शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

गडचांदूरचे ते १३० कुटुंब अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

कार्यादेशानंतरही विद्युत कनेक्शन देण्यास ‘महावितरण’ची टाळाटाळ गड़चांदूर : गडचांदूर येथे गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बंगाली ...

कार्यादेशानंतरही विद्युत कनेक्शन देण्यास ‘महावितरण’ची टाळाटाळ

गड़चांदूर : गडचांदूर येथे गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बंगाली कॅम्प परिसरातील १३० कुटुंबांना अद्याप विद्युत कनेक्शन मिळाले नाही. नागरिकांनी वारंवार मागणी केल्यानंतर विद्युत कनेक्शन देण्यासाठी सात लाख ६८ हजार ५७९ रुपयांचा शासकीय निधी मंजूर झाला. कार्यादेशदेखील देण्यात आला असून अजूनही ‘महावितरण’ने कामास सुरुवात केलेली दिसत नाही. विशेष म्हणजे अंधारात साप चावून अनेकांचा जीवदेखील गेला आहे. विद्युत कनेक्शन नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने बहाल केला आहे. विद्युत कनेक्शन मिळणे हा मूलभूत अधिकारांचा भाग आहे. नागरिकांनी आवश्यक सर्व दस्त, शुल्क आणि ऑनलाईन प्रक्रिया पार करूनदेखील महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे बंगाली कॅम्पचे कुटुंब अंधारात असून नागरिकांत रोष निर्माण झाला आहे.

सदर जागेवर बंगाली कॅम्पवासियांनी ४० वर्षांपासून अतिक्रमण केले असून महसुली अभिलेखानुसार ती जागा माणिकगड प्रशासनाची असल्याने अतिक्रमणधारकांना विद्युत कनेक्शन देऊ नये, असे पत्र महावितरण कंपनीला माणिकगड प्रशासनाने दिले आहे. माणिकगड कंपनी प्रशासनातील अधिकारी व ‘महावितरण’चे अधिकारी आपसी संगनमत करून नागरिकांना अंधारात ठेवत असल्याचा आरोप प्रहारचे माजी तालुकाध्यक्ष सतीश बिडकर यांनी केला आहे.

माणिकगड प्रशासनाने हरकत घेतली आहे. कामाच्या विलंबाचे नेमके कारण सांगता येणार नाही. चंद्रपूर येथील वरिष्ठ अधिकारी हे संपूर्ण चौकशीनंतर विद्युत कनेक्शन द्यायचे की नाही याबाबत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया गडचांदूर येथील महावितरण अधिकारी इंदुरीकर यांनी दिली.