शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

११ धरणांतील पाण्याची पातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:30 IST

यंदा अल्प पाऊस पडल्याने नैसर्गिक जलसाठे पूर्णत: भरले नाहीत. उन्हाची लाहीलाही वाढत असतानाच जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये पाण्याची पातळी खालावली.

ठळक मुद्देकृषी सिंचनावर होणार अनिष्ट परिणाम : जलसकंटाची वाढणार तीव्रता

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यंदा अल्प पाऊस पडल्याने नैसर्गिक जलसाठे पूर्णत: भरले नाहीत. उन्हाची लाहीलाही वाढत असतानाच जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये पाण्याची पातळी खालावली. त्यामुळे कृषी सिंचनावर अनिष्ट परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. धरणातील उपयुक्त साठा लक्षात घेतल्यास मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ३५ टक्के घट झाली आहे.अल्प पावसामुळे जलसाठे भरले नाही. नाले व गावतलावांमध्ये खरीप तसेच रब्बी हंगामामध्ये शेतकºयांना पुरेसे पाणी मिळाले नाही. त्यामुळे पिकांना जोरदार फटका बसला आहे. शेतातील विंधन विहीरी व तलाव आटण्याच्या स्थितीत आहेत. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार दिवसेंदिवस जलाशयात मोठी घट होत आहे. आसोला मेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव, इरई, लालनाला आदी ११ धरणांमधील जलसाठ्यात कमालीची घट झाली. त्यामुळे सिंचनासाठी सोडण्यात येणाºया वेळापत्रकातही फेरबदलाच्या हालचाली आहेत. गतवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आसोला मेंढा तलावात १९.५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. सद्यस्थितीत जलसाठा खालावल्याने शेतकºयांना सिंचनासाठी पुरसे पाणी मिळत नाही. घोडाझरी, नलेश्वर व चारगाव या धरणांची हीच स्थिती आहे. पकडीगुड्डम, डोंगरगाव, इरई धरणातही पुरसे पाणी नसल्याने एप्रिल ते जून महिन्यादरम्यान पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील ११ धरण क्षेत्रातील शेकडो हेक्टर जमिनीला पाण्याचा लाभ होतो. धरणातील जलसाठा लक्षात घेवूनच बहुतेक शेतकरी पिकाचे नियोजन करतात. खरीप व रब्बी हंगामात शेतीसाठी पाणी मिळेल या खात्रीने शेतकºयांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. शिवाय, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्टÑीय बँकांकडून पीककर्ज घेतले. परंतु, पुरसे पाणी मिळत नसल्याने अपेक्षीत उत्पादनाची शक्यता मावळली आहे. इरई धरणातील पाणी चंद्रपूर शहरासाठी पिण्याकरिता वापरले जाते. मनपाने स्वत:चे स्त्रोत निर्माण केले नाही. अशा कठीण परिस्थितीत जलसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असल्याने शहरातील पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र कमी असल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. आता धरणातील पाण्याने तळ गाठल्याने रब्बी पीक हाती येणार की नाही, ही प्रश्नच आहे.शेतीवर अन्याय करु नकाधरणातील जलसाठा दररोज कमी होत असल्याने शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळेल की नाही, अशी भिती शेतकरी व्यक्त करीत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके शेतात उभी आहेत. पुरेसे पाणी मिळाले नाही तर पीक हातचे जाऊ शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने शेतकºयांची समस्या लक्षात घेवून पाणी वाटपाच्या वेळापत्रकात अन्यायकारक बदल करु नये, अशी मागणी जिल्ह्यातील शेकडो शेतकºयांनी केली आहे.दूरदृष्टीअभावी जलसंकट कायमयंदा पावसाने सतत दडी मारल्याने धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे. मार्च ते जून या चार महिन्यात जिल्ह्यातील ११ धरणांतील पाणी पुन्हा तळाला जावू शकते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच काही धरणातील कालव्याची दुरुस्ती झाली नव्हती. त्यामुळे बरेच पाणी वाहून गेले. जलसिंचनाची दूरदृष्टी व नियोजनाअभावी जलसाठा कायम ठेवण्यास अपयश आले. त्यामुळे संबंधीत अधिकाºयांनी संभाव्य जलसंकट लक्षात घेवून तातडीने नियोजन करणे गरजेचे आहे.बोरवेल दुरस्ती मोहीम कासव गतीनेजिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये फेब्रुवारी २०११ पर्यंत १४९ विंधन विहीरी, १६ कुपनलिका आणि १६४ हातपंप बसविण्यात आले. दरम्यान, पाण्याची पातळी खालावल्याने शेकडो बोरवेल्स बिनकामी ठरले. विंधन विहीरीतही पुरेसे पाणी नाही. त्यामुळे किमान बोरवेल्स दुरुस्ती करावी तसेच टँकरने पाणी पुरवठा करावी, अशी मागणी होत आहे.रब्बी पिके वाया जाण्याच्या मार्गावरशेतातील विहिरींमध्ये पुरेसे पाणी नाही. शिवाय, धरणातील पाण्याचा लाभ घेणाºया शेतकºयांना आवश्यकतेनुसार पाणीच मिळत नसल्याने रब्बी पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. लागवडीचा खर्चही निघाला नाही तर जगायचे कसे, हा प्रश्न शेतकºयांना भेडसावू लागला आहे.