शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बुलडाणा : विहिरी, तलाव ‘ओव्हर फ्लो’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 15:05 IST

शनिवार पासून रविवारी सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासामध्ये बुलडाणा तालुक्यात 

बुलडाणा: तालुक्यात शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे जलपातळीत चांगलीच वाढल झाली आहे. या पावसामुळे विहिरी, तलाव ओव्हर फ्लो झाले  आहेत. शनिवार पासून रविवारी सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासामध्ये बुलडाणा तालुक्यात २२.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात कोठे ना कोठे दररोज दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तलाव, लघुसिंचन प्रकल्प, धाड, मासरूळ, देऊळघाट या परिसरातील लहान-मोठे तलाव  ओसांडून वाहत आहेत. येळगाव धरणही पूर्ण क्षमतेने भरल्याने तालुक्?यातील भूजलपातळीत कमालीची वाढ झाली आहे. गतवषीं पावसाळा जरी जून महिन्यात सरू झाला तरी  आॅक्टोबरमध्ये पावसाने धरणे,  तत्नाव तुडुंब भरले होते. मात्र, यंदा सप्टेंबरमध्येच तालुक्?यातील बहुसंख्य नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विहिरींची पाणीपातळी बरीच वर आली  आहे. तीन-चार वर्षांपूर्वी निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतकºयांच्या फळबागा पाण्याअभावी पूर्णपणे वाळून गेल्या होत्या. शेतकºयांनी विहिरींना  पाणी व सिंचनाकरिता लाखो रुपयांचा खर्च केला होता. काही फळबाग उत्पादक शेतकºयांनी लाखो रुपये पाण्यासाठी खर्च करून टँकरद्वारे पाणी मागवून फळबागा  वाचविण्याच्या प्रयत्न केला होता. बुलडाणा शहराला येळगाव धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. सोबतच परिसरातील अनेक गावांनाही याच धरणावरून पाणी दिल्या  जाते. परंतू दरवर्षी तालुक्यातील भादोला, सुंदरखेड, देऊळघाट आदी गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागते. सध्याही काही गावांमध्ये  तर आठवडा किंव पंधरा दिवसांनी ग्रापपंचायतीच्यावतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र आता पाऊस चांगला झाल्याने भविष्यातील पाणी टंचाईचा प्रश्न दूर झाल्याचे  दिलासादायक चित्र बुलडाणा तालुक्यात दिसून येत आहे. गत महिन्यातच येळगाव धरण झाले होते ओव्हर फ्लोयंदा रोहिणी नक्षत्रापासूतच बुलडाणा तालुक्?यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने यंदाच्या यर्षी तरी नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार नाही, असे चित्र  आहे. तालुक्यातून उगम असलेली महत्त्वाची पैनगंगा नदी मागील महिन्यापासून चांगली वाहत आहे. शिवाय येळगाव धरणही लवकरच ओव्हर फ्लो झाले. आगामी पीक नियोजनासाठी फायदा बुलडाणा तालक्यातील बहुतांश शेती ही सिंचनावर  अवलंबून आहे. या परिसरातील शेतकरी खरीप व रब्बी हंगामातील पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. हल्ली दररोज पाऊस  कोसळत असल्याने सोयाबीन पीक वगळता इतर पिकांची परिस्थिती चांगली आहे. समाधानकारक पाऊस कोसळत असल्याने व विहिरींना मुबलक पाणी असल्याने आगामी  हंगामातील पीक नियोजन चांगले करता येणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण