शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

महागिरी येथील महादेवाच्या यात्रेला वन्यजीव विभागाने परवानगी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 13:19 IST

शेकडो वर्षापासून सुरु असलेली परंपरा यावर्षी मात्र वैश्विक महामारी मुळे खंडित झाली आहे.

संग्रामपूर ता. प्र:- दर वर्षी श्रावण महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी महागिरी येथे महादेवाच्या यात्रेला हजारोच्या संख्येने भक्तगण येत असतात. शेकडो वर्षापासून सुरु असलेली परंपरा यावर्षी मात्र वैश्विक महामारी मुळे खंडित झाली आहे. वन्यजीव विभागाने महागिरी येथील महादेवाच्या यात्रेला परवानगी नाकारल्याने भक्तांमध्ये नाराजी आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अंबाबरवा अभयारण्यात सातपुडा पर्वतरांगेत महागिरी येथे दरवर्षी श्रावण महिण्यातील तिसऱ्या सोमवारी महादेवाची यात्रा मोठ्या हर्षोल्हासात भरते. येथील एका उंच पर्वतावर भगवान शंकर यांची पूरातन स्थापना झालेली आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेले अतिप्राचीन दुर्गम भागात महागिरी येथील भगवान शंकर आदिवासींसह पंचक्रोशीतील भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. हे ठिकाण संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून पंधरा किलोमीटर अंतरावरील अती दूर्गम भागात आहे. पर्वतरांगेतील एका भव्य पर्वताच्या टोकावर जमिनीपासून जवळपास ७ हजार फूट उंचीवर महादेवाचे अधिष्ठान वसलेले आहे. त्या पर्वताला महादेवाचे पर्वत असे म्हटले जाते. या पर्वताच्या उंची वर महादेवाच्या दर्शन घेण्यासाठी ७ हजार फूटाची एकेरी पाऊलवाट आहे. त्या पाउलवाटेनेच महादेवाचे दर्शन घडत असून दर्शनासाठी येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने भक्तगणांची गर्दी पाहायला मिळते. या भव्य पर्वतावर एक मोठी दगडाची गूफा असून या गूफेच्या आत मध्ये भगवान शंकराची स्थापना केलेली आहे. निसर्गाची देण असलेल्या सातपुड्यातील नैसर्गिक सौंदर्य व निसर्गरम्य ठिकाणी दर्शनासाठी भक्तगणांची एकच गर्दी असते. शेकडो वर्षापूर्वी सोनाळा येथील श्री संत सोनाजी महाराज महागिरीला गायी चारण्याकरिता जात होते. अशी आख्यायिका आहे. महागिरी महादेव सोनाजी महाराजांचे श्रद्धास्थान होते. महादेवाचे पर्वत चढत असतांना सोनाजी महाराजांच्या पादुकांची पूरातन स्थापना करण्यात आलेली आहे. सातपुडा पर्वतरांगेत संत सोनाजी महाराज गायी चारत असतांना त्यांना महागिरीवर महादेव प्रसन्न झाले. महादेवांनी केशवदास ऋषीच्या रूपात सोनाजी महाराजांना दर्शन दिले. रानमोळा गाई चारत असतांना सहकाऱ्यांना तहान लागली की सोनाजी महाराज चमत्कार करून पाण्याचा झिरा निर्माण करत. सातपुडा पर्वत रांगेत अनेक ठिकाणी आजही पाण्याची जिवंत झिरे आहेत. महादेवाच्या पर्वतावरही श्री संत सोनाजी महाराज यांनी लावलेला जिवंत झिरा आजतागायत सुरू आहे. त्यामुळे या स्थळाला अधिक महत्त्व असल्याने दर वर्षी येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसून येते. टेकडीवर जातांना कुठेही पाण्याची साठवण दिसत नाही. मात्र ज्या ठिकाणी महादेवाची स्थापना आहे. त्या ठिकाणी बाराही महिने पाणी साचलेले आढळून येते. गुफेच्या दगडातून एक एक थेंब पाणी टपकून येथे पाण्याची साठवण होते. ज्या ठिकाणी पाणी आढळते नेमक्या त्या ठिकाणावरून मंदिरात जाण्याचा रस्ता आढळून येते. तो जुन्याकाळी लाकडाच्या शिडीवर असल्याचे बोलल्या जाते. भावीक खडतर प्रवास करून या ठिकाणी आल्यावर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत भगवान शंकराचे दर्शन घेतात. मात्र यावर्षी कोरना विषाणू संसर्गामुळे महागिरीच्या यात्रेला वन्यजीव विभागाकडून परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे श्रद्धालूंकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभयारण्यातील महागीरी वर जाण्यास परवानगी नाही. याबाबत वरीष्ठ कार्यालयाकडून आदेशही प्राप्त झाले आहेत. त्यामुळे महागिरी यात्रेला परवानगी देण्यात आली नाही.

सूहास कांबळेवनपरिक्षेत्र अधिकारी(वन्यजीव विभाग) सोनाळा

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूर