शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
3
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
4
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
5
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
6
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
7
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
8
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
9
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
10
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
11
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
12
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
13
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
14
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
15
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
16
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
17
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
18
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
19
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

चंद्रपूरच्या मूल तालुक्यात वाघाने घेतला १३ वा बळी; शेतात काम करीत असताना केला अचानक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2022 16:27 IST

मे महिन्यात १५ तारखेला याच जंगलाला लागून असलेल्या सोमनाथ प्रकल्पालगत तेंदूपत्ता तोडणीला गेलेल्या व्यक्तीला वाघाने हल्ला करून ठार केले होते. तर, १५ दिवसातच वाघाने पुन्हा एकाचा बळी घेतला आहे.

मूल (चंद्रपूर) : तालुक्यातील करवन येथील शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतमजुरावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारी सकाळी ८ च्या दरम्यान घडली. मूल तालुक्यात आत्तापर्यंत वाघहल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला असून ही १३ वी घटना आहे. 

रामभाऊ कारू मरापे (४५) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. करवन सभोवतालचा परिसर संपूर्ण जंगलव्याप्त असून याभागात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. सध्या शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी व शेतमजुरांना पोटाच्या भाकरीसाठी शेतात जाणे भाग पडते. परंतु वाघाच्या दहशतीमुळे जंगलव्याप्त गावात शेती करणे कठीण होत असल्याची चर्चा करवन काटवन गावात आहे.

घटनेची माहिती मिळताच विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र सहायक जोशी, बिट वनरक्षक वासेकर, परचाके, हे घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या समक्ष पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. वनविभागातर्फे मृतकाच्या कुटुंबीयांना तत्काळ २० हजारांची मदत देण्यात आली.

मे महिन्यात १५ तारखेला याच जंगलाला लागून असलेल्या सोमनाथ प्रकल्पालगत तेंदूपत्ता तोडणीला गेलेल्या व्यक्तीला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजीच आहे. तालुक्यात आजपर्यंत वाघाने १२ बळी घेतलेले असून रामभाऊ १३ वा बळी ठरला आहे. वन्यप्राणी - मानव संघर्ष बघता मानवावर हल्ला करणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करून मानवाला संरक्षण द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यूchandrapur-acचंद्रपूर