शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

११ धरणांतील पाण्याची पातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:30 IST

यंदा अल्प पाऊस पडल्याने नैसर्गिक जलसाठे पूर्णत: भरले नाहीत. उन्हाची लाहीलाही वाढत असतानाच जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये पाण्याची पातळी खालावली.

ठळक मुद्देकृषी सिंचनावर होणार अनिष्ट परिणाम : जलसकंटाची वाढणार तीव्रता

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यंदा अल्प पाऊस पडल्याने नैसर्गिक जलसाठे पूर्णत: भरले नाहीत. उन्हाची लाहीलाही वाढत असतानाच जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये पाण्याची पातळी खालावली. त्यामुळे कृषी सिंचनावर अनिष्ट परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. धरणातील उपयुक्त साठा लक्षात घेतल्यास मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ३५ टक्के घट झाली आहे.अल्प पावसामुळे जलसाठे भरले नाही. नाले व गावतलावांमध्ये खरीप तसेच रब्बी हंगामामध्ये शेतकºयांना पुरेसे पाणी मिळाले नाही. त्यामुळे पिकांना जोरदार फटका बसला आहे. शेतातील विंधन विहीरी व तलाव आटण्याच्या स्थितीत आहेत. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार दिवसेंदिवस जलाशयात मोठी घट होत आहे. आसोला मेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव, इरई, लालनाला आदी ११ धरणांमधील जलसाठ्यात कमालीची घट झाली. त्यामुळे सिंचनासाठी सोडण्यात येणाºया वेळापत्रकातही फेरबदलाच्या हालचाली आहेत. गतवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आसोला मेंढा तलावात १९.५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. सद्यस्थितीत जलसाठा खालावल्याने शेतकºयांना सिंचनासाठी पुरसे पाणी मिळत नाही. घोडाझरी, नलेश्वर व चारगाव या धरणांची हीच स्थिती आहे. पकडीगुड्डम, डोंगरगाव, इरई धरणातही पुरसे पाणी नसल्याने एप्रिल ते जून महिन्यादरम्यान पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील ११ धरण क्षेत्रातील शेकडो हेक्टर जमिनीला पाण्याचा लाभ होतो. धरणातील जलसाठा लक्षात घेवूनच बहुतेक शेतकरी पिकाचे नियोजन करतात. खरीप व रब्बी हंगामात शेतीसाठी पाणी मिळेल या खात्रीने शेतकºयांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. शिवाय, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्टÑीय बँकांकडून पीककर्ज घेतले. परंतु, पुरसे पाणी मिळत नसल्याने अपेक्षीत उत्पादनाची शक्यता मावळली आहे. इरई धरणातील पाणी चंद्रपूर शहरासाठी पिण्याकरिता वापरले जाते. मनपाने स्वत:चे स्त्रोत निर्माण केले नाही. अशा कठीण परिस्थितीत जलसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असल्याने शहरातील पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र कमी असल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. आता धरणातील पाण्याने तळ गाठल्याने रब्बी पीक हाती येणार की नाही, ही प्रश्नच आहे.शेतीवर अन्याय करु नकाधरणातील जलसाठा दररोज कमी होत असल्याने शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळेल की नाही, अशी भिती शेतकरी व्यक्त करीत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके शेतात उभी आहेत. पुरेसे पाणी मिळाले नाही तर पीक हातचे जाऊ शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने शेतकºयांची समस्या लक्षात घेवून पाणी वाटपाच्या वेळापत्रकात अन्यायकारक बदल करु नये, अशी मागणी जिल्ह्यातील शेकडो शेतकºयांनी केली आहे.दूरदृष्टीअभावी जलसंकट कायमयंदा पावसाने सतत दडी मारल्याने धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे. मार्च ते जून या चार महिन्यात जिल्ह्यातील ११ धरणांतील पाणी पुन्हा तळाला जावू शकते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच काही धरणातील कालव्याची दुरुस्ती झाली नव्हती. त्यामुळे बरेच पाणी वाहून गेले. जलसिंचनाची दूरदृष्टी व नियोजनाअभावी जलसाठा कायम ठेवण्यास अपयश आले. त्यामुळे संबंधीत अधिकाºयांनी संभाव्य जलसंकट लक्षात घेवून तातडीने नियोजन करणे गरजेचे आहे.बोरवेल दुरस्ती मोहीम कासव गतीनेजिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये फेब्रुवारी २०११ पर्यंत १४९ विंधन विहीरी, १६ कुपनलिका आणि १६४ हातपंप बसविण्यात आले. दरम्यान, पाण्याची पातळी खालावल्याने शेकडो बोरवेल्स बिनकामी ठरले. विंधन विहीरीतही पुरेसे पाणी नाही. त्यामुळे किमान बोरवेल्स दुरुस्ती करावी तसेच टँकरने पाणी पुरवठा करावी, अशी मागणी होत आहे.रब्बी पिके वाया जाण्याच्या मार्गावरशेतातील विहिरींमध्ये पुरेसे पाणी नाही. शिवाय, धरणातील पाण्याचा लाभ घेणाºया शेतकºयांना आवश्यकतेनुसार पाणीच मिळत नसल्याने रब्बी पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. लागवडीचा खर्चही निघाला नाही तर जगायचे कसे, हा प्रश्न शेतकºयांना भेडसावू लागला आहे.