शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
4
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
5
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
6
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
7
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
8
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
9
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
10
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
11
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
12
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
13
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
14
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
15
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
16
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
17
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
18
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
19
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
20
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी

शेती व्यवसायाला कधी येणार ‘अच्छे दिन’: शेतकऱ्यांना प्रतीक्षा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 12:15 IST

Farmers News शेतकरी व शेती व्यवसायाला ‘अच्छे दिन’ कधी येणार? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात कायमच असल्याचे दिसते. 

 लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : वर्षभर शेतात राबराब राबायचे, थंडी, उन्हाची, विंचू-काट्याची तमा न बाळगता रात्रीचा दिवस करून कष्ट करायचे, निसर्गाने साथ दिली तर चांगले उत्पन्न घ्यायचे, निसर्गाने अवकृपा केली तर आर्थिक भुर्दंड सोसायचा. निसर्ग साथ देत नाही व शासनही जवळ करीत नाही. मग, शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागायचा? शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले खरे, पण शेतकरीशेती व्यवसायाला ‘अच्छे दिन’ कधी येणार? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात कायमच असल्याचे दिसते. शासनाने दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी दिल्यानंतर ‘अच्छे दिन’ येईल असे वाटले. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. सातबारावर कर्जाचा बोजा कायम असल्याने पुढील वर्षाकरिता कर्ज मिळत नाही. त्याकरिता शेतकऱ्यांकडून बँकेचे उंबरठे झिजवणे सुरू आहेत, तर सोयाबीन, कापसाला मिळणाऱ्या भावामुळे लागवडीचा खर्चही निघत नाही. खरीप हंगामातील सुरुवातीची पीक परिस्थिती पाहता यावर्षी चांगले उत्पन्न होईल, असे वाटले. परंतु, खोडकिडी व परतीच्या पावसामुळे त्यात घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले. अतोनात खर्च करूनही शेतीत चांगले उत्पन्न घेण्यासाठी लागवडीला पैसाच राहत नाही. वर्षभराचा कुटुंबाचा खर्च शेतीच्या उत्पन्नातून भागत नाही. शेतमाल वगळता रासायिक खते, कीटकनाशकांसह इतर वस्तूंचे वाढते भावही शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडवित असल्याचे दिसते. शासनाने शेती व्यवसायाला उभारी देण्याची गरज निर्माण झाली आहे.

पांदण रस्ते अद्यापही उपेक्षित शेती खरेदी करून सरकार समद्धी मार्ग, मेट्रो, दोन पदरीचे चार पदरी रस्त्यावर कोट्यवधी नव्हे, अब्जावधी रुपये खर्च करीत आहे.  स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झालीत, पण आजही शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते. शेतमाल पक्क्या रस्त्यावर कसा येणार, हा प्रश्नच आहे.

रात्रीचे ओलित जिवावर बेतणार  शासन भारनियमन मुक्त राज्य करणार असल्याची घोषणा करीत आहे, पण शेतीला थ्री फेज वीपुरवठा आठवड्यातून तीन दिवस दिवसाला व चार दिवस रात्रीला दिला जातो.  रात्रीचे ओलित थंडीच्या दिवसांत शेतकरी कसे करणार, हे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना कळत नसावे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. 

दरवर्षीच जातेय हातचे पीक मळणीयोग्य पिके होतात आणि ऊन, वारा, पाऊस याचा धोका निर्माण होतो. कधी अतिवृष्टीने, कधी कोरड्या दुष्काळाने कधी गारपिटीने एवढेच नव्हे. तर रानडुक्कर, माकड, रोह्यांचा कळप पिके तुडवितात. हाती आलेले पीक जाते, पण शासन याचा बंदोबस्त करीत नाही. कुंपणासाठी अनुदानावर तारही देत नसल्याची वस्तुस्थिती आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीagricultureशेती