शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

तुमच्या उत्पन्नातील २० टक्के वाटा भविष्यात करील जादुई करामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 14:55 IST

सुखी भविष्य आणि आनंदी वर्तमानासाठी करुन पाहाच..

ठळक मुद्देज्या दिवशी तुम्ही नोकरीला लागाल किंवा कमाईला सुरुवात कराल, त्या दिवसापासून आपल्या कमाईतील किमान वीस टक्के रक्कम बाजूला काढा.त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.आज वाचवलेले वीस टक्के तुम्हाला सुखी भविष्याची हमीच देणार नाही, तुमचं वर्तमानही ते आनंदी आणि उत्साही करेल.

- मयूर पठाडेआपल्याला जगण्यासाठी किती पैसे लागतात? खरंतर याचं उत्तर जितकं सोपं आहे तितकंच अवघडही आहे. कारण नुसतं जगण्यासाठी फारसा पैसा लागत नाहीच, पण आपल्या वेगवेगळ्या अपेक्षा, गरजा आणि अडचणीच्या प्रसंगात किती पैसा आपल्याला लागेल याची मात्र काहीच शाश्वती नसते. त्यासाठी आपल्या हाती काही पुंजी असणं आवश्यक असतं. काही गरजा तर निव्वळ आर्थिक असतात.तुम्ही जर काही लोन घेतलेलं असेल, तर त्याचे हप्ते भरायचे असतात. हे हप्ते जर वेळेवर भरले गेले नाहीत, तर त्यावर मोठा दंड बसू शकतो. भवितव्यासाठी काही गुंतवणूक करावी लागते. काही पैसा बाजूल काढून ठेवावा लागतो. रिटायरमेंटसाठी काही प्लॅनिंग करुन ठेवावं लागतं.या साºया गोष्टींसाठी वेळीच आपल्याला सारी तयारी करुन ठेवावी लागते. ती जर केली नाही, तर ऐनवेळी फारच तारांबळ होते आणि त्याचं टेन्शन खूप मोठं असतं.त्यासाठीचा एक सर्वात सोपा उपाय आहे. तुम्ही अगदी विद्यार्थी दशेपासूनच स्वत:ला बचतीची आणि काही पैसे बाजूला काढून ठेवण्याची सवय लावली पाहिजे. अगदी आपल्याला जो पॉकेटमनी मिळत असेल तर त्यातूनही काही पैसा बाजूला काढला पाहिजे. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ज्या दिवशी तुम्ही नोकरीला लागाल किंवा जेव्हा कुठल्याही माध्यमातून तुम्ही कमाईला सुरुवात कराल, अगदी त्या दिवसापासून तुम्ही आपल्या कमाईतील किमान वीस टक्के रक्कम बाजूला काढली पाहिजे. त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. अनेक जणांना काही अघटित घडल्यावर किंवा उतारवयात जाग येते, आपण काहीच प्लॅनिंग केलं नाही याचं. तसं करणं धोक्याचं आहे. आज आपल्या कमाईतले वाचवलेले वीस टक्के तुम्हाला नुसतं योग्य आणि शाश्वत, सुखी भविष्याची हमीच देणार नाही, तुमचं वर्तमानही ते आनंदी आणि उत्साही करेल.त्यासाठी कराल एवढं? काढाल आजपासूनच आपल्या कमाईतील वीस टक्के वाटा बाजूला?..