शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी! आजपासून अग्निवीरवायू भरतीची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:16 IST

​​​​​​​IAF Agniveervayu Recruitment 2025 : इच्छुक उमेदवार agnipathvayu.cdac.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

IAF Agniveervayu Recruitment 2025 : नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने अग्निवीरवायू 2025 भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 7 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार agnipathvayu.cdac.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे.  

शैक्षणिक पात्रताअग्निवीरवायू पदांसाठी उमेदवार गणित आणि भौतिकशास्त्रासह 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच,उमेदवाराने इंग्रजीतही 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. याचबरोबर 50 टक्के गुणांचा इंजिनीअरिंग डिप्लोमा असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.

वयोमर्यादाअग्निवीरवायू पदांसाठी उमेदवाराचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराची जन्म तारीख 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2008 दरम्यान असावी. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जर उमेदवार निवड प्रक्रियेचे सर्व टप्पे पार करत असेल तर नावनोंदणीच्या तारखेनुसार त्याचे कमाल वय 21 वर्षे असावे.

अर्ज शुल्कउमेदवारांना 550 रुपये परीक्षा शुल्क आणि जीएसटी भरावा लागेल. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज शुल्क भरता येते.

अर्ज कसा करावा?agnipathvayu.cdac.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. अग्निवीरवायू भरती 2025 च्या लिंकवर क्लिक करा. आता नोंदणी करून अर्ज भरून कागदपत्रे अपलोड करा. यानंतर शुल्क भरा आणि सबमिट करा. 

निवड कशी होईल?उमेदवारांची निवड सीबीटी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रं पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाईल. उमेदवारांनी निवडलेल्या विषयांच्या (विज्ञान किंवा इतर) आधारे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन