शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

‘तू मेरी नही...तो किसीकी नही’! : तरुणीच्या हत्येला प्रेमप्रकरणाची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 14:28 IST

खामगाव :  स्थानिक संजिवनी कॉलनीतील श्रीमती मीनाताई जाधव आयटीआय परीक्षा केंद्रानजीक शनिवारी घडलेल्या हत्याकांडाला प्रेमप्रकरणाची किनार असल्याचा दावा पोलिस सुत्रांचा आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  स्थानिक संजिवनी कॉलनीतील श्रीमती मीनाताई जाधव आयटीआय परीक्षा केंद्रानजीक शनिवारी घडलेल्या हत्याकांडाला प्रेमप्रकरणाची किनार असल्याचा दावा पोलिस सुत्रांचा आहे.   एका निष्पाप युवतीला जीव गमवावा लागल्याने समाजमन सुन्न झाल्याचे दिसून येते.खामगाव शहरातील सनी पॅलेस जवळील सुधीर निंबोकार यांची मुलगी कु. अश्विनी हिच्याशी अकोला जिल्ह्यातील पातूर येथील सागर निंबोळे या युवकाशी गत पाच वर्षांपासून पे्रमसंबंध होते. सागर हा अश्विनीचा वर्ग मित्र असल्याने दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. दरम्यान, याच जवळकीतून सागर निंबोळे याने अश्विनीच्या वडीलांकडे अश्विनीसोबत लग्नाची मागणी केली होती. एकाच समाजातील असल्याने अश्विनीच्या नातेवाईकांकडून सागरच्या संबंधाला फारसा विरोध करण्यात आला नाही. मात्र, विवाहाच्या बोलणी दरम्यान, सागरच्या कुटुंबातील अवास्तव अपेक्षेमुळे अश्विनीच्या कुटुंबियांकडून हा संबंध नाकारण्यात आला. तेव्हापासूनच सागर जीवे मारण्याच्या धमक्या देत अश्विनीचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, अश्विनी त्याला कोणताही प्रतिसाद देत नसल्याने व्यवसायाने खासगी शाळेत शिक्षक असलेल्या सागर निंबोकार यांने अतिशय निर्दयीपणे अश्विनीची हत्या केली. या प्रकारामुळे खामगाव येथील निंबोकार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, वडिलांना मदत व्हावी यासाठी काही काळ अश्विनीने शहरातील एका खासगी शिक्षण संस्थेत शिक्षिकेची नोकरीही मिळविली होती. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या अश्विनीची निर्घुन हत्या झाल्याने तिच्या मैत्रिणींनाही धक्का बसला आहे. शुक्रवारी रात्री अश्विनीवर अतिशय शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. निर्जनस्थळ बनले धोकादायक!खामगाव शहरातील निर्जन स्थळ गत काही दिवसांमध्ये धोकादायक बनल्याचे दिसून येते. १५ दिवसांपूर्वीच स्थानिक नगर पालिका मैदानावर विक्की हिवराळे या युवकाची भोसकून हत्येचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर काही दिवसातच संजिवनी कॉलनीतील मीनाताई जाधव आयटीआय नजीक अश्विनीच्या हत्येचा प्रकार समोर आला. अश्विनीची हत्या झाली. त्यावेळी तिने आरडाओरडा केला. तसेच जीव वाचविण्यासाठी आटापीटाही केला. त्यामुळे निर्जनस्थळी असलेल्या ठिकाणाऐवजी दुसरीकडे कदाचि हा प्रकार घडल्यास अश्विनीचे प्राण वाचू शकले असते? अशी चर्चा समाजमनात उमटत आहे. त्याचवेळी निर्जनस्थळी असलेल्या परीक्षाकेंद्राच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.

 मृतक अश्विनी आणि सागर निंबोळे यांच्या गत पाच वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर येत आहे. मुलाकडील मंडळीच्या अवास्तव मागणीमुळे अश्विनीच्या कुटुंबियांनी विवाह संबंधास नकार दिला होता. त्यामुळे चिडलेल्या सागर निंबोळे यानेच अश्विनीची हत्या केली असल्याचे तपासाअंती स्पष्ट होत आहे.- प्रदीप पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, खामगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावMurderखून