शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारमध्ये ९ लाख पदे रिक्त, सर्वाधिक रेल्वे आणि संरक्षणमध्ये; कधी होणार या पदांवर भरती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 09:40 IST

Govt Jobs : सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या ९.७९ लाखांहून अधिक असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ९.७९ लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत नोकरीसाठी भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना या पदांवर नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, सरकारी नोकरीची (Sarkari Naukri) तयारी करणाऱ्या तरुणांची संख्या लाखोंच्या घरात आहे. तुम्हाला देशातील प्रत्येक शहरात अशी अनेक कोचिंग सेंटर्स सापडतील, जिथे तुम्हाला तरुण नोकरीसाठी तयारी करताना दिसतील. 

आता रिक्त पदांची माहिती सरकारकडून अपेक्षित असून, त्यावरील भरतीसाठी अधिसूचनाही जारी केली जाणार आहे. सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या ९.७९ लाखांहून अधिक असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. भारतीय रेल्वेत सर्वाधिक पदे रिक्त आहेत. भारतीय रेल्वेमध्ये एकूण २.९३ लाख पदे रिक्त आहेत. ही सर्व पदे १ मार्च २०२१ पर्यंत रिक्त असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. 

ही रिक्त पदे भरण्याचे काम सुरू असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकारची विविध मंत्रालये, विभाग आणि संस्था आवश्यक कर्मचाऱ्यांच्या संख्येसाठी नियुक्त्या करत आहेत.  जितेंद्र सिंह यांनी लेखी उत्तरात सांगितले की, सरकारने सर्व मंत्रालये/विभागांना रिक्त पदे भरण्यासाठी आधीच सूचना दिल्या आहेत. भारत सरकारकडूनही रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. रोजगार निर्मितीसाठी उत्प्रेरक म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.

कोणत्या विभागात किती रिक्त पदे आहेत?भारतीय रेल्वेव्यतिरिक्त रिक्त पदांच्या बाबतीत दुसरा क्रमांक संरक्षण (सिव्हिल) विभागाचा आहे. संरक्षण (सिव्हिल) मध्ये रिक्त पदांची संख्या २.६४ लाख आहे. यानंतर गृह विभागांतर्गत १.४३ लाख पदे रिक्त आहेत. यानंतर, महसूल विभागात ८०,२४३ पदे आणि इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स विभागात २५,९३४ पदे रिक्त आहेत. तर एटोमिक एनर्जी विभागात रिक्त पदांची संख्या ९,४६० आहे.

कधी होणार या पदांवर नियुक्त्या?या पदांवरील नियुक्तीसाठी सातत्याने भरती मोहीम राबविण्यात येत असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. विविध विभागांमध्ये रिक्त पदांसाठी सातत्याने भरती सुरू आहे. वर्षभरात १० लाख रिक्त पदे भरण्याचे उद्दिष्टही सरकारने ठेवले आहे. अशा परिस्थितीत येत्या वर्षभरात सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये भरतीसाठी सातत्याने अधिसूचना जारी होतील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :GovernmentसरकारjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन