शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

१०९ नवजात बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:29 IST

बाळाचा जन्म म्हणजे सर्वांसाठी आनंदोत्सवच. मात्र आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांच्या आयुष्यातील हा आनंदोत्सव दु:खाचे कुरण ठरत आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागात एप्रिल ते जुलै या चार महिन्यात तब्बल १०९ नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देचार महिन्यातील स्थिती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील भोंगळ कारभार

परीमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बाळाचा जन्म म्हणजे सर्वांसाठी आनंदोत्सवच. मात्र आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांच्या आयुष्यातील हा आनंदोत्सव दु:खाचे कुरण ठरत आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागात एप्रिल ते जुलै या चार महिन्यात तब्बल १०९ नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. आईच्या गर्भात सुरक्षित श्वास घेत कलेकलेने मोठा होत जाणारा अर्भक नवजात बाळ म्हणून विश्वात पदार्पण करताच असा मृत्यूच्या दाढेत जात असल्याने येथील आरोग्य यंत्रणेविषयी जनसामान्यात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागात मागील तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात नवजात बाळांचा मृत्यू होत असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. मागील चार महिन्यांत जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसृतीसाठी दोन हजार ६६२ महिला भरती झाल्या. त्यापैकी एक हजार ७७४ प्रसृती नार्मल तर ८८८ प्रसृती सिझर करण्यात आल्या. त्यापैकी १०९ नवजात बालकांचा विविध कारणांने मृत्यू झाला. बाळ अविकसित असणे, प्रसुती उशिरा होऊन बाळाला आॅक्सिजन न मिळणे ही कारणे या नवजात बालकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. खान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र केवळ चार महिन्यात तब्बल १०९ नवजात बालके रुग्णालयातच दगावत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान, मागील वर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. आॅगस्ट व सप्टेंबर २०१७ मध्ये ६८ दिवसात ८० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. याबाबतचे ‘लोकमत’ने प्रकाशित करताच आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली होती.१०८ उपजत बालकांचा मृत्यूचंद्रपुरात मेडिकल कॉलेज झाल्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरील रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र रुग्णालयात पाहिजे त्या प्रमाणात सोई उपलब्ध नसल्यामुळे चार महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी १०८ उपजत बालकांचा मृत्यू झाला आहे.जिल्हाभर परिस्थिती गंभीरनवजात बालकांच्या मृत्यूची ही आकडेवारी केवळ चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात आणि उपजिल्हा रुग्णालयात अशीच स्थिती आहे. तिथेही अनेक सोईसुविधांचा अभाव असल्याने प्रसुत मातांना, त्यांच्या नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वास्तविक गर्भवती महिला, प्रसुत मातांनी काय खावे, कसे रहावे, याबाबत आरोग्य यंत्रणेकडून गावागावात जावून जनजागृती करणे अपेक्षित आहे. याशिवाय अनेक शासकीय योजनांद्वारे त्यांना पोषक आहारही दिला जातो. मात्र शासनाच्या या योजनांची गावागावात अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे गोरगरीब व शेतमजूर महिला व त्यांच्या अपत्यांचा बळी जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यू