शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

महागिरी येथील महादेवाच्या यात्रेला वन्यजीव विभागाने परवानगी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 13:19 IST

शेकडो वर्षापासून सुरु असलेली परंपरा यावर्षी मात्र वैश्विक महामारी मुळे खंडित झाली आहे.

संग्रामपूर ता. प्र:- दर वर्षी श्रावण महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी महागिरी येथे महादेवाच्या यात्रेला हजारोच्या संख्येने भक्तगण येत असतात. शेकडो वर्षापासून सुरु असलेली परंपरा यावर्षी मात्र वैश्विक महामारी मुळे खंडित झाली आहे. वन्यजीव विभागाने महागिरी येथील महादेवाच्या यात्रेला परवानगी नाकारल्याने भक्तांमध्ये नाराजी आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अंबाबरवा अभयारण्यात सातपुडा पर्वतरांगेत महागिरी येथे दरवर्षी श्रावण महिण्यातील तिसऱ्या सोमवारी महादेवाची यात्रा मोठ्या हर्षोल्हासात भरते. येथील एका उंच पर्वतावर भगवान शंकर यांची पूरातन स्थापना झालेली आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेले अतिप्राचीन दुर्गम भागात महागिरी येथील भगवान शंकर आदिवासींसह पंचक्रोशीतील भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. हे ठिकाण संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून पंधरा किलोमीटर अंतरावरील अती दूर्गम भागात आहे. पर्वतरांगेतील एका भव्य पर्वताच्या टोकावर जमिनीपासून जवळपास ७ हजार फूट उंचीवर महादेवाचे अधिष्ठान वसलेले आहे. त्या पर्वताला महादेवाचे पर्वत असे म्हटले जाते. या पर्वताच्या उंची वर महादेवाच्या दर्शन घेण्यासाठी ७ हजार फूटाची एकेरी पाऊलवाट आहे. त्या पाउलवाटेनेच महादेवाचे दर्शन घडत असून दर्शनासाठी येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने भक्तगणांची गर्दी पाहायला मिळते. या भव्य पर्वतावर एक मोठी दगडाची गूफा असून या गूफेच्या आत मध्ये भगवान शंकराची स्थापना केलेली आहे. निसर्गाची देण असलेल्या सातपुड्यातील नैसर्गिक सौंदर्य व निसर्गरम्य ठिकाणी दर्शनासाठी भक्तगणांची एकच गर्दी असते. शेकडो वर्षापूर्वी सोनाळा येथील श्री संत सोनाजी महाराज महागिरीला गायी चारण्याकरिता जात होते. अशी आख्यायिका आहे. महागिरी महादेव सोनाजी महाराजांचे श्रद्धास्थान होते. महादेवाचे पर्वत चढत असतांना सोनाजी महाराजांच्या पादुकांची पूरातन स्थापना करण्यात आलेली आहे. सातपुडा पर्वतरांगेत संत सोनाजी महाराज गायी चारत असतांना त्यांना महागिरीवर महादेव प्रसन्न झाले. महादेवांनी केशवदास ऋषीच्या रूपात सोनाजी महाराजांना दर्शन दिले. रानमोळा गाई चारत असतांना सहकाऱ्यांना तहान लागली की सोनाजी महाराज चमत्कार करून पाण्याचा झिरा निर्माण करत. सातपुडा पर्वत रांगेत अनेक ठिकाणी आजही पाण्याची जिवंत झिरे आहेत. महादेवाच्या पर्वतावरही श्री संत सोनाजी महाराज यांनी लावलेला जिवंत झिरा आजतागायत सुरू आहे. त्यामुळे या स्थळाला अधिक महत्त्व असल्याने दर वर्षी येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसून येते. टेकडीवर जातांना कुठेही पाण्याची साठवण दिसत नाही. मात्र ज्या ठिकाणी महादेवाची स्थापना आहे. त्या ठिकाणी बाराही महिने पाणी साचलेले आढळून येते. गुफेच्या दगडातून एक एक थेंब पाणी टपकून येथे पाण्याची साठवण होते. ज्या ठिकाणी पाणी आढळते नेमक्या त्या ठिकाणावरून मंदिरात जाण्याचा रस्ता आढळून येते. तो जुन्याकाळी लाकडाच्या शिडीवर असल्याचे बोलल्या जाते. भावीक खडतर प्रवास करून या ठिकाणी आल्यावर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत भगवान शंकराचे दर्शन घेतात. मात्र यावर्षी कोरना विषाणू संसर्गामुळे महागिरीच्या यात्रेला वन्यजीव विभागाकडून परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे श्रद्धालूंकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभयारण्यातील महागीरी वर जाण्यास परवानगी नाही. याबाबत वरीष्ठ कार्यालयाकडून आदेशही प्राप्त झाले आहेत. त्यामुळे महागिरी यात्रेला परवानगी देण्यात आली नाही.

सूहास कांबळेवनपरिक्षेत्र अधिकारी(वन्यजीव विभाग) सोनाळा

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूर