...

सावली : येथील नगरपंचायत अतंर्गत कंत्राटदारामार्फत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफसाठी १४०० रुपयांची कपात करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात पीएफमध्ये केवळ ७०० रुपयांचा भरणा करण्यात येतो, असा आरोप करीत येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उलगुलान कामगार संघटनेच्या नेतृत्वात मागील तीन दिवसांपासून नगरपंचायत कार्यालयासमोर धरणा आंदोलन सुरु केले आहे.

सावली नगरपंचायतमार्फत घनकचरा व्यवस्थापन व नाली साफसफाईचे काम एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आले आहे. हा कंत्राट २० सप्टेंबर रोजी संपुष्टात आला. मात्र कोरोनामुळे त्याच कंत्राटदाराला वाढीव ठेका देण्यात आला. या कंत्राटदरामार्फत सुमारे २० च्या जवळपास कर्मचारी काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफच्या नावाखाली १४०० रुपये कपात करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात पीएफमध्ये केवळ ७०० रुपयांचाच भरणा करण्यात येतो. तसेच त्यांना सुरक्षात्मक सोई सुविधा पुरविण्यात येत नाही. याबाबत अनेकदा कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला. तसेच मुख्याधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले. मात्र कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. याउलट कंत्राटदाराकडून त्यांना कामावरुन कमी करण्याची धमकी देण्यात येते. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी पीएफचे थकीत रुपयांचा भरणा करावा, किमान वेतन द्यावे, राष्ट्रीयकृत बॅंकेत वेतन जमा करावे, वेतन स्लीप देण्यात यावी, सफाई कामगारांना सेफ्टी शुज व अफरान द्यावे, पी.एफ नंबर द्यावा, साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी उलगुलान कामगार संघटनेच्या माध्यमातून नगरपंचायतीसमोर धरणा आंदोलन करीत आहे. या आंदोलनात संजय वसाके, बंडू मोहुर्ले, विकास सहारे, मयुर दुधे, गणेश मोहुर्ले, सुधीर लेनगुरे, विनोद निकुरे, चंद्रशेखर वसाके, समीर मोहुर्ले, सचिन मोहुर्ले, साईनाथ वसाके, अजय वसाके, भिकाजी निकुरे, फुलचंद थोरात, नत्थु थोरात, दयाळ खोब्रागडे, सोनी गणवीर, सरलाबाई थोरात, वंदना लांजेवार, माया जांभुळे आदी सहभागी झाले आहेत.

बॉक्स

शहरातील कचरासंकलन प्रभावीत

स्वच्छता कर्मचारी दररोज घरोघरी जावून कचरा संकलीत करीत होते. मात्र प्रलंबित मागण्यांसाठी स्वच्छता कर्मचारी मागील तीन दिवसांपासून धरणा आंदोलन करीत आहेत. त्यामुळे शहरातील कचरा संकलन बंद झाले आहे. त्यामुळे कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याची मोठी अडचण जात आहे.