शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

कृषी क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या! तब्बल १.१० कोटी युवकांना दिली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 06:29 IST

इतर क्षेत्रात नोकऱ्या जात असताना कृषी क्षेत्राने दिल्या १.१० कोटी जणांना संधी

नवी दिल्ली : कोरोनामुळे जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था प्रचंड हेलकावे खात होती आणि कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या हातातून गेल्या त्यावेळी कृषी क्षेत्राने लोकांच्या जखमेवर मलम लावण्याचे काम केले. गेल्या ३ वर्षांत कृषी क्षेत्राने १.१० कोटी अतिरिक्त लोकांना नोकरीची संधी दिली असून या दरम्यान देशाच्या अन्य सर्व क्षेत्रांतील मिळून १.५० कोटींपेक्षा अधिक लोकांची नोकरी गेली होती. सीएमआयईच्या कंज्युमर पिरामिड हाऊसहोल्ड सर्वेक्षणानुसार २०२१-२२ मध्ये कृषी क्षेत्राने ४५ लाख नवे रोजगार निर्माण केले.

कृषी क्षेत्राने असा दिला अधिक रोजगार

२.१७कोटी लोक २०२०-२१ मध्ये बेरोजगार झाले. मात्र, याचवेळी कृषी क्षेत्रात ३४ लाख रोजगार वाढले. ३.३% दराने कोरोनात २०२०-२१ मध्ये कृषी क्षेत्राची वाढ झाली. तर अर्थव्यवस्थेमध्ये ६.३%ची घसरण झाली. ५.५% दराने २०१९-२० मध्ये कृषी क्षेत्राची वाढ झाली तर इतर क्षेत्राची वाढ केवळ ३.३ टक्के दराने झाली. २५-३०% खाद्य पदार्थांच्या किमती गेल्या ३ वर्षांत वाढल्या. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा झाला. रसायने आणि खतांमुळे अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढला आहे. यामुळे सध्या नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. भारत आता गहू व तांदूळ निर्यात करणारा देश बनला आहे. अकार्यक्षम पुरवठा साखळी आणि कमी संपर्क यामुळे देशाची कृषी क्षेत्राची उत्पादकता कमी आहे. - अमिताभ कांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोग

शेतकरी सकारात्मक

कृषी क्षेत्राच्या विकासाबाबत शेतकरी अद्यापही आशावादी आहेत. १८.१% शेतकऱ्यांची सेंटीमेंट (भावना) मार्च २०२२ मध्ये सकारात्मक राहिली आहे, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक आहेत. १६.१%एवढा प्रमुख व्यावसायिकांचा सकारात्मकतेचा निर्देशांक राहिला आहे. अहवालानुसार कोरोनात देशाच्या कृषी क्षेत्राला सर्वात कमी फटका बसला.

टॅग्स :agricultureशेती