शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

योग, प्राणायाम जीवनशैली बनली पाहिजे - शेखर पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 16:23 IST

योगा, प्राणायम करणे गरजेचे असून ही जीवनशैली बनली पाहिजे, असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नोडल अधिकारी शेखर पाटील यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केले.

- सोहम घाडगेलोकमत न्यूज नेटवर्ककोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन, जर्मनी, स्पेनसारख्या विकसित देशात बाधितांचा व मृत्यू पावणाºयांचा आकडा दिवसागणिक वाढतोय. या महामारीचा सामना करण्यासाठी सर्व जग एकत्रित प्रयत्न करीत आहे.  मात्र अद्याप यावर प्रभावी लस शोधण्यात यश मिळालेले नाही. खबरदारी,शारीरिक तंदुरुस्ती व नियमांचे काटेकोर पालन करणे हाच सर्वात मोठा उपाय आपल्याकडे आहे. शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी योगा, प्राणायम करणे गरजेचे असून ही जीवनशैली बनली पाहिजे, असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नोडल अधिकारी शेखर पाटील यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केले.

जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात सध्या कोणती कामे सुरु आहेत?दहावी आणि बारावीतील खेळाडू  विद्यार्थ्यांना शासनाकडून प्रोत्साहनपर २५   गुण दिले जातात. क्रीडा विभागाकडे जवळपास १ हजार प्रस्ताव आले आहेत. अधिकारी, कर्मचारी त्याबाबत छाननी करीत आहेत. छाननी केल्यानंतर त्याचा अहवाल पाठविण्यात येईल. साधारण ८०० पेक्षा अधिक खेळाडू विद्यार्थ्यांना या  ग्रेस गुणांचा लाभ मिळेल. 

कोरोनाच्या पृष्ठभूमीवर शारीरिक तंदुरुस्तीसाठी काय सांगाल?कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याशिवाय प्रत्येकाने योगा, प्राणायाम, व्यायाम करुन शरीर तंदुुरुस्त ठेवणे आवश्यक आहे. मी स्वत: नियमित योगा, प्राणायाम करतो. प्रत्येकाने चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे. 

कोरोनामुळे जिल्ह्यातील क्रीडा घडामोडींवर काय परिणाम झाला?सुटीचा काळ असल्याने स्पर्धा आयोजनावर  परिणाम झाला नाही.  मात्र ग्रीष्मकालीन शिबिरे पुढे ढकलण्यात आली आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येताच जिल्ह्यातील क्रीडा उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येईल.प्रशासनाचे प्रयत्न,नागरिकांचे सहकार्य व लोकप्रतिनिधींची साथ यामुळे आपण कोरोनावर बºयाच अंशी नियंत्रण मिळविले आहे. कोरोना हे जागतिक संकट आहे. यावर मात करण्यासाठी टीमवर्क महत्वाचे आहे.  प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी अजून जास्त पालन केल्यास कोरोनावर मात करता येईल. 

कोरोनाची जिल्ह्यात परिस्थिती कशी आहे?जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाबत परिस्थिती खूप  नियंत्रणात आहे. आपल्या शेजारी अकोला, औरंगाबाद, जळगाव खांदेशची परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यातुलनेत आपल्या जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. नागरिकांनी अजून जास्त प्रमाणात प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. घरातच थांबा, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका, स्वत:ची, कुटूंबाची काळजी घ्या. जीवापेक्षा जास्त काहीच नाही.जीवन अनमोल आहे. प्रत्येकाने कर्तव्य म्हणून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. नियम पाळण्याची सवय करुन घ्यावी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखतYogaयोग