शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सोयाबीनचे एकरी उत्पन्न १५ हजाराच्या खालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 17:47 IST

 बुलडाणा: जिल्ह्यात सोयाबीनचे एकरी उत्पादन जेमतेच पाच क्विंटलपर्यंत होत आहे. त्यात भावही अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत मिळत असल्याने एकरी सोयाबीनचे उत्पन्न १५ हजार रुपयांच्या खालीच राहत आहे.

- ब्रम्हानंद जाधव

 बुलडाणा: जिल्ह्यात सोयाबीनचे एकरी उत्पादन जेमतेच पाच क्विंटलपर्यंत होत आहे. त्यात भावही अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत मिळत असल्याने एकरी सोयाबीनचे उत्पन्न १५ हजार रुपयांच्या खालीच राहत आहे. उत्पादनात घट त्यातही योग्य भाव नसल्याने जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. जिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख व नगदी पीक आहे. कपाशीवर पडणाºया गुलाबी बोंडअळीच्या भितीने यावर्षी सर्वाधिक क्षेत्र हेसोयाबीनचे राहिले आहे. खरीप हंगामाच्या एकूण साडेसात लाख हेक्टर क्षेत्रापैकी साडे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर यावर्षी सोयाबीनचा पेरा असून सध्या सोयाबीनचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. बहुतांश शेतातील सोयाबीन सोंगणीचे काम आटोपले आहे. त्यामुळे शेतात सोयाबीनच्या सुड्या काढण्याचीच लागबग पाहावयास मिळत आहे. तर निम्म्यापेक्षा जास्त शेतकºयांच्या सोयाबीनचा माल घरी आला आहे. परंतू जिल्ह्यात जेमतेम पाच क्विंटलपर्यंत एकरी सोयाबीन झाल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. काहींची सोयाबीन तर हिरवी असतानाच वाळून गेली. त्यामुळे अशा शेतकºयांना सोयाबीन सोंगणीची गरजच पडली नाही. परंतू सुरूवातीला झालेल्या थोड्याशा पावसावर आणि ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, अशा शेतकºयांना सोयाबीनचे उत्पादन घेता आले. त्यातही एक एकर शेतीमध्ये केवळ पाच क्विंटलपर्यंतच सोयाबीन होत आहे. काहींना तर एका एकरामध्ये एक ते दोन क्विंटलच माल झाल्याचे दिसून आले. त्यानंतर व्यापाºयांकडून सोयाबीनला २ हजार ५०० ते २ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव मिळतो. परंतू सोयाबीन जर दर्जेदार असेल, तर चाळणी केल्यानंतर तीन हजार रुपयांपर्यत भाव दिला जातो. परिणामस्वरूप, एका एकरामध्ये जास्तीत जास्त १५ हजार रुपयांपर्यतच शेतकºयांना उत्पन्न होत आहे. उत्पन्नातील घट, व्यापाºयांकडून मिळणारा अत्यल्प भाव, शेतीसाठी वाढलेला खर्च यासर्व बाबींमुळे सोयाबीन उत्पादक हवालदिल झाले आहेत.

शेतकºयांची दिवाळी आर्थिक टंचाईत

सर्व सणांमध्ये महत्वाचा समजल्या जाणाºया दिवाळी सणातच शेतकºयांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी दिवाळीपर्यंत सोयाबीनचे उत्पादन घरात येते. त्यानंतर सोयाबीन विक्री करून शेतकरी दिवाळी सण आनंदात साजरा करतात. मात्र यावर्षी सोयाबीनचे उत्पादन कमी होऊन त्याला भावही योग्य प्रमाणे मिळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे काही शेतकºयांनी हमीभावाच्या प्रतीक्षेत आपली सोयाबीन घरातच ठेवली आहे.

सोयाबीन शेती तोट्यात

शेतकºयांचा वर्षभराचा खर्च सोयाबीन या पिकाच्या भरवश्यावर आहे. परंतू सध्या सोयाबीनचे भाव अत्यल्प असल्याने सोयाबीन शेती तोट्यात सापडली आहे. सोयाबीनला सुरूवातीपासून नांगरणी, वखरणी, पेरणी, खत, बियाणे, दोन ते तीन वेळा फवारणी, दोन वेळा डवरण पाळी, सोयाबीनची सोंगणी, काढणी, वाहतूक खर्च यासर्व बाबींचा विचार केला तर एकरी खर्च १५ हजार रुपयांपेक्षा जास्त होत आहे. त्यात यावर्षीचे उत्पन्नच १५ हजार रुपयांच्या आसपास आल्याने अनेक शेतकºयांना आर्थिक फटका बसत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती