लोणार (बुलडाणा) : तालुक्यातील पारडी सिरसाट येथील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या त्रस्त महिलांनी १0 फेब्रुवारी रोजी कळशी, घागर घेऊन तहसीलदार व गटविकास अधिकार्यांना घेराव घातला. गत २ वर्षांपासून तालुक्यात दृष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर २५ वर्षांपासून पुनर्वसनामुळे शासकीय योजनेचा लाभ न मिळालेल्या पारडी सिरसाट येथील ग्रामस्थ गावातीलच शेतकरी मधुकर शंकर बाभुळवार यांच्या खासगी विहिरीवरून पाणी घेत होते; मात्र यावर्षी अत्यल्प पावसामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी पारडी सिरसाट येथील महिलांनी तहसीलदार व गटविकास अधिकार्यांकडे केली आहे.
महिलांचा घागर मोर्चा
By admin | Updated: February 11, 2015 01:06 IST