शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

१०९ नवजात बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:29 IST

बाळाचा जन्म म्हणजे सर्वांसाठी आनंदोत्सवच. मात्र आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांच्या आयुष्यातील हा आनंदोत्सव दु:खाचे कुरण ठरत आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागात एप्रिल ते जुलै या चार महिन्यात तब्बल १०९ नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देचार महिन्यातील स्थिती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील भोंगळ कारभार

परीमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बाळाचा जन्म म्हणजे सर्वांसाठी आनंदोत्सवच. मात्र आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांच्या आयुष्यातील हा आनंदोत्सव दु:खाचे कुरण ठरत आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागात एप्रिल ते जुलै या चार महिन्यात तब्बल १०९ नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. आईच्या गर्भात सुरक्षित श्वास घेत कलेकलेने मोठा होत जाणारा अर्भक नवजात बाळ म्हणून विश्वात पदार्पण करताच असा मृत्यूच्या दाढेत जात असल्याने येथील आरोग्य यंत्रणेविषयी जनसामान्यात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागात मागील तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात नवजात बाळांचा मृत्यू होत असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. मागील चार महिन्यांत जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसृतीसाठी दोन हजार ६६२ महिला भरती झाल्या. त्यापैकी एक हजार ७७४ प्रसृती नार्मल तर ८८८ प्रसृती सिझर करण्यात आल्या. त्यापैकी १०९ नवजात बालकांचा विविध कारणांने मृत्यू झाला. बाळ अविकसित असणे, प्रसुती उशिरा होऊन बाळाला आॅक्सिजन न मिळणे ही कारणे या नवजात बालकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. खान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र केवळ चार महिन्यात तब्बल १०९ नवजात बालके रुग्णालयातच दगावत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान, मागील वर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. आॅगस्ट व सप्टेंबर २०१७ मध्ये ६८ दिवसात ८० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. याबाबतचे ‘लोकमत’ने प्रकाशित करताच आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली होती.१०८ उपजत बालकांचा मृत्यूचंद्रपुरात मेडिकल कॉलेज झाल्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरील रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र रुग्णालयात पाहिजे त्या प्रमाणात सोई उपलब्ध नसल्यामुळे चार महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी १०८ उपजत बालकांचा मृत्यू झाला आहे.जिल्हाभर परिस्थिती गंभीरनवजात बालकांच्या मृत्यूची ही आकडेवारी केवळ चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात आणि उपजिल्हा रुग्णालयात अशीच स्थिती आहे. तिथेही अनेक सोईसुविधांचा अभाव असल्याने प्रसुत मातांना, त्यांच्या नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वास्तविक गर्भवती महिला, प्रसुत मातांनी काय खावे, कसे रहावे, याबाबत आरोग्य यंत्रणेकडून गावागावात जावून जनजागृती करणे अपेक्षित आहे. याशिवाय अनेक शासकीय योजनांद्वारे त्यांना पोषक आहारही दिला जातो. मात्र शासनाच्या या योजनांची गावागावात अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे गोरगरीब व शेतमजूर महिला व त्यांच्या अपत्यांचा बळी जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यू