शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

धावत्या बसचे चाक निखळले:; सुमारे ७० प्रवासी थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 17:09 IST

सुमारे ७० प्रवासी थोडक्यात बचावले

जळगाव जामोद: धावत्या एसटी बसचे चाक निखळून पडल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव परिसरात घडली. सुदैवानी बस नियंत्रणात आल्याने सुमारे ७० प्रवासी यातून थोडक्यात बचावले. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रवाशांनी हा थरार अनुभवला.शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता जळगाव जामोद आगाराची बस क्रमांक एम.एच. ०७ सी ९४९८ जळगाव जामोद येथून बुलडाण्यासाठी निघाली. सध्या जळगाव जामोद ते नांदुरा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ता प्रचंड खराब झाला आहे. दरम्यान ७० प्रवाशी निघालेल्या बसचे डाव्या बाजूचे मागील चाक अचानक निखळून पडले. त्यामुळे आतील प्रवाशांना मोठा झटका बसला. चालकाने प्रसंगावधान राखून लगेच एसटी बस बाजूला उभी केली. यानंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे दुसरे चाकही निखळून पडण्याच्या अवस्थेत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कदाचित दुसरे चाक निखळून पडले असते, तर मोठी दुर्घटना घडली असती.निष्काळजीपणा प्रवाशांच्या जीवावर!एसटी बसचा प्रवास सुरक्षित समजल्या जातो, त्यामुळे अनेकजण विश्वास ठेवून एसटी बसनेच प्रवास करतात. मात्र आगारातून निघालेली बस काही अंतरावरच दुर्घटनाग्रस्त होते. यावरून आगाराचे बसेसवर काही नियंतत्रण नसल्याचे दिसून येते. अनेक एसटी बसेस भंगार झाल्या असून हा एकप्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळच आहे. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष घालून दोषी कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी अपघातग्रस्त बसने प्रवास करणारे शशांक दाते यांच्यासह प्रवाशांनी केली. (प्रतिनिधी )
टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदbuldhanaबुलडाणाstate transportएसटी