शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

१०३ गावांचे जलस्त्रोत दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:14 IST

आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील तब्बल १०३ गावातील जलस्त्रोत दूषित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यानंतर नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा अहवाल : दूषित पाण्याची टक्केवारी ११.९२

मंगेश भांडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील तब्बल १०३ गावातील जलस्त्रोत दूषित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यानंतर नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत दरवर्षी ग्रामीण व शहरी भागातील पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. ज्या गावातील पाणी नमुने दूषित आढळतात, त्या ग्रामपंचायतींना पत्र देऊन साथरोग टाळण्यासाठी उपाययोजना सुचविल्या जातात. तसेच दूषित पाण्याच्या प्रमाणात वाढ होणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जाते. यावर्षी पावसाळा सुरू होताच आरोग्य विभागाने जून महिन्यात जिल्ह्यातील ३९ आरोग्य केंद्रामार्फत १ हजार ९३१ तर शहरी विभागातील ५७७ अशा २ हजार ५०८ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ग्रामीण विभागात १०३ गावातील २३६ व शहरी विभागातील ६३ असे २९९ पाणी नमुने दूषित असल्याचे निष्पन्न झाले आहेत. याची टक्केवारी ११.९२ एवढी आहे.पावसामुळे दूषित पाणी वाहून आल्याने जलजन्य साथरोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी पाणी शुद्ध करुनच प्यावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, परिसर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.मात्र ज्या गावात पाणी शुद्धीकरणासाठी कोणते यंत्रच उपलब्ध नाही, अशा गावातील नागरिकांना उपलब्ध पाणी स्त्रोतावरच आपली तहान भागवावी लागत आहे. जिवती तालुक्यातील अनेक गावांपर्यंत जिल्हा परिषदेची पाणी पुरवठा योजनाच पोहचली नसल्यामुळे खड्डा खोदून त्यातील पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. याचीही तपासणीही करण्याची गरज आहे.या गावांमधील पाणी दूषितचंद्रपूर तालुक्यातील लोहारा, मामला, हळदी, नुदूर, पिंपळखुट, वायगाव, निंबाळा, चोरगाव, ऊर्जानगर, वडा, धानोरा, पिपरी, उसगाव, सिदूर, मारडा, नकोडा, बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, कळमना, कोर्टीमक्ता, जुनीदहेली, नवीदहेली, कवडजई, पळसगाव, वरोेरा तालुक्यातील वडगाव, जामगाव, बारव्हा, फत्तापूर, पिंपळगाव, मेसा, भद्रावती तालुक्यातील चेकबंराज, पिपरबोडी, पावना रै, मोरवा, कढोली, देऊरवाडा, घोसरी, मुधोली, नागभीड तालुक्यातील सावरगाव, मेंढा, ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ जाणी, माहेर, नवेगाव, मेंडकी, तुलाना माल, पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना, गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव, सिंदेवाही तालुक्यातील सरपडपार, मोहाडी, घोट, सावरगाव, सामदा, कच्चेपार, रत्नापूर, शिवणी, सावली तालुक्यातील आकापूर, बेलगाव, बोरमाळ, कसरगाव, व्याहाड बु., पारडी, मूल तालुक्यातील सुशी, आगडी, मणिपूर, अवर्शखेडा, हळदी गावमन्ना, चिचाळा, ताडाळा, कोसंबी, बेंबाळ, नवेगाव, भु., नांदगाव, चिमूर तालुक्यातील सोनगाव बन, पेठ भांसुली, खडसंगी, भिवापूर, नवेगाव, वडाळा पैकू, नवेगाव, भिसी, चक जांभुळ, मासळ, कोलारा, मानेमोहाडी, सातारा, बामणगाव, राजुरा तालुक्यातील चिंचोली, गोवरी, रामनगर, धोपटाळा, धिडसी, देवाडा, साखरवाही, खामोना, जिवती तालुक्यातील कामतगुडा, मरकागोंदी, सलीमनगर, कोरपना तालुक्यातील हिरापूर, विरूर, शेरज आदी गावांचा समावेश आहे.दूषित पाणी आढळलेल्या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू आहेत. पावसामुळे जलजन्य आजार उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी पाणी उखळूनच प्यावे. आरोग्याबाबत सर्तक राहून पसिरात स्वच्छता ठेवावी.- डॉ. श्रीराम गोगुलवारजिल्हा आरोग्य अधिकारी