शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कृषी क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या! तब्बल १.१० कोटी युवकांना दिली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 06:29 IST

इतर क्षेत्रात नोकऱ्या जात असताना कृषी क्षेत्राने दिल्या १.१० कोटी जणांना संधी

नवी दिल्ली : कोरोनामुळे जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था प्रचंड हेलकावे खात होती आणि कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या हातातून गेल्या त्यावेळी कृषी क्षेत्राने लोकांच्या जखमेवर मलम लावण्याचे काम केले. गेल्या ३ वर्षांत कृषी क्षेत्राने १.१० कोटी अतिरिक्त लोकांना नोकरीची संधी दिली असून या दरम्यान देशाच्या अन्य सर्व क्षेत्रांतील मिळून १.५० कोटींपेक्षा अधिक लोकांची नोकरी गेली होती. सीएमआयईच्या कंज्युमर पिरामिड हाऊसहोल्ड सर्वेक्षणानुसार २०२१-२२ मध्ये कृषी क्षेत्राने ४५ लाख नवे रोजगार निर्माण केले.

कृषी क्षेत्राने असा दिला अधिक रोजगार

२.१७कोटी लोक २०२०-२१ मध्ये बेरोजगार झाले. मात्र, याचवेळी कृषी क्षेत्रात ३४ लाख रोजगार वाढले. ३.३% दराने कोरोनात २०२०-२१ मध्ये कृषी क्षेत्राची वाढ झाली. तर अर्थव्यवस्थेमध्ये ६.३%ची घसरण झाली. ५.५% दराने २०१९-२० मध्ये कृषी क्षेत्राची वाढ झाली तर इतर क्षेत्राची वाढ केवळ ३.३ टक्के दराने झाली. २५-३०% खाद्य पदार्थांच्या किमती गेल्या ३ वर्षांत वाढल्या. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा झाला. रसायने आणि खतांमुळे अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढला आहे. यामुळे सध्या नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. भारत आता गहू व तांदूळ निर्यात करणारा देश बनला आहे. अकार्यक्षम पुरवठा साखळी आणि कमी संपर्क यामुळे देशाची कृषी क्षेत्राची उत्पादकता कमी आहे. - अमिताभ कांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोग

शेतकरी सकारात्मक

कृषी क्षेत्राच्या विकासाबाबत शेतकरी अद्यापही आशावादी आहेत. १८.१% शेतकऱ्यांची सेंटीमेंट (भावना) मार्च २०२२ मध्ये सकारात्मक राहिली आहे, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक आहेत. १६.१%एवढा प्रमुख व्यावसायिकांचा सकारात्मकतेचा निर्देशांक राहिला आहे. अहवालानुसार कोरोनात देशाच्या कृषी क्षेत्राला सर्वात कमी फटका बसला.

टॅग्स :agricultureशेती