खामगाव : परिसरातील खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शहरातील लाकडी गणपती परिसरातील महिलांनी गुरुवारी पालिकेवर धडक दिली. यावेळी पालिका प्रशासनाकडून उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आल्याने महिलांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.शहरातील लाकडी गणपती परिसरात गेल्या तीन आठवड्यांपासून पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला आहे. गुरुवारीही या ठिकाणी समस्या निर्माण झाल्याने, संतप्त महिलांनी पालिकेवर धडक दिली. यावेळी पदाधिकाऱ्यांसोबतच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट नाकारल्याने, महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. या मोर्चात कल्पना खराटे, चंदा खराटे, सुनीता खराटे, साधना खराटे, संगीता अत्तरकार, गीता उगले, रत्नमाला टेंभे, भारती तायडे, ललिता तायडे, वंदना पिवटकर, मीना शर्मा, सुलोचना इचे, कमल खंडारे, स्वप्निल गिऱ्हे आदींचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
पाण्यासाठी लाकडी गणपती परिसरातील महिलांचा मोर्चा
By admin | Updated: April 21, 2017 00:39 IST