शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

बुलडाणा : विहिरी, तलाव ‘ओव्हर फ्लो’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 15:05 IST

शनिवार पासून रविवारी सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासामध्ये बुलडाणा तालुक्यात 

बुलडाणा: तालुक्यात शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे जलपातळीत चांगलीच वाढल झाली आहे. या पावसामुळे विहिरी, तलाव ओव्हर फ्लो झाले  आहेत. शनिवार पासून रविवारी सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासामध्ये बुलडाणा तालुक्यात २२.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात कोठे ना कोठे दररोज दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तलाव, लघुसिंचन प्रकल्प, धाड, मासरूळ, देऊळघाट या परिसरातील लहान-मोठे तलाव  ओसांडून वाहत आहेत. येळगाव धरणही पूर्ण क्षमतेने भरल्याने तालुक्?यातील भूजलपातळीत कमालीची वाढ झाली आहे. गतवषीं पावसाळा जरी जून महिन्यात सरू झाला तरी  आॅक्टोबरमध्ये पावसाने धरणे,  तत्नाव तुडुंब भरले होते. मात्र, यंदा सप्टेंबरमध्येच तालुक्?यातील बहुसंख्य नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विहिरींची पाणीपातळी बरीच वर आली  आहे. तीन-चार वर्षांपूर्वी निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतकºयांच्या फळबागा पाण्याअभावी पूर्णपणे वाळून गेल्या होत्या. शेतकºयांनी विहिरींना  पाणी व सिंचनाकरिता लाखो रुपयांचा खर्च केला होता. काही फळबाग उत्पादक शेतकºयांनी लाखो रुपये पाण्यासाठी खर्च करून टँकरद्वारे पाणी मागवून फळबागा  वाचविण्याच्या प्रयत्न केला होता. बुलडाणा शहराला येळगाव धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. सोबतच परिसरातील अनेक गावांनाही याच धरणावरून पाणी दिल्या  जाते. परंतू दरवर्षी तालुक्यातील भादोला, सुंदरखेड, देऊळघाट आदी गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागते. सध्याही काही गावांमध्ये  तर आठवडा किंव पंधरा दिवसांनी ग्रापपंचायतीच्यावतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र आता पाऊस चांगला झाल्याने भविष्यातील पाणी टंचाईचा प्रश्न दूर झाल्याचे  दिलासादायक चित्र बुलडाणा तालुक्यात दिसून येत आहे. गत महिन्यातच येळगाव धरण झाले होते ओव्हर फ्लोयंदा रोहिणी नक्षत्रापासूतच बुलडाणा तालुक्?यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने यंदाच्या यर्षी तरी नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार नाही, असे चित्र  आहे. तालुक्यातून उगम असलेली महत्त्वाची पैनगंगा नदी मागील महिन्यापासून चांगली वाहत आहे. शिवाय येळगाव धरणही लवकरच ओव्हर फ्लो झाले. आगामी पीक नियोजनासाठी फायदा बुलडाणा तालक्यातील बहुतांश शेती ही सिंचनावर  अवलंबून आहे. या परिसरातील शेतकरी खरीप व रब्बी हंगामातील पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. हल्ली दररोज पाऊस  कोसळत असल्याने सोयाबीन पीक वगळता इतर पिकांची परिस्थिती चांगली आहे. समाधानकारक पाऊस कोसळत असल्याने व विहिरींना मुबलक पाणी असल्याने आगामी  हंगामातील पीक नियोजन चांगले करता येणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण