शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

१२ हजार शिक्षक पदभरतीसाठी ‘तारीख पे तारीख’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:52 IST

राज्य शासनाने १२ हजार जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली. मात्र मागील सहा महिन्यांपासून पसंती क्रमांक देण्यासाठी शिक्षण विभागांकडून वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत. यामुळे पात्रताधारक उमेदवार त्रस्त झाले असून शिक्षक भरती होणार की केवळ फार्स ठरणार, असा प्रश्न विचारू लागले आहेत.

ठळक मुद्देपात्रताधारक उमेदवार त्रस्त पसंतीक्रम नोंदविण्याची प्रतीक्षा

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने १२ हजार जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली. मात्र मागील सहा महिन्यांपासून पसंती क्रमांक देण्यासाठी शिक्षण विभागांकडून वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत. यामुळे पात्रताधारक उमेदवार त्रस्त झाले असून शिक्षक भरती होणार की केवळ फार्स ठरणार, असा प्रश्न विचारू लागले आहेत.राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांच्या २४ हजार रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याची घोषणा शासनाने केली होती. या घोषणेमुळे डीटीएड व बीएड पदवीकाधारकांनी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू केली. मात्र, केवळ १२ हजार जागा भरतीसाठी शासनाने पवित्र पोर्टल सुरू करून पहिल्याच टप्प्यात राज्यातील हजारो उमेदवारांचा हिरमोड केला. पण, नोकरीअभावी हैराण झालेल्या उमेदवारांनी टीईटी आणि अभियोग्यता चाचणी (टीएआयटी) उत्तीर्ण उमेदवारांनी मोठ्या आशेने पवित्र पोर्टलवर अर्ज केले. अर्ज पडताळणी झाल्यानंतर पात्रताधारकांना स्वत:च्या आवडीच्या शाळेसाठी आता केवळ पसंतीक्रमाक द्यावयाचा होता. दरम्यान, शिक्षण विभागाने ५ मार्चपासून सदर जागांसंबंधी पवित्र पोर्टलवर पसंती नोदवावे, असे कळविण्यात आले होते. परंतु, ४ मार्च रोजी परिपत्रक जारी करून ११ मार्चपासून पसंती क्रमांक देण्यास सुरुवात होईल, अशाही सुचना दिल्या. त्यानंतर ८ व २६ एप्रिल आणि आता ३० एप्रिल रोजी पसंती क्रमांक देण्यासाठी पोर्टल सुरूहोईल, असे परिपत्रकाद्वारे नमूद करून पुन्हा संभ्रम निर्माण करण्यात आला. परिणामी, शिक्षण विभागाचे हे ‘तारीख पे तारीख’ धोरण उमेदवारांसाठी तापदायक ठरले आहे.विभागीय स्तरावरही हिरमोडपात्रताधारकांना पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी अर्ज करायचा होता. मात्र पोर्टल सुरू झाल्यापासूनच अर्ज भरणाऱ्यांना अग्निदिव्यातून सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी पोर्टलद्वारे अर्ज केला तेव्हा अर्ज सेल्फ सर्टिफिकेट झाले नाही तर अनेकांच्या प्रिंट निघाल्या नाही. हजारो उमेदवारांना स्वयंप्रमाणपत्र अपडेट करताना अडचणी आल्या होत्या. या समस्या सोडविण्यासाठी पात्रताधारकांना विभागीय स्तरावर बोलविण्यात आले. पण, समस्या जैसे थे आहेत.सात याचिकांमध्ये अडकली प्रक्रियाशिक्षक भरती प्रक्रियेविरूद्ध उच्च न्यायालयात सात याचिका दाखल झाल्या आहेत. इंग्रजी माध्यमातील २० टक्के आरक्षणाबाबत अंतरिम निर्णय आला. पण, हाही प्रश्न पूर्णत: सुटला नाही. या याचिकांवर न्यायालयात सुनावणी झाल्याशिवाय भरती प्रक्रियेचे ग्रहण सुटणार नाही, अशी राज्यातील स्थिती आहे.एकत्रित सुनावणीसाठी न्यायालयाला विनंती करणारशिक्षक भरती प्रक्रियेसाठी विशेष संगणक प्रणाली तयार आहे. परंतु, न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने यासंदर्भात निर्णय घेता येणार नाही. राज्यात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला येत्या १५ दिवसांत केली जाणार आहे. सकारात्मक निकाल लागल्यास मे महिन्यापासून उमेदवारांना संस्थांसाठी प्राधान्यक्रम भरता येईल.-विशाल सोलंकी, शालेय शिक्षण आयुक्त, पुणे 

टॅग्स :Teacherशिक्षक