शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

१०६ वर्षांच्या नागभीड- नागपूर रेल्वेला अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

बहुचर्चित नॅरोगेज रेल्व नागभीडवरून नागपूरसाठी दुपारी ४.४५ वाजता सुटते. या गाडीचे इंजिन यावेळी सजविण्यात आले होते. आठवण म्हणून अनेकांनी सजविलेल्या इंजिनसोबत सेल्फी व छायाचित्र काढून घेतले. विशेष म्हणजे, केवळ प्रवासाची आठवण म्हणून अनेकांनी कोटगाव, मांगली, कानपा, भूयार, भिवापूर गावापर्यंत या गाडीने प्रवास केला. ही रेल्वे ज्या स्थानकावर थांबत होती. त्या ठिकाणी नागरिक व प्रवाशांकडून उस्फुर्तपणे स्वागत केल्या जात होते.

ठळक मुद्देउरल्या केवळ आठवणी : सजविलेल्या इंजिनसोबत प्रवाशांनी काढली सेल्फी

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : १०६ वर्षांपासून अव्याहत सुरू असलेल्या नागभीड-नागपूर या बहुचर्चित नॅरोगेज रेल्वेला रविवारी अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी शेकडो प्रवाशांसह खासदार अशोक नेते, बिलासपूर रेल्वे झोन कमिटीचे सल्लागार सदस्य संजय गजपुरे, नगराध्यक्ष उमाजी हिरे, उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, सभापती अवेश पठाण, न.प. सभापती सचिन आकूलवार आदी उपस्थित होते. आता केवळ या गाडीच्या १०६ वर्षांच्या आठवणी प्रवाशांसह रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शिल्लक राहिल्या आहेत.बहुचर्चित नॅरोगेज रेल्व नागभीडवरून नागपूरसाठी दुपारी ४.४५ वाजता सुटते. या गाडीचे इंजिन यावेळी सजविण्यात आले होते. आठवण म्हणून अनेकांनी सजविलेल्या इंजिनसोबत सेल्फी व छायाचित्र काढून घेतले. विशेष म्हणजे, केवळ प्रवासाची आठवण म्हणून अनेकांनी कोटगाव, मांगली, कानपा, भूयार, भिवापूर गावापर्यंत या गाडीने प्रवास केला. ही रेल्वे ज्या स्थानकावर थांबत होती. त्या ठिकाणी नागरिक व प्रवाशांकडून उस्फुर्तपणे स्वागत केल्या जात होते. या गाडीला १०६ वर्षांचा इतिहास असल्याने संपूर्ण तालुक्याच्या भावना या गाडीशी जुळल्या आहेत. किंबहुना नागभीड येथूनच गोंदिया, बल्लारपूर व नागपूर येथे गाड्या रवाना होत असल्याने येथे जंक्शनची निर्मिती झाली होती.एवढेच नाही तर अगदी २० वर्षांपूर्वी पर्यंत नागभीड येथे इंजिन दुरूस्तीचे वर्कशाप कार्यरत होते. यामुळे नागभीड शहराचे नाव सर्वदूर पोहोचले. कृतज्ञतेची ही भावना प्रत्येकाच्या चेहºयावर दिसत होती. अनेकांनी या रेल्वेच्या आठवणी एकमेकांना सांगताना दिसले.२२ महिन्यांत होणार काम पूर्णनव्या ब्रॉडगेजचे काम १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. बांधकाम करणारी कंपनी २२ महिन्यांत काम पूर्ण करणार असल्याची माहिती सूत्रानी दिली. ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाल्यानंतर नागपूरवरून दक्षिणेकडे जाणाºया अनेक गाड्या नागभीडमार्गे वळविण्यात येणार आहेत. ब्रॉडगेज रेल्वेमुळे नागभीड- नागपूर हे अंतर केवळ दीड तासाचे होणार आहे. त्यामुळे या तालुक्याचा नागपूर शहराशी दररोजचा संपर्क पुन्हा वाढणार आहे. यातून शेतमाल विक्रीसाठी नागपूरची मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.असाही एक रेल्वे प्रवाशी...या गाडीन रविवारी गोवा येथील एका पर्यटकाने प्रवास केला. विजय अभ्यंकर असे या पर्यटकाचे नाव आहे. देशातील कुठेही नॅरोगेज गाड्या बंद झाल्याची माहिती मिळताच अभ्यंकर हे तातडीने त्या रेल्वेस्थानकावर जातात. त्या गाडीने प्रवास करतात. नागभीड-नागपूर गाडीतही त्यांनी प्रवास केला.

टॅग्स :railwayरेल्वे