शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

निकृष्ट बियाण्यांच्या मोबदल्यात बियाणे किंवा आर्थिक मदत देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 10:43 IST

जिल्ह्यातील एकंदर स्थितीचा सविस्तर अहवाल मागितला असल्याचे पालकमंत्र्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याचा मुद्दा गंभीरतेने घेतला असून प्रकरणी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा दर्जेदार बियाणे किंवा आर्थिक स्वरुपात मदत देण्यात येईल. यासंदर्भात संबंधित बियाणे कंपन्यांशी चर्चा झाली असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात जिल्ह्यातील एकंदर स्थितीचा आपण सविस्तर अहवाल मागितला असल्याचे पालकमंत्र्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.बुलडाणा जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभीच जिल्ह्यात पाऊस पडला. त्यामुळे १०० मिमी पेक्षाही कमी पाऊस असतानही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र बहुतांश सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे ४४३ शेतकºयांनी तक्रारी केल्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाच्या अधिकाºयांनी थेट बांधावर जावून पाहणी करण्यास प्रारंभ केला आहे. पालकमंत्र्यांनी याबाबत कृषी विभागाला सुचनाही दिल्या आहेत. या मुद्द्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांच्याशीही या मुद्दयावर सविस्तर चर्चा केली असून यासंदर्भातील सविस्तर अहवालही त्यांना मागितला आहे. जिल्ह्यात ५५७ हेक्टरवरील सोयाबीनचेबियाणे उगवले नसल्याचे स्पष्ट आहे.प्रकरणी बियाणे बनविणाºया संबंधित कंपन्यांशीही या मुद्द्यावर चर्चा झाली असून बहुतांश कंपन्यांनी शेतकºयांना दर्जेदार बियाणे देण्याबाबत किंवा प्रसंगी आर्थिक स्वरुपात मदत देण्याबाबत आश्वस्त केले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्ह्यात २ लाख ६३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणीबुलडाणा जिल्ह्यात दोन लाख ६३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी आतापर्यंत झालेली असून जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र हे चार लाख नऊ हजार २११ हेक्टर आहे. जिल्ह्यातील पेरणी योग्य असलेल्या सात लाख ३४ हजार १७७ हेक्टरपैकी ५६ टक्के क्षेत्रावर केवळ सोयाबीनची पेरणी होत असते. त्यामुळे बोगस सोयाबीन बियाण्यांचा प्रश्न बुलडाणा जिल्ह्याच्या दृष्टीने गंभीर असल्याचे निदर्शनास येत आहे.

गतवर्षीही सोयाबीनलाच बसला होता फटकागेल्या वर्षी जिल्ह्यात परतीचा पाऊस वार्षिक सरासरीच्या २२.१९ टक्के पडला होता. त्यामुळे शेतकºयाच्या हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक खराब झाले होते. तर मेहकर आणि लोणार तालुक्यात पैनगंगेसह अन्य नद्यांना आलेल्या पुराचे पाणी थेट शेतात घुसून शेतकºयांच्या सोंगून ठेवलेल्या सुड्याही पाण्यात वाहून गेल्याने पाच कोटीं रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले होते.मध्यप्रदेशातील कंपनीला नोटीससोयाबीन बियाणे उगवल्या नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी पाहता बहुतांश कंपन्यांनी दुसरे बियाणे देण्याबाबत प्रशासनाला आश्वस्त केले असले तरी मध्य प्रदेशातील रवि सिड्स या कंपनीने यासाठी नकार दिला असल्याचे पालकमं६ी म्हणाले. त्यामुळे या कंपनीला त्यामुळे नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर पुढील काळात नेमका काय निर्णय होतो, याककडे सध्या शेतकºयांचे लक्ष आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी