शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

११ धरणांतील पाण्याची पातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:30 IST

यंदा अल्प पाऊस पडल्याने नैसर्गिक जलसाठे पूर्णत: भरले नाहीत. उन्हाची लाहीलाही वाढत असतानाच जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये पाण्याची पातळी खालावली.

ठळक मुद्देकृषी सिंचनावर होणार अनिष्ट परिणाम : जलसकंटाची वाढणार तीव्रता

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यंदा अल्प पाऊस पडल्याने नैसर्गिक जलसाठे पूर्णत: भरले नाहीत. उन्हाची लाहीलाही वाढत असतानाच जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये पाण्याची पातळी खालावली. त्यामुळे कृषी सिंचनावर अनिष्ट परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. धरणातील उपयुक्त साठा लक्षात घेतल्यास मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ३५ टक्के घट झाली आहे.अल्प पावसामुळे जलसाठे भरले नाही. नाले व गावतलावांमध्ये खरीप तसेच रब्बी हंगामामध्ये शेतकºयांना पुरेसे पाणी मिळाले नाही. त्यामुळे पिकांना जोरदार फटका बसला आहे. शेतातील विंधन विहीरी व तलाव आटण्याच्या स्थितीत आहेत. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार दिवसेंदिवस जलाशयात मोठी घट होत आहे. आसोला मेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव, इरई, लालनाला आदी ११ धरणांमधील जलसाठ्यात कमालीची घट झाली. त्यामुळे सिंचनासाठी सोडण्यात येणाºया वेळापत्रकातही फेरबदलाच्या हालचाली आहेत. गतवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आसोला मेंढा तलावात १९.५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. सद्यस्थितीत जलसाठा खालावल्याने शेतकºयांना सिंचनासाठी पुरसे पाणी मिळत नाही. घोडाझरी, नलेश्वर व चारगाव या धरणांची हीच स्थिती आहे. पकडीगुड्डम, डोंगरगाव, इरई धरणातही पुरसे पाणी नसल्याने एप्रिल ते जून महिन्यादरम्यान पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील ११ धरण क्षेत्रातील शेकडो हेक्टर जमिनीला पाण्याचा लाभ होतो. धरणातील जलसाठा लक्षात घेवूनच बहुतेक शेतकरी पिकाचे नियोजन करतात. खरीप व रब्बी हंगामात शेतीसाठी पाणी मिळेल या खात्रीने शेतकºयांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. शिवाय, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्टÑीय बँकांकडून पीककर्ज घेतले. परंतु, पुरसे पाणी मिळत नसल्याने अपेक्षीत उत्पादनाची शक्यता मावळली आहे. इरई धरणातील पाणी चंद्रपूर शहरासाठी पिण्याकरिता वापरले जाते. मनपाने स्वत:चे स्त्रोत निर्माण केले नाही. अशा कठीण परिस्थितीत जलसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असल्याने शहरातील पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र कमी असल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. आता धरणातील पाण्याने तळ गाठल्याने रब्बी पीक हाती येणार की नाही, ही प्रश्नच आहे.शेतीवर अन्याय करु नकाधरणातील जलसाठा दररोज कमी होत असल्याने शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळेल की नाही, अशी भिती शेतकरी व्यक्त करीत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके शेतात उभी आहेत. पुरेसे पाणी मिळाले नाही तर पीक हातचे जाऊ शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने शेतकºयांची समस्या लक्षात घेवून पाणी वाटपाच्या वेळापत्रकात अन्यायकारक बदल करु नये, अशी मागणी जिल्ह्यातील शेकडो शेतकºयांनी केली आहे.दूरदृष्टीअभावी जलसंकट कायमयंदा पावसाने सतत दडी मारल्याने धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे. मार्च ते जून या चार महिन्यात जिल्ह्यातील ११ धरणांतील पाणी पुन्हा तळाला जावू शकते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच काही धरणातील कालव्याची दुरुस्ती झाली नव्हती. त्यामुळे बरेच पाणी वाहून गेले. जलसिंचनाची दूरदृष्टी व नियोजनाअभावी जलसाठा कायम ठेवण्यास अपयश आले. त्यामुळे संबंधीत अधिकाºयांनी संभाव्य जलसंकट लक्षात घेवून तातडीने नियोजन करणे गरजेचे आहे.बोरवेल दुरस्ती मोहीम कासव गतीनेजिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये फेब्रुवारी २०११ पर्यंत १४९ विंधन विहीरी, १६ कुपनलिका आणि १६४ हातपंप बसविण्यात आले. दरम्यान, पाण्याची पातळी खालावल्याने शेकडो बोरवेल्स बिनकामी ठरले. विंधन विहीरीतही पुरेसे पाणी नाही. त्यामुळे किमान बोरवेल्स दुरुस्ती करावी तसेच टँकरने पाणी पुरवठा करावी, अशी मागणी होत आहे.रब्बी पिके वाया जाण्याच्या मार्गावरशेतातील विहिरींमध्ये पुरेसे पाणी नाही. शिवाय, धरणातील पाण्याचा लाभ घेणाºया शेतकºयांना आवश्यकतेनुसार पाणीच मिळत नसल्याने रब्बी पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. लागवडीचा खर्चही निघाला नाही तर जगायचे कसे, हा प्रश्न शेतकºयांना भेडसावू लागला आहे.