शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

गडचांदूरचे ते १३० कुटुंब अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

कार्यादेशानंतरही विद्युत कनेक्शन देण्यास ‘महावितरण’ची टाळाटाळ गड़चांदूर : गडचांदूर येथे गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बंगाली ...

कार्यादेशानंतरही विद्युत कनेक्शन देण्यास ‘महावितरण’ची टाळाटाळ

गड़चांदूर : गडचांदूर येथे गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बंगाली कॅम्प परिसरातील १३० कुटुंबांना अद्याप विद्युत कनेक्शन मिळाले नाही. नागरिकांनी वारंवार मागणी केल्यानंतर विद्युत कनेक्शन देण्यासाठी सात लाख ६८ हजार ५७९ रुपयांचा शासकीय निधी मंजूर झाला. कार्यादेशदेखील देण्यात आला असून अजूनही ‘महावितरण’ने कामास सुरुवात केलेली दिसत नाही. विशेष म्हणजे अंधारात साप चावून अनेकांचा जीवदेखील गेला आहे. विद्युत कनेक्शन नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने बहाल केला आहे. विद्युत कनेक्शन मिळणे हा मूलभूत अधिकारांचा भाग आहे. नागरिकांनी आवश्यक सर्व दस्त, शुल्क आणि ऑनलाईन प्रक्रिया पार करूनदेखील महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे बंगाली कॅम्पचे कुटुंब अंधारात असून नागरिकांत रोष निर्माण झाला आहे.

सदर जागेवर बंगाली कॅम्पवासियांनी ४० वर्षांपासून अतिक्रमण केले असून महसुली अभिलेखानुसार ती जागा माणिकगड प्रशासनाची असल्याने अतिक्रमणधारकांना विद्युत कनेक्शन देऊ नये, असे पत्र महावितरण कंपनीला माणिकगड प्रशासनाने दिले आहे. माणिकगड कंपनी प्रशासनातील अधिकारी व ‘महावितरण’चे अधिकारी आपसी संगनमत करून नागरिकांना अंधारात ठेवत असल्याचा आरोप प्रहारचे माजी तालुकाध्यक्ष सतीश बिडकर यांनी केला आहे.

माणिकगड प्रशासनाने हरकत घेतली आहे. कामाच्या विलंबाचे नेमके कारण सांगता येणार नाही. चंद्रपूर येथील वरिष्ठ अधिकारी हे संपूर्ण चौकशीनंतर विद्युत कनेक्शन द्यायचे की नाही याबाबत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया गडचांदूर येथील महावितरण अधिकारी इंदुरीकर यांनी दिली.