शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

कृषी क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या! तब्बल १.१० कोटी युवकांना दिली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 06:29 IST

इतर क्षेत्रात नोकऱ्या जात असताना कृषी क्षेत्राने दिल्या १.१० कोटी जणांना संधी

नवी दिल्ली : कोरोनामुळे जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था प्रचंड हेलकावे खात होती आणि कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या हातातून गेल्या त्यावेळी कृषी क्षेत्राने लोकांच्या जखमेवर मलम लावण्याचे काम केले. गेल्या ३ वर्षांत कृषी क्षेत्राने १.१० कोटी अतिरिक्त लोकांना नोकरीची संधी दिली असून या दरम्यान देशाच्या अन्य सर्व क्षेत्रांतील मिळून १.५० कोटींपेक्षा अधिक लोकांची नोकरी गेली होती. सीएमआयईच्या कंज्युमर पिरामिड हाऊसहोल्ड सर्वेक्षणानुसार २०२१-२२ मध्ये कृषी क्षेत्राने ४५ लाख नवे रोजगार निर्माण केले.

कृषी क्षेत्राने असा दिला अधिक रोजगार

२.१७कोटी लोक २०२०-२१ मध्ये बेरोजगार झाले. मात्र, याचवेळी कृषी क्षेत्रात ३४ लाख रोजगार वाढले. ३.३% दराने कोरोनात २०२०-२१ मध्ये कृषी क्षेत्राची वाढ झाली. तर अर्थव्यवस्थेमध्ये ६.३%ची घसरण झाली. ५.५% दराने २०१९-२० मध्ये कृषी क्षेत्राची वाढ झाली तर इतर क्षेत्राची वाढ केवळ ३.३ टक्के दराने झाली. २५-३०% खाद्य पदार्थांच्या किमती गेल्या ३ वर्षांत वाढल्या. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा झाला. रसायने आणि खतांमुळे अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढला आहे. यामुळे सध्या नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. भारत आता गहू व तांदूळ निर्यात करणारा देश बनला आहे. अकार्यक्षम पुरवठा साखळी आणि कमी संपर्क यामुळे देशाची कृषी क्षेत्राची उत्पादकता कमी आहे. - अमिताभ कांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोग

शेतकरी सकारात्मक

कृषी क्षेत्राच्या विकासाबाबत शेतकरी अद्यापही आशावादी आहेत. १८.१% शेतकऱ्यांची सेंटीमेंट (भावना) मार्च २०२२ मध्ये सकारात्मक राहिली आहे, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक आहेत. १६.१%एवढा प्रमुख व्यावसायिकांचा सकारात्मकतेचा निर्देशांक राहिला आहे. अहवालानुसार कोरोनात देशाच्या कृषी क्षेत्राला सर्वात कमी फटका बसला.

टॅग्स :agricultureशेती