शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अहो आश्चर्यम....! विहिरीतील पाणी अचानक झाले गरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 21:37 IST

Sangrampur News : अकोली बु. येथील प्रकार : तलाठी, तहसीलदारांनी घेतले पाण्याचे नमूने

संग्रामपूर : भूगर्भातील एक आश्चर्यकारक घटना संग्रामपूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या अनेक वर्षापासून वापरात असलेल्या विहिरीचे पाणी अचानक गरम झाले आहे. विहिरीतील पाणी गरम झाले तरी कसे? याबाबत ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.संग्रामपूर तालुक्यातील अकोली बुद्रुक येथे १५ वर्षे जुनी खाजगी विहीर आहे. या विहीरीतून गेल्या पाच दिवसापासून गरम पाणी येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अचानक विहिरीतील पाणी गरम झाल्याने परिसरात चर्चांना वेग आला आहे. विहीर येथील भानुदास भगवान सोळंके यांच्या मालकीची असून घराजवळ बेंबळा नदी काठावर आहे. ही विहीर तब्बल ५० फूट खोल असून सोळंके कुटुंबीय दररोज याच विहीरीवरून पाणी भरतात. मात्र गेल्या पाच दिवसापासून या विहिरीतील पाणी चांगलेच गरम येत असल्याने ग्रामस्थ चकीत झाले आहेत. विशेष म्हणजे या विहिरी पासून २० ते २५ फूट अंतरावरील दुसऱ्या विहिरीचे पाणी थंड आहे. दरम्यान सोमवारी प्रभारी तहसीलदार विजय चव्हाण व तलाठी पी. व्ही. खेडकर यांनी विहिरीची पाहणी केली. पाण्याचे नमूने घेतले आहेत. विहिरीतील पाणी अचानक गरम येत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यापूर्वी असा प्रकार कधीच झाला नसल्याने भूगर्भशास्त्रज्ञांकडून तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

तहसीलदार यांनी विहिरीची पाहणी केली असून विहिरीतून गरम पाणी येत आहे. पाण्याचे नमूने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

-पी. व्ही. खेडकर, तलाठी, अकोली बुद्रुक

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरbuldhanaबुलडाणा