शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

१२ हजार शिक्षक पदभरतीसाठी ‘तारीख पे तारीख’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:52 IST

राज्य शासनाने १२ हजार जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली. मात्र मागील सहा महिन्यांपासून पसंती क्रमांक देण्यासाठी शिक्षण विभागांकडून वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत. यामुळे पात्रताधारक उमेदवार त्रस्त झाले असून शिक्षक भरती होणार की केवळ फार्स ठरणार, असा प्रश्न विचारू लागले आहेत.

ठळक मुद्देपात्रताधारक उमेदवार त्रस्त पसंतीक्रम नोंदविण्याची प्रतीक्षा

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने १२ हजार जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली. मात्र मागील सहा महिन्यांपासून पसंती क्रमांक देण्यासाठी शिक्षण विभागांकडून वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत. यामुळे पात्रताधारक उमेदवार त्रस्त झाले असून शिक्षक भरती होणार की केवळ फार्स ठरणार, असा प्रश्न विचारू लागले आहेत.राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांच्या २४ हजार रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याची घोषणा शासनाने केली होती. या घोषणेमुळे डीटीएड व बीएड पदवीकाधारकांनी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू केली. मात्र, केवळ १२ हजार जागा भरतीसाठी शासनाने पवित्र पोर्टल सुरू करून पहिल्याच टप्प्यात राज्यातील हजारो उमेदवारांचा हिरमोड केला. पण, नोकरीअभावी हैराण झालेल्या उमेदवारांनी टीईटी आणि अभियोग्यता चाचणी (टीएआयटी) उत्तीर्ण उमेदवारांनी मोठ्या आशेने पवित्र पोर्टलवर अर्ज केले. अर्ज पडताळणी झाल्यानंतर पात्रताधारकांना स्वत:च्या आवडीच्या शाळेसाठी आता केवळ पसंतीक्रमाक द्यावयाचा होता. दरम्यान, शिक्षण विभागाने ५ मार्चपासून सदर जागांसंबंधी पवित्र पोर्टलवर पसंती नोदवावे, असे कळविण्यात आले होते. परंतु, ४ मार्च रोजी परिपत्रक जारी करून ११ मार्चपासून पसंती क्रमांक देण्यास सुरुवात होईल, अशाही सुचना दिल्या. त्यानंतर ८ व २६ एप्रिल आणि आता ३० एप्रिल रोजी पसंती क्रमांक देण्यासाठी पोर्टल सुरूहोईल, असे परिपत्रकाद्वारे नमूद करून पुन्हा संभ्रम निर्माण करण्यात आला. परिणामी, शिक्षण विभागाचे हे ‘तारीख पे तारीख’ धोरण उमेदवारांसाठी तापदायक ठरले आहे.विभागीय स्तरावरही हिरमोडपात्रताधारकांना पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी अर्ज करायचा होता. मात्र पोर्टल सुरू झाल्यापासूनच अर्ज भरणाऱ्यांना अग्निदिव्यातून सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी पोर्टलद्वारे अर्ज केला तेव्हा अर्ज सेल्फ सर्टिफिकेट झाले नाही तर अनेकांच्या प्रिंट निघाल्या नाही. हजारो उमेदवारांना स्वयंप्रमाणपत्र अपडेट करताना अडचणी आल्या होत्या. या समस्या सोडविण्यासाठी पात्रताधारकांना विभागीय स्तरावर बोलविण्यात आले. पण, समस्या जैसे थे आहेत.सात याचिकांमध्ये अडकली प्रक्रियाशिक्षक भरती प्रक्रियेविरूद्ध उच्च न्यायालयात सात याचिका दाखल झाल्या आहेत. इंग्रजी माध्यमातील २० टक्के आरक्षणाबाबत अंतरिम निर्णय आला. पण, हाही प्रश्न पूर्णत: सुटला नाही. या याचिकांवर न्यायालयात सुनावणी झाल्याशिवाय भरती प्रक्रियेचे ग्रहण सुटणार नाही, अशी राज्यातील स्थिती आहे.एकत्रित सुनावणीसाठी न्यायालयाला विनंती करणारशिक्षक भरती प्रक्रियेसाठी विशेष संगणक प्रणाली तयार आहे. परंतु, न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने यासंदर्भात निर्णय घेता येणार नाही. राज्यात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला येत्या १५ दिवसांत केली जाणार आहे. सकारात्मक निकाल लागल्यास मे महिन्यापासून उमेदवारांना संस्थांसाठी प्राधान्यक्रम भरता येईल.-विशाल सोलंकी, शालेय शिक्षण आयुक्त, पुणे 

टॅग्स :Teacherशिक्षक